शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

शिर्के, गांगुली यांना घ्यावा लागणार ब्रेक

By admin | Updated: January 13, 2017 01:27 IST

लोढा समितीने प्रशासकीय सुधारणांबाबत बीसीसीआयसाठी सात बाबी अनिवार्य करताना स्पष्ट केले की

नवी दिल्ली : लोढा समितीने प्रशासकीय सुधारणांबाबत बीसीसीआयसाठी सात बाबी अनिवार्य करताना स्पष्ट केले की, बीसीसीआयचे पदमुक्त सचिव अजय शिर्के यांना बीसीसीआयच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे प्रतिनिधित्व करता येणार नाही. बंगाल क्रिकेट संघटनेचे (कॅब) अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यासाठीही विशेष आनंदाचे वृत्त नाही. कारण जून २०१७ नंतर त्याला तीन वर्षांसाठी अनिवार्य ब्रेकला सामोरे जावे लागणार आहे. कारण राज्य संघटनेचे सचिव व अध्यक्ष म्हणून त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. त्याचसोबत स्पष्ट करण्यात आले आहे की, क्रिकेट प्रशासनातील कार्यकाळ (राज्य व बीसीसीआय) संयुक्तपणे नऊ वर्षे राहणार आहे. सुरुवातीला हा कार्यकाळ १८ वर्षांचा राहणार असल्याचे म्हंटले गेले होते. कॅबचे कोषाध्यक्ष विश्वरूप डे यांची प्रशासकीय कारकीर्द संपुष्टात आली आहे. कारण दोन वर्षे सहायक सचिव म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे. सहायक सचिव हे पदाधिकारी पद मानले गेले आहे. त्यामुळे राज्य संघटनेत त्यांचा संयुक्त कार्यकाळ १० वर्षांचा झालेला आहे. राजस्थान क्रिकेट संघटना व हैदराबाद क्रिकेट संघटनेबाबत विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात बोलताना समितीने स्पष्ट केले की, जर एखाद्या संघटनेविरुद्ध कुठले प्रकरण प्रलंबित नसेल तर तेथे नव्या सुधारणेसह निवडणूक घेता येईल. छत्तीसगड राज्य संघटनेचे अध्यक्ष बलदेव भाटिया यांना अनिवार्य ब्रेक घ्यावा लागणार आहे. कारण राज्य संघटनेच्या सदस्यपदाचा त्यांचा कार्यकाळ जोडण्यात आला आहे. दरम्यान, बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत असलेल्या गांगुलीबाबत बोलताना समितीने स्पष्ट केले की, काही महिन्यांसाठी त्यांना बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषविता येईल. (वृत्तसंस्था) जर एखादा व्यक्ती कुठल्या राज्य संघटनेचा सदस्य म्हणून दोन वर्षे पदाधिकारी असेल तर त्या व्यक्तीला तीन वर्षांच्या ब्रेकचा नियम लागू न करता पुढील निवडणूक लढण्यासाठी पात्र ठरेल का? याचे उत्तर हो असेल तर त्याचा कार्यकाळ किती राहील? याबाबत समितीने स्पष्ट केले की, जर निवडणुकीच्या वेळी या पदाधिकाऱ्याने तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेला नसेल तर तो निवडणूक लढवण्यास पात्र आहे, पण त्याला कार्यकाळ पूर्ण करता येणार नाही. सलग तीन वर्षे पूर्ण केल्यानंतर त्याला ताबडतोब पद सोडावे लागेल. पदाचा चुकीचा वापर करू नये यासाठी हे कलम वापरण्यात आले आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास एखादा पदाधिकारी दोन वर्षे व नऊ महिन्यांच्या कार्यकाळानंतर राजीनामा देऊ शकतो आणि तीन महिन्यानंतर पुन्हा नव्या कार्यकाळासाठी दावा सादर करू शकतो. विश्वरूप डे यांचा दावा होता की, त्यांची सहायक सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. ते निवडणुकीमध्ये सहभागी झाले नव्हते. त्यांचा दावा फेटाळून लावताना कॅबच्या घटनेनुसार संयुक्त सचिव हे पदाधिकारी पद असल्याचे मानल्या गेले आहे. (वृत्तसंस्था)  लोढा समितीला सर्वाधिक प्रश्न शिर्के यांच्या प्रवेशाबाबत विचारण्यात आला. अपात्र ठरविण्यात आलेला पदाधिकारी सदस्य संघटना किंवा बीसीसीआयचा प्रतिनिधी किंवा नामनिर्देशित प्रतिनिधी म्हणून भूमिका बजावू शकतो का? अशी व्यक्ती राज्य संघटना किंवा बीसीसीआयतर्फे कुठली भूमिका बजावण्यास पात्र आहे का?  या प्रश्नांचे उत्तर देताना लोढा समितीने स्पष्ट केले की, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश बघितल्यानंतर कुठलाही अपात्र पदाधिकारी क्रिकेट प्रशासनामध्ये सहभागी होऊ शकत नाही. सदस्य संघटना किंवा बीसीसीआयचा प्रतिनिधी म्हणून नामनिर्देशित करण्यासाठी असा पदाधिकारी अपात्र ठरतो. सदस्य संघटना किंवा बीसीसीआयमध्ये अशा व्यक्तीला कुठलीही भूमिका बजावता येणार नाही. संघटनेमध्ये सल्लागार किंवा आश्रयदाते म्हणूनही अशा व्यक्तीला भूमिका बजावता येणार नाही आणि कुठल्या परिषदेचे सदस्यही होता येणार नाही.