शहरं
Join us  
Trending Stories
1
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
2
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
3
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
4
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
5
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
6
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
7
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
8
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
9
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
10
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
11
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
12
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
13
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
14
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
15
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
16
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
17
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
18
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
19
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
20
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!

श्रीलंका भारताला कडवे आव्हान देईल

By admin | Updated: August 4, 2015 22:54 IST

श्रीलंका संघ मायदेशातील वातावरणात भारतापुढे कडवे आव्हान निर्माण करेल आणि पाहुण्या संघाला विजयासाठी सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल,

कोची : श्रीलंका संघ मायदेशातील वातावरणात भारतापुढे कडवे आव्हान निर्माण करेल आणि पाहुण्या संघाला विजयासाठी सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल, अशी प्रतिक्रिया श्रीलंकेचा माजी कर्णधार व आक्रमक फलंदाज सनथ जयसूर्याने व्यक्त केली. श्रीलंकेला अलीकडे पाकिस्तानविरुद्ध कसोटी, टी-२० आणि वन-डे सामन्यांच्या मालिकेत पराभव स्वीकारावा लागला. आता भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध १२ आॅगस्टपासून तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. जयसूर्या म्हणाला, ‘‘पाकिस्तानविरुद्ध आम्हाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही, हे निराशाजनक आहे. श्रीलंका संघ सध्या अडचणीच्या स्थितीत आहे, पण मायदेशात हा संघ चांगली कामगिरी करेल आणि भारतापुढे आव्हान निर्माण करेल, असा मला विश्वास आहे.’’कोचीमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेला जयसूर्या म्हणाला, ‘‘श्रीलंका संघाला सध्या अनुभवी खेळाडूंची उणीव भासत आहे, पण संघातील उर्वरित खेळाडू शानदार कामगिरी करतील, अशी आशा आहे. श्रीलंका क्रिकेटसाठी भारताविरुद्धची मालिका महत्त्वाची असून यजमान संघ या मालिकेत चमकदार कामगिरी करेल, असा विश्वास आहे.’’जयसूर्या म्हणाला, ‘‘भारतीय संघ सध्या शानदार कामगिरी करीत आहे. त्यामुळे या मालिकेत श्रीलंका संघापुढे कडवे आव्हान राहील, यात शंकाच नाही, पण श्रीलंका संघाला मायदेशात खेळण्याचा लाभ मिळेल.’’ श्रीलंका संघात जेहान मुबारकच्या पुनरागमनाबाबत बोलताना जयसूर्या म्हणाला, ‘‘श्रीलंकेत प्रतिभावान युवा खेळाडू नाहीत, असे तुमचे मत असेल, पण ते चुकीचे आहे. आमच्याकडे चांगले युवा खेळाडू आहेत, पण परिस्थितीनुरूप आम्हाला फलंदाजीमध्ये अनुभवाच्या आधारावर खेळाडूंची निवड करावी लागते. जेहान मुबारकच्या पुनरागमनाचा संघाला नक्कीच लाभ मिळेल.’’ (वृत्तसंस्था)