शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

फिरकी गोलंदाजी निर्णायक ठरेल

By admin | Updated: March 17, 2016 01:24 IST

आयसीसी टी-२० विश्वचषकात भारताची अत्यंत खराब सुरुवात झाली. न्यूझीलंड संघात झुंजार वृत्ती आहे, हे ध्यानात घेतले तरी धोनी अ‍ॅन्ड कंपनीकडून अशा प्रकारच्या पराभवाची अपेक्षा नव्हती.

- सौरव गांगुली लिहितो़..आयसीसी टी-२० विश्वचषकात भारताची अत्यंत खराब सुरुवात झाली. न्यूझीलंड संघात झुंजार वृत्ती आहे, हे ध्यानात घेतले तरी धोनी अ‍ॅन्ड कंपनीकडून अशा प्रकारच्या पराभवाची अपेक्षा नव्हती. नागपूरच्या खेळपट्टीने भारताची चांगलीच ‘फिरकी’ घेतली. मीदेखील नागपुरात बरेच क्रिकेट खेळलो. या खेळपट्टीबाबत टीम इंडिया नव्हे, तर मलादेखील आश्चर्याचा धक्का बसला. खेळपट्टी टर्न घेते, पण किती टर्न व्हावी. क्युरेटरनेदेखील याची कल्पना केली नसावी. या खेळपट्टीवर धावांचा पाठलाग खरोखर कठीण होता.या खेळपट्टीवरील भारताची फलंदाजी चर्चेचा विषय असेलही, पण न्यूझीलंडलादेखील श्रेय दिले पाहिजे. हा संघ चांगलाच खेळला व समतोल संघ आहे. फलंदाजी फळीत कॉलीन मुन्रो, मार्टिन गुप्टिल, कोरी अँडरसन, रॉस टेलर केन विल्यम्सन आणि ग्रँट इलियट हे चांगल्या धावा काढू शकतात. चेंडूवर नियंत्रण मिळविणारे चांगले फिरकी गोलंदाज संघात आहेत. भारतीय उपखंडात व विश्वचषकात फिरकी महत्त्वाची भूमिका बजावेल. न्यूझीलंडने याची झलक दिली. नाथन मॅक्युलम, ईश सोधी आणि मिशेल सेन्टनर हे स्पर्धेत प्रत्येक सामन्यात मोलाची भूमिका बजावू शकतात. न्यूझीलंडच्या निवडकर्त्यांनी हे हेरले असावे. त्यामुळे भारताविरुद्ध तिघांनाही संधी दिली. परिस्थितीचा त्यांनी चांगला वेध घेतलेला दिसतो. या बळावर भारतावर सलग पाचवा टी-२० विजय नोंदविण्यात यश आले.विश्वचषकाची सुरुवात पराभवाने झाल्यानंतर अंतिम चार संघांत स्थान मिळविण्यासाठी भारताला आता प्रत्येक सामना जिंकण्याचे आव्हान असेल. इडन आणि मोहालीतील खेळपट्ट्यांवर मोठ्या खेळी करीत अनुभवी भारतीयांना उपांत्य फेरी गाठता येईल. पण त्यासाठी फटका मारण्यापूर्वी चेंडूचा वेध घेणे गरजेचे राहील. टी-२० ला हवी असलेली फलंदाजी विजयाचा आनंद मिळवून देते हेदेखील खरे.(गेमप्लान)