शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

क्रीडा रणजी

By admin | Updated: February 21, 2015 00:50 IST

तामिळनाडूची उपांत्य फेरीत धडक

तामिळनाडूची उपांत्य फेरीत धडक
रणजी करंडक क्रिकेट : विदर्भ पराभव टाळण्यात यशस्वी
जयपूर : तामिळनाडूने शुक्रवारी विदर्भाविरुद्ध अनिर्णित संपलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत पहिल्या डावातील १४४ धावांच्या आघाडीच्या आधारावर रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. तामिळनाडू संघाने या लढतीत सुरुवातीपासून वर्चस्व गाजवले. विदर्भाला अखेरच्या दिवशी विजयासाठी ४११ धावांचे लक्ष्य मिळाले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना विदर्भाची ८ बाद १४२ अशी अवस्था असताना उभय कर्णधारांनी सामना अनिर्णित संपल्याचे मान्य केले. तामिळनाडूने पहिल्या डावात ४०३ धावांची मजल मारली होती. प्रत्युत्तरात खेळताना विदर्भाचा पहिला डाव २५९ धावांत संपुष्टात आला. तामिळनाडूने पहिल्या डावात १४४ धावांची मिळविलेली आघाडी अखेर निर्णायक ठरली.
कालच्या ६ बाद १९३ धावसंख्येवरून पुढे खेळताना तामिळनाडूचा दुसरा डाव आज शेवटच्या दिवशी २६६ धावांत संपुष्टात आला. विदर्भातर्फे स्वप्नील बंडीवारने ४२ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले तर रवीकुमार ठाकूर व राकेश ध्रुव यांनी प्रत्येकी २ फलंदाजांना माघारी परतवले. ४११ धावांच्या अशक्यप्राय आव्हानाचा पाठलाग करताना विदर्भाची ४ बाद ६८ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर गणेश सतीशने (नाबाद ५९) अर्धशतकी खेळी करीत विदर्भाचा पराभव टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या अर्धशतकी खेळीत ६ चौकारांचा समावेश आहे. शलभ श्रीवास्तव (३३) आणि राकेश ध्रुव (२२) यांचेही योगदान उल्लेखनीय ठरले. तामिळनाडूतर्फे बाबा अपराजितने ४१ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. प्रशांत परमेश्वरनने २ तर लक्ष्मीपती बालाजी व मालोलन रंगराजन यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला माघारी परतवले. (वृत्तसंस्था)