शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

शास्त्री यांनी केली विराटची पाठराखण

By admin | Updated: March 31, 2015 23:49 IST

भारतीय संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी टीकाकारांचे लक्ष्य ठरलेल्या विराट कोहलीची पाठराखण केली आहे. विश्वकप स्पर्धेत विराटची कामगिरी आणि त्याची

नवी दिल्ली : भारतीय संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी टीकाकारांचे लक्ष्य ठरलेल्या विराट कोहलीची पाठराखण केली आहे. विश्वकप स्पर्धेत विराटची कामगिरी आणि त्याची महिलामित्र अनुष्का शर्मा याचा काही संबंध नसल्याचे शास्त्री यांनी स्पष्ट केले. शास्त्री म्हणाले, ‘‘असे जर असते तर विराटने आॅस्ट्रेलियात कसोटी मालिकेत ७०० धावा फटकावल्या नसत्या आणि चार शतकेही झळकावली नसती. अन्य खेळाडूंप्रमाणे विराटही शिस्तीचा भोक्ता आहे. त्याच्या हृदयाची स्पंदने केवळ भारतासाठीच आहेत. तो आक्रमक खेळाडू आहे.’’गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्यात निराशाजनक कामगिरीनंतर आॅस्ट्रेलिया दौऱ्यात सूर गवसलेल्या विराटची शास्त्री यांनी प्रशंसा केली. शास्त्री यांनी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचीही प्रशंसा केला. त्याच्या फलंदाजीमध्ये आणखी सुधारणा होईल, असेही ते म्हणाले.शास्त्री यांनी सांगितले, ‘‘धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली असून त्याला आता कामगिरी सुधारण्यावर लक्ष केंद्रित करता येईल. तो आता पूर्वीच्या तुलनेत अधिक फिट होईल आणि फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याच्याकडे पुरेसा वेळ असेल.’’ भारताच्या मार्गात स्टीव्हन स्मिथ नेहमी अडसर ठरला. शास्त्रीने या युवा आॅस्ट्रेलियन फलंदाजाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. शास्त्री म्हणाले, ‘‘अनेक संघांनी मला स्मिथच्या कमकुवत बाजूबाबत विचारणा केली. माझे उत्तर होते, की जर तुम्हाला काही त्रुटी आढळली तर मला नक्की सांगा.’’शास्त्री म्हणाले, ‘‘स्मिथचे ‘हॅन्ड-आय कॉर्डिनेशन’ शानदार असून त्याला क्रिकेटची चांगली समज आहे.’’भारताचे वेगवान गोलंदाज उमेश यादव, मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा यांची प्रशंसा करताना शास्त्री म्हणाले, ‘‘मी शमीला कोलकाताचा नवाब, उमेशला विदर्भाचा नवाब आणि मोहितला राजधानीपेक्षा वेगवान हरियाना एक्स्प्रेस म्हणतो. त्यांनी खरंच वेगवान गोलंदाजांप्रमाणे गोलंदाजी केली. भारतीय गोलंदाजांनी या स्पर्धेत शानदार कामगिरी केली. हाशीम आमला व युनूस खान यांना आपण किती वेळा आखूड टप्प्याच्या चेंडूवर बाद होताना बघितले आहे. गोलंदाजीमध्ये विविधता आश्विनची ताकद आहे. युवा भारतीय संघात प्रतिभा असून, यापैकी ८० टक्के खेळाडू २०१९ च्या विश्वकप स्पर्धेत संघात स्थान मिळविण्याचे दावेदार आहेत.’’ (वृत्तसंस्था)