शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
2
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
3
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
4
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
5
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
6
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
7
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
8
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
9
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
10
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
11
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
12
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
13
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
14
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
15
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
16
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
17
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
18
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
19
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

केदारविरुद्ध विशेष योजना

By admin | Updated: March 15, 2017 01:13 IST

महाराष्ट्राचा संघ चांगला असून त्यांच्याविरुद्ध अटीतटीची लढत होईल. त्यांचा स्टार फलंदाज केदार जाधव सध्या फॉर्ममध्ये असून त्याच्याविरुद्ध विशेष योजना

नवी दिल्ली : महाराष्ट्राचा संघ चांगला असून त्यांच्याविरुद्ध अटीतटीची लढत होईल. त्यांचा स्टार फलंदाज केदार जाधव सध्या फॉर्ममध्ये असून त्याच्याविरुद्ध विशेष योजना आम्ही आखल्या आहेत, अशी माहिती पश्चिम बंगालचा कर्णधार मनोज तिवारी याने दिली.बुधवारी विजय हजारे चषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पश्चिम बंगाल महाराष्ट्रविरुद्ध भिडेल. या सामन्याआधी तिवारीने आपली प्रतिक्रिया दिली. भारताकडून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चमक दाखवलेला केदार इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासून सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यामुळेच, महाराष्ट्राच्या कर्णधाराला रोखण्यासाठी पश्चिम बंगाल कोणतीही कसर ठेवणार नाही. तिवारीने म्हटले, ‘‘केदार मॅचविनर असल्याचे सिद्ध झाले आहे. शिवाय तो प्रतिस्पर्धी संघातील सर्वात धोकादायक फलंदाज आहे, यावर कोणतेही दुमत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेगवान गोलंदाज मारा करीत असताना त्याला बाद करणे आवश्यक आहे. डावाच्या सुरुवातीला तो अडखळतो आणि आम्हाला याच गोष्टीचा फायदा घ्यायचा आहे.’’ त्याचप्रमाणे, ‘‘आम्ही ५ प्रमुख गोलंदाजांसह खेळणार असून मी, प्रग्यान ओझा आणि आमिर गनी या आमच्या फिरकी जोडीला केदारला गोलंदाजी करताना लेंथ तपासण्याबाबत सूचना दिली आहे. त्याला स्वीप फटका खेळण्याची संधी न देण्याबाबतही सांगितले आहे.’’ तिवारी म्हणाला, ‘‘केदार पारंपरिक आणि रिव्हर्स स्वीप खूप चांगल्या प्रकारे खेळतो. त्यामुळे या फटक्यांपासून त्याला रोखणे गरजेचे आहे. शिवाय महाराष्ट्र संघाकडे आतापर्यंत ४०१ धावा काढलेला युवा फलंदाज ॠतुराज गायकवाडही आहे.’’ (वृत्तसंस्था)