शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
भारत-सीरिया राजकीय संबंधांच्या नव्या पर्वाला सुरुवात, भारताचा फायदा काय? समजून घ्या
4
भर रस्त्यात कारचं पार्किंग, स्टेअरिंगवर चक्क कुत्रा! अंधेरीच्या लोखंडवालामध्ये अजब प्रकार; व्हिडिओ व्हायरल...
5
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
6
पहिला श्रावण गुरुवार: ८ राशींना चौफेर लाभ, भाग्याची साथ; भरघोस भरभराट, स्वामींची अपार कृपा!
7
ज्योतिबा डोंगरावर चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा सुरू; पहा आईचे विलोभनीय रूप!
8
Kamchatka Tsunami : जगाचा छोटासा कोपरा बनला भूकंपाचा अड्डा, एका झटक्यात 'या' १२ देशांना हादरवलं! त्सुनामीचा अलर्ट जारी
9
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
10
महिलेचा कारनामा, एकाच वेळी २० युवकांना लावला चुना; प्रेमात फसवून प्रत्येकाकडून iPhone घेतले, मग...
11
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
12
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
13
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
14
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
15
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
16
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
17
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
18
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
19
ITR भरल्यानंतर आता तासाभरात परतावा! आयकर विभागाचा स्पीड पाहून नागरिक थक्क, जाणून घ्या कसं झालं शक्य?
20
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 

श्रीनिवासन हेच सर्व वादाचे मूळ

By admin | Updated: July 19, 2015 01:04 IST

भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांपासून जी घाण साचली ती श्रीनिवासन यांच्यामुळेच. स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीसारखी प्रकरणे बाहेर आल्यानंतर क्रिकेटची

कोलकाता : ‘‘भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांपासून जी घाण साचली ती श्रीनिवासन यांच्यामुळेच. स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीसारखी प्रकरणे बाहेर आल्यानंतर क्रिकेटची बदनामी होऊनही बीसीसीआयने मौन पाळले. स्वच्छ आणि पारदर्शी कारभारासाठी श्रीनिवासन यांनी कुठलीही पावले उचलली नाहीत, शिवाय अध्यक्षपदी चिटकून राहिले. त्यांनी आयसीसी चेअरमनपदही भूषविले. सर्व वादाचे मूळ ते स्वत: आहेत. त्यांनी आयसीसी चेअरमनपद सोडून द्यायला हवे,’’ अशी घाणाघाती टीका बोर्डाचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. शशांक मनोहर यांनी शनिवारी केली.श्रीनिवासन यांच्याविरुद्ध उघडपणे बंडाचे निशाण फडकविणारे मनोहर यांनी बीसीसीआयमधील घाण स्वच्छ करायची झाल्यास लोढा समितीच्या शिफारशी लागू करणे, हाच एकमेव पर्याय असल्याचे सांगितले.काल रात्री बीसीसीआय प्रमुख जगमोहन दालमिया यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत आयपीएलचे सीईओ सुंदर रमन यांची ताबडतोब उचलबांगडी व्हावी, तसेच बोर्डातील व्यवहाराची सीबीआय चौकशी झाल्यास लोकांचा क्रिकेटवरील विश्वास पुन्हा कायम होईल. मुदगल समितीच्या अहवालात प्रथमदृष्ट्या श्रीनिवासन दोषी आढळले, तरीही त्यांनी पदाचा राजीनामा दिला नाही. आयपीएलमध्ये पाररदर्शीपणा आणायचा झाल्यास रमन यांना हटविण्याची गरज आहे. बोर्डाकडे तपासाची कुठलीही साधने नसल्यामुळे सीबीआय चौकशी हाच पर्याय उरतो, असे मनोहर यांचे मत होते. निलंबित दोन्ही संघांची मालकी बीसीसीआय सांभाळू शकते काय, या शंकेबाबत विचारताच ते म्हणाले, की बोर्डाचे नियम अशी परवानगी देत नाहीत. बीसीसीआयचा अधिकारी खेळाडूंच्या लिलावात सहभागी होऊ शकत नाही. अशी भूमिका दुटप्पी ठरत असल्याने लोकांचा रोष वाढेल. जे वाद उद्भवले त्यासाठी आयपीएल जबाबदार नसल्याचे स्पष्ट करीत ही स्पर्धा सुरू राहायला हवी, असे मनोहर यांनी सांगितले.(वृत्तसंस्था)२०१३ मध्ये स्पॉट फिक्सिंग व सट्टेबाजी प्रकरण उजेडात आले तेव्हाच मनोहर यांनी बोर्डाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला हवा होता. कुठलीही व्यक्ती संस्थेपेक्षा मोठी नसते. त्यांनी खतपाणी घातल्यामुळेच अनेक वाद उत्पन्न झाले. त्यांनी तर आयसीसी चेअरमनपदावरून ताबडतोब दूर व्हायला हवे.- शशांक मनोहर, माजी बीसीसीआय अध्यक्ष