शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा रणजी

By admin | Updated: February 21, 2015 00:50 IST

तामिळनाडूची उपांत्य फेरीत धडक

तामिळनाडूची उपांत्य फेरीत धडक
रणजी करंडक क्रिकेट : विदर्भ पराभव टाळण्यात यशस्वी
जयपूर : तामिळनाडूने शुक्रवारी विदर्भाविरुद्ध अनिर्णित संपलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत पहिल्या डावातील १४४ धावांच्या आघाडीच्या आधारावर रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. तामिळनाडू संघाने या लढतीत सुरुवातीपासून वर्चस्व गाजवले. विदर्भाला अखेरच्या दिवशी विजयासाठी ४११ धावांचे लक्ष्य मिळाले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना विदर्भाची ८ बाद १४२ अशी अवस्था असताना उभय कर्णधारांनी सामना अनिर्णित संपल्याचे मान्य केले. तामिळनाडूने पहिल्या डावात ४०३ धावांची मजल मारली होती. प्रत्युत्तरात खेळताना विदर्भाचा पहिला डाव २५९ धावांत संपुष्टात आला. तामिळनाडूने पहिल्या डावात १४४ धावांची मिळविलेली आघाडी अखेर निर्णायक ठरली.
कालच्या ६ बाद १९३ धावसंख्येवरून पुढे खेळताना तामिळनाडूचा दुसरा डाव आज शेवटच्या दिवशी २६६ धावांत संपुष्टात आला. विदर्भातर्फे स्वप्नील बंडीवारने ४२ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले तर रवीकुमार ठाकूर व राकेश ध्रुव यांनी प्रत्येकी २ फलंदाजांना माघारी परतवले. ४११ धावांच्या अशक्यप्राय आव्हानाचा पाठलाग करताना विदर्भाची ४ बाद ६८ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर गणेश सतीशने (नाबाद ५९) अर्धशतकी खेळी करीत विदर्भाचा पराभव टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या अर्धशतकी खेळीत ६ चौकारांचा समावेश आहे. शलभ श्रीवास्तव (३३) आणि राकेश ध्रुव (२२) यांचेही योगदान उल्लेखनीय ठरले. तामिळनाडूतर्फे बाबा अपराजितने ४१ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. प्रशांत परमेश्वरनने २ तर लक्ष्मीपती बालाजी व मालोलन रंगराजन यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला माघारी परतवले. (वृत्तसंस्था)