शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ दहशतवादी हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचा मोठा गौप्यस्फोट; पाकिस्तानवर सैन्य कारवाई का नाही?
2
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
3
"या योजनेचं आम्ही स्वागत करतो"; ट्रम्प यांच्या 'गाझा शांतता योजने'वर PM मोदींनी काय मांडली भूमिका?
4
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
5
या स्वस्त सात सीटर कारला मिळाले फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग; मारुती अर्टिगापेक्षा खूपच सुरक्षित, भारत एनकॅपमध्ये चाचणी...
6
ईव्हीचा 'सायलेंट धोका' संपणार! इलेक्ट्रिक वाहनांसाठी AVAS ध्वनी प्रणाली अनिवार्य होणार? काय आहे प्रकार?
7
मंजूचा मृतदेह बेडवर, तर पतीचा लटकलेला; रात्री खोलीत दोघांचे मृतदेह पाहून वडील हादरले
8
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निफ्टी ८० अंकांनी वधारला, मेटल-आयटी शेअर्समध्ये जोरदार खरेदी
10
October Baby Astro: कसे असतात ऑक्टोबरमध्ये जन्माला आलेले लोक? स्वभाव, गुण, दोष; सगळंच जाणून घ्या
11
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
12
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
14
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
15
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
16
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
17
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
18
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
19
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
20
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?

विशेष विजय : कोहली

By admin | Updated: December 8, 2015 02:23 IST

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात ३३७ धावांनी मिळवलेल्या विजयासाठी संघाला मेहनत घ्यावी लागली. त्यामुळे हा विजय विशेष आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात ३३७ धावांनी मिळवलेल्या विजयासाठी संघाला मेहनत घ्यावी लागली. त्यामुळे हा विजय विशेष आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली. भारताने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत ३-० ने विजय मिळवला. पहिला व तिसरा कसोटी सामना तीन दिवसांमध्ये संपला तर चौथा कसोटी सामना पाच दिवस रंगला. बेंगळुरू कसोटी सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णीत संपला. पुरस्कार वितरण समारंभानंतर बोलताना कोहली म्हणाला, ‘सर्वंच विजय महत्त्वाचे असतात, पण हा विजय अधिक महत्त्वाचा आहे. कारण यासाठी बराच घाम गाळावा लागला. दक्षिण आफ्रिका संघाने सामना अनिर्णीत राखण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मी गोलंदाजांना आक्रमक गोलंदाजी करण्याचा सल्ला दिला आणि चहापानंतर त्यांनी तेच केले.’कोहली म्हणाला,‘मला दक्षिण आफ्रिकेच्या रणनीतीचे आश्चर्य वाटले. गोलंदाजांनी संयम ढळू न देता अचूक मारा केला. गोलंदाज आपल्या कामगिरीचा अभिमान बाळगू शकतात. संयम राखण्याचे दुसरे नाव कसोटी क्रिकेट आहे. मी एकटा काही करू शकत नाही, विजयाचे श्रेय सर्व ११ खेळाडूंना जाते.’कोहली पुढे म्हणाला,‘गोलंदाजांची पाठराखण करणे गरजेचे आहे. आमच्याकडे वेगवान मारा करणारे गोलंदाज आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना चांगली कामगिरी करण्याची संधी मिळते. आज त्यांनी तेच केले.’चौथ्या कसोटी सामन्यात दोन्ही डावात शतकी खेळी करणारा अजिंक्य रहाणे सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. रहाणे म्हणाला,‘मी एकाग्रता कायम राखली. मी नेहमी खेळामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील असतो. तंत्रावर विश्वास असेल तर निकाल अनुकूल मिळतात.’

मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरलेला रविचंद्रन आश्विन म्हणाला,‘मला आनंद झाला. चांगल्या मालिकेचा शानदार शेवट झाला. दक्षिण आफ्रिका संघाने सामना अनिर्णीत राखण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. आम्ही चांगली मेहनत घेतली व अखेर विजय मिळवण्यात यशस्वी ठरलो. दुसऱ्या टोकाकडून रवींद्र जडेजाची चांगली साथ लाभली.’आश्विन पुढे म्हणाला,‘खेळपट्टीवर चेंडूला अधिक उसळी मिळत नव्हती. मला जडेजाची चांगली साथ लाभली. उमेशनेही आज चांगला मारा केला.’