शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

क्रीडा रणजी

By admin | Updated: February 21, 2015 00:50 IST

तामिळनाडूची उपांत्य फेरीत धडक

तामिळनाडूची उपांत्य फेरीत धडक
रणजी करंडक क्रिकेट : विदर्भ पराभव टाळण्यात यशस्वी
जयपूर : तामिळनाडूने शुक्रवारी विदर्भाविरुद्ध अनिर्णित संपलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत पहिल्या डावातील १४४ धावांच्या आघाडीच्या आधारावर रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. तामिळनाडू संघाने या लढतीत सुरुवातीपासून वर्चस्व गाजवले. विदर्भाला अखेरच्या दिवशी विजयासाठी ४११ धावांचे लक्ष्य मिळाले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना विदर्भाची ८ बाद १४२ अशी अवस्था असताना उभय कर्णधारांनी सामना अनिर्णित संपल्याचे मान्य केले. तामिळनाडूने पहिल्या डावात ४०३ धावांची मजल मारली होती. प्रत्युत्तरात खेळताना विदर्भाचा पहिला डाव २५९ धावांत संपुष्टात आला. तामिळनाडूने पहिल्या डावात १४४ धावांची मिळविलेली आघाडी अखेर निर्णायक ठरली.
कालच्या ६ बाद १९३ धावसंख्येवरून पुढे खेळताना तामिळनाडूचा दुसरा डाव आज शेवटच्या दिवशी २६६ धावांत संपुष्टात आला. विदर्भातर्फे स्वप्नील बंडीवारने ४२ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले तर रवीकुमार ठाकूर व राकेश ध्रुव यांनी प्रत्येकी २ फलंदाजांना माघारी परतवले. ४११ धावांच्या अशक्यप्राय आव्हानाचा पाठलाग करताना विदर्भाची ४ बाद ६८ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर गणेश सतीशने (नाबाद ५९) अर्धशतकी खेळी करीत विदर्भाचा पराभव टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या अर्धशतकी खेळीत ६ चौकारांचा समावेश आहे. शलभ श्रीवास्तव (३३) आणि राकेश ध्रुव (२२) यांचेही योगदान उल्लेखनीय ठरले. तामिळनाडूतर्फे बाबा अपराजितने ४१ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. प्रशांत परमेश्वरनने २ तर लक्ष्मीपती बालाजी व मालोलन रंगराजन यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला माघारी परतवले. (वृत्तसंस्था)