शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

श्रीनिवासन हेच सर्व वादाचे मूळ

By admin | Updated: July 19, 2015 01:04 IST

भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांपासून जी घाण साचली ती श्रीनिवासन यांच्यामुळेच. स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीसारखी प्रकरणे बाहेर आल्यानंतर क्रिकेटची

कोलकाता : ‘‘भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांपासून जी घाण साचली ती श्रीनिवासन यांच्यामुळेच. स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीसारखी प्रकरणे बाहेर आल्यानंतर क्रिकेटची बदनामी होऊनही बीसीसीआयने मौन पाळले. स्वच्छ आणि पारदर्शी कारभारासाठी श्रीनिवासन यांनी कुठलीही पावले उचलली नाहीत, शिवाय अध्यक्षपदी चिटकून राहिले. त्यांनी आयसीसी चेअरमनपदही भूषविले. सर्व वादाचे मूळ ते स्वत: आहेत. त्यांनी आयसीसी चेअरमनपद सोडून द्यायला हवे,’’ अशी घाणाघाती टीका बोर्डाचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. शशांक मनोहर यांनी शनिवारी केली.श्रीनिवासन यांच्याविरुद्ध उघडपणे बंडाचे निशाण फडकविणारे मनोहर यांनी बीसीसीआयमधील घाण स्वच्छ करायची झाल्यास लोढा समितीच्या शिफारशी लागू करणे, हाच एकमेव पर्याय असल्याचे सांगितले.काल रात्री बीसीसीआय प्रमुख जगमोहन दालमिया यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत आयपीएलचे सीईओ सुंदर रमन यांची ताबडतोब उचलबांगडी व्हावी, तसेच बोर्डातील व्यवहाराची सीबीआय चौकशी झाल्यास लोकांचा क्रिकेटवरील विश्वास पुन्हा कायम होईल. मुदगल समितीच्या अहवालात प्रथमदृष्ट्या श्रीनिवासन दोषी आढळले, तरीही त्यांनी पदाचा राजीनामा दिला नाही. आयपीएलमध्ये पाररदर्शीपणा आणायचा झाल्यास रमन यांना हटविण्याची गरज आहे. बोर्डाकडे तपासाची कुठलीही साधने नसल्यामुळे सीबीआय चौकशी हाच पर्याय उरतो, असे मनोहर यांचे मत होते. निलंबित दोन्ही संघांची मालकी बीसीसीआय सांभाळू शकते काय, या शंकेबाबत विचारताच ते म्हणाले, की बोर्डाचे नियम अशी परवानगी देत नाहीत. बीसीसीआयचा अधिकारी खेळाडूंच्या लिलावात सहभागी होऊ शकत नाही. अशी भूमिका दुटप्पी ठरत असल्याने लोकांचा रोष वाढेल. जे वाद उद्भवले त्यासाठी आयपीएल जबाबदार नसल्याचे स्पष्ट करीत ही स्पर्धा सुरू राहायला हवी, असे मनोहर यांनी सांगितले.(वृत्तसंस्था)२०१३ मध्ये स्पॉट फिक्सिंग व सट्टेबाजी प्रकरण उजेडात आले तेव्हाच मनोहर यांनी बोर्डाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला हवा होता. कुठलीही व्यक्ती संस्थेपेक्षा मोठी नसते. त्यांनी खतपाणी घातल्यामुळेच अनेक वाद उत्पन्न झाले. त्यांनी तर आयसीसी चेअरमनपदावरून ताबडतोब दूर व्हायला हवे.- शशांक मनोहर, माजी बीसीसीआय अध्यक्ष