शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
4
Mumbai Metro: उद्यापासून आर ते वरळी मेट्रो धावणार, मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
5
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
6
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
7
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
8
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
9
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
10
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
11
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
12
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
13
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
14
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
15
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
16
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
17
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
18
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
19
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
20
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?

शिखर धवन व यादव सर्वोत्तम!

By admin | Updated: March 28, 2015 01:56 IST

विश्वकप क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आॅस्ट्रेलियाविरुद्ध ९५ धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघ जेतेपद राखण्यात अपयशी ठरला.

नवी दिल्ली : विश्वकप क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आॅस्ट्रेलियाविरुद्ध ९५ धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघ जेतेपद राखण्यात अपयशी ठरला. या स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या भारतीय संघातर्फे फलंदाजीमध्ये सलामीवीर शिखर धवन आणि गोलंदाजीमध्ये वेगवान गोलंदाज उमेश यादव यांची कामगिरी सर्वोत्तम ठरली. शिखरने ८ सामन्यांत ५१.५० च्या सरासरीने भारतातर्फे सर्वाधिक ४१२ धावा फटकावल्या. त्यात दोन शतकी आणि एका अर्धशतकी खेळीचा समावेश आहे. उमेश यादवने उपांत्य फेरीत चार बळी घेत सर्वाधिक बळी घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमीला पिछाडीवर सोडले. यादवने ८ सामन्यांत १७.८३ च्या सरासरीने १८ बळी घेतले. क्षेत्ररक्षणामध्ये उमेश यादवने सर्वाधिक ८ झेल टिपले. शिखरने ७, रैनाने ६, शमी, विराट व अजिंक्य रहाणे यांनी प्रत्येकी पाच झेल टिपले. यष्टिरक्षणामध्ये धोनीने यष्टीपाठी १५ बळी घेतले. अंतिम लढतीपूर्वी तो सर्वांत आघाडीवर आहे. अंतिम सामन्यात आॅस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक ब्रॅड हॅडिन व न्यूझीलंडचा यष्टिरक्षक ल्युक रोंची यांना अव्वल स्थान पटकावण्याची संधी आहे. हॅडिनने १४ व रोंचीने १३ बळी घेतले आहेत. भारताने या विश्वकप या स्पर्धेत सर्वाधिक स्कोअर (७ बाद ३०७ धावा) साखळी फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नोंदवला. भारताने बांगलादेश व पाकिस्तानविरुद्धही ३०० धावांचा आकडा गाठला होता. विश्वकप स्पर्धेत सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या नोंदवण्याचा विक्रम शिखर व रोहित यांच्या नावावर संयुक्तपणे आहे. शिखरने मेलबर्नमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १३७ व रोहितने याच मैदानावर बांगलादेशविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत १३७ धावांची खेळी केली होती. शिखरने या स्पर्धेत हॅमिल्टनमध्ये आयर्लंडविरुद्ध १०० धावा केल्या होत्या. भारतातर्फे या स्पर्धेत शतक ठोकणाऱ्या अन्य फलंदाजांमध्ये सुरेश रैना (नाबाद ११०) आणि विराट कोहली (१०७) यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)फलंदाजी...शिखरनंतर रोहित शर्मा (३३०) दुसऱ्या स्थानी आहे; तर विराट कोहली (३०५) तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर सुरेश रैना (२८४), कर्णधार महेंद्रसिंह धोनी (२३७) आणि रहाणे (२०८) यांचा क्रमांक लागतो. गोलंदाजी...उमेश यादवनंतर (१८) मोहम्मद शमी (१७), मोहित शर्मा (१३), रवीचंद्रन आश्विन (१३) आणि रवींद्र जडेजा (९) यांचा क्रमांक लागतो.