शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

श्रीलंकेचा डाव १८३ धावांत आटोपला

By admin | Updated: August 12, 2015 15:38 IST

आर.अश्विनच्या प्रभाव फिरकीमुळे पहिल्या कसोटीत श्रीलंकेचा डाव अवघ्या १८३ धावांत संपुष्टात आला.

ऑनलाइन लोकमत

गाले, दि. १२ -  आर.अश्विनचे सहा बळी आणि शिखर धवनचे अर्धशतक (५३), विराट कोहली नाबाद ४५ धावांच्या जोरावर श्रीलंके विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी भारताने वर्चस्व राखले. आजच्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी भारत ३४ षटकात दोन बाद १२८ अश्या मजबूत स्थितीत होता. भारताकडून रोहित शर्मा आणि लोकेश राहुल अपयशी ठरले. तर शिखर धवन आणि विराट कोहली यांच्या शतकी भागीदारीने भारत मजबूत स्थितीत आहे.

 नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या श्रीलंकेने सावध सुरूवात केली खरी पण सहाव्या षटकात करुणारत्ने आणि पुढच्याच षटकात सिल्वा बाद झाला आणि त्यानंतर श्रीलंकेचा निम्मा संघ अवघ्या ६४ धावांत तंबूत परतला. 

त्यानंतर अँजलो मॅथ्यूजने (६४) कर्णधारपदाला साजेशी खेळी करत श्रीलंकेचा डावा सावरायचा प्रयत्न केला त्याला चंडीमलची (५९) साथ मिळाली. मात्र ते बाद झाले आणि श्रीलंकेचा डाव १८३ धावांत आटोपला.

श्रीलंकेतर्फे करुणारत्नेने (९), सिल्वा (५), थिरीमने (१३), संगकारा (५), मुबारक (०) मोठी खेळी करण्यास अपयशी ठरले.  

भारताकडून आर अश्विनने सहा बळी घेतले. अमित मिश्राने २, वरूण अॅरॉन व इशांत शर्माने प्रत्येकी १ बळी घेतला.

अश्विनच्या फिरकीची जादू चालल्याने श्रीलंकेचा डाव थोडक्यात आटोपला आणि भारताने पहिल्या दिवशी कसोटीवर पकड मिळवली.

धावफलक :- 

श्रीलंका ४९.४ षटकात सर्वबाद १८३

( अँजलो मॅथ्यूजने ६४, चंडीमलची ५९, हेरथ २३, थिरीमने १३ 

आर अश्विन - १३.४-०२-४६-०६, अमित मिश्रा - ०६-०१-२०-०२ )

भारत ३४ षटकात दोन बाद १२८

शिखर धवन नाबाद ५३, विराट कोहली नाबाद ४५