शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

श्रीनिवासन हेच सर्व वादाचे मूळ

By admin | Updated: July 19, 2015 01:04 IST

भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांपासून जी घाण साचली ती श्रीनिवासन यांच्यामुळेच. स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीसारखी प्रकरणे बाहेर आल्यानंतर क्रिकेटची

कोलकाता : ‘‘भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांपासून जी घाण साचली ती श्रीनिवासन यांच्यामुळेच. स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीसारखी प्रकरणे बाहेर आल्यानंतर क्रिकेटची बदनामी होऊनही बीसीसीआयने मौन पाळले. स्वच्छ आणि पारदर्शी कारभारासाठी श्रीनिवासन यांनी कुठलीही पावले उचलली नाहीत, शिवाय अध्यक्षपदी चिटकून राहिले. त्यांनी आयसीसी चेअरमनपदही भूषविले. सर्व वादाचे मूळ ते स्वत: आहेत. त्यांनी आयसीसी चेअरमनपद सोडून द्यायला हवे,’’ अशी घाणाघाती टीका बोर्डाचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. शशांक मनोहर यांनी शनिवारी केली.श्रीनिवासन यांच्याविरुद्ध उघडपणे बंडाचे निशाण फडकविणारे मनोहर यांनी बीसीसीआयमधील घाण स्वच्छ करायची झाल्यास लोढा समितीच्या शिफारशी लागू करणे, हाच एकमेव पर्याय असल्याचे सांगितले.काल रात्री बीसीसीआय प्रमुख जगमोहन दालमिया यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत आयपीएलचे सीईओ सुंदर रमन यांची ताबडतोब उचलबांगडी व्हावी, तसेच बोर्डातील व्यवहाराची सीबीआय चौकशी झाल्यास लोकांचा क्रिकेटवरील विश्वास पुन्हा कायम होईल. मुदगल समितीच्या अहवालात प्रथमदृष्ट्या श्रीनिवासन दोषी आढळले, तरीही त्यांनी पदाचा राजीनामा दिला नाही. आयपीएलमध्ये पाररदर्शीपणा आणायचा झाल्यास रमन यांना हटविण्याची गरज आहे. बोर्डाकडे तपासाची कुठलीही साधने नसल्यामुळे सीबीआय चौकशी हाच पर्याय उरतो, असे मनोहर यांचे मत होते. निलंबित दोन्ही संघांची मालकी बीसीसीआय सांभाळू शकते काय, या शंकेबाबत विचारताच ते म्हणाले, की बोर्डाचे नियम अशी परवानगी देत नाहीत. बीसीसीआयचा अधिकारी खेळाडूंच्या लिलावात सहभागी होऊ शकत नाही. अशी भूमिका दुटप्पी ठरत असल्याने लोकांचा रोष वाढेल. जे वाद उद्भवले त्यासाठी आयपीएल जबाबदार नसल्याचे स्पष्ट करीत ही स्पर्धा सुरू राहायला हवी, असे मनोहर यांनी सांगितले.(वृत्तसंस्था)२०१३ मध्ये स्पॉट फिक्सिंग व सट्टेबाजी प्रकरण उजेडात आले तेव्हाच मनोहर यांनी बोर्डाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला हवा होता. कुठलीही व्यक्ती संस्थेपेक्षा मोठी नसते. त्यांनी खतपाणी घातल्यामुळेच अनेक वाद उत्पन्न झाले. त्यांनी तर आयसीसी चेअरमनपदावरून ताबडतोब दूर व्हायला हवे.- शशांक मनोहर, माजी बीसीसीआय अध्यक्ष