शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

खेळाडू आरक्षणाच्या प्रमाणपत्रासाठी क्रीडा विभागाची दुकानदारी

By admin | Updated: December 18, 2014 05:10 IST

खेळाडूंना सुरक्षित नोकरीची हमी मिळून त्यांचा जास्तीत जास्त वेळ खेळामधील कौशल्य मिळविण्यासाठी देता यावा

शिवाजी गोरे, पुणेखेळाडूंना सुरक्षित नोकरीची हमी मिळून त्यांचा जास्तीत जास्त वेळ खेळामधील कौशल्य मिळविण्यासाठी देता यावा, या हेतूने सुरू केलेल्या पाच टक्के खेळाडू आरक्षणासाठी क्रीडा विभागातूनच दुकानदारी सुरू आहे. क्रीडा विभागातील काही कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या ‘अर्थपूर्ण’ मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर या खेळाडूंवर वणवण भटकण्याची वेळ येत आहे. तायक्वांदोमध्ये राज्य पातळीवर पदके मिळवीत राष्ट्रीय पातळीवर खेळण्याची जिद्द बाळगणारा पृथ्वीराज फडतरे हा खेळाडू क्रीडाविभागाकडून ‘गहाळ’ झालेली प्रमाणपत्रे शोधण्यासाठी वणवण भटकत आहे. फडतरे या खेळाडूची ही प्रातिनिधिक कथा. लालफितशाहीमध्ये क्रीडा विभागातील सर्वाधिक महत्त्वाचा असलेला खेळाडू हाच घटक किती दुर्लक्षित आहे, हे दाखविणारी. सातारा जिल्ह्यातील वडूज गावचा असलेल्या पृथ्वीराजची हातातोंडाशी आलेली एक नोकरी तर गेली आहे. तर, दुसऱ्या नोकरीसाठी २०१० पासून आत्तापर्यंत किमान ३० ते ३५ वेळा चकरा माराव्या लागल्या आहेत. आता तर त्याला क्रीडा विभागाकडून सांगण्यात आले आहे, की, तुझी तीन प्रमाणपत्रे गहाळ झाली आहेत. तू दिलेल्या फाइलमध्ये नाहीत. पृथ्वीराजने शासनाच्या खेळाडू प्रवर्गात ५ टक्के आरक्षण अंतर्गत नोकरीसाठी पहिला अर्ज नवी मुंबई पोलीस खात्यात २०१०मध्ये केला होता. २० डिसेंबर २०१० मध्ये नेमणुकीचे पत्र आले. क्रीडा संचालनालयाने त्याची सर्व प्रमाणपत्रे मागविली. ती जुलै २०११मध्ये प्रमाणपत्र पडताळणीसाठी पाठविले. तोपर्यंत नवी मुंबई पोलीस खात्याने प्रमाणपत्राची पडताळणीची कागदपत्रे क्रीडा खात्याकडून वेळेवर न आल्यामुळे पृथ्वीराजच्या जागी दुसऱ्याचे नाव दाखल केले. त्यामुळे त्याची नोकरी गेली. पृथ्वीराजने २०१४ मध्ये ठाणे पोलीस दलात नोकरीसाठी अर्ज केला. आॅगस्ट २०१४मध्ये त्याला नेमणुकीचे पत्र मिळाले. आॅगस्टमध्ये त्याची प्रमाणपत्रे क्रीडा खात्याकडे पडताळणीसाठी आली. येरवडा येथील क्रीडा विभागाच्या कार्यालयात त्याला मूळ प्रमाणपत्र (मेरिट सर्टिफिकीट) मागण्यात आले. मागील पडताळणीच्या वेळीच ही प्रमाणपत्रे दिली असल्याचे त्याने सांगितले. ती नवी मुंबईला पाठविली असल्याचे त्याला सांगण्यात आले. नवी मुंबई पोलीस कार्यालयात जाऊन चौकशी केली असता त्यांनी मूळ प्रमाणपत्रे आले नसल्याचे सांगितले गेले. पुन्हा येरवडा कार्यालयात गेल्यावर त्याला क्रीडा आयुक्तालयात पाठविण्यात आले. कागदपत्रांची पडताळणी सुरू असल्याचे सांगण्यात आले. पहिल्या नोकरीप्रमाणे हीसुद्धा नोकरी हातची जाऊ नये म्हणून त्याने क्रीडा खात्याच्या अधिकाऱ्यांना लवकर काम करण्याची विनंती केली. तुझी मूळ प्रमाणपत्रे आणून दे, असे सांगितल्यावर पृथ्वीराजला धक्काच बसला. प्रमाणपत्रे तुमच्याकडेच आहेत, असे त्याने सांगितले. ती आता आम्हाला शोधावी लागतील. पृथ्वीराजला आता काय करावे, हेच सुचेनासे झाले आहे. त्याच्याकडे प्रमाणपत्र व कागदपत्र मिळाल्याची पोहोचपावतीसुद्धा आहे.