शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

शशांक मनोहर यांचा आयसीसी चेअरमनपदाचा राजीनामा

By admin | Updated: March 16, 2017 01:31 IST

बीसीसीआयवर वैधानिक संकट येताच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत विराजमान झालेले अ‍ॅड. शशांक मनोहर यांनी आश्चर्यकारक निर्णय घेऊन अवघ्या ८ महिन्यांत आयसीसी चेअरमनपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला

दुबई : बीसीसीआयवर वैधानिक संकट येताच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत विराजमान झालेले अ‍ॅड. शशांक मनोहर यांनी आश्चर्यकारक निर्णय घेऊन अवघ्या ८ महिन्यांत आयसीसी चेअरमनपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. मे २०१६मध्ये मनोहर यांची आयसीसीच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली होती. दरम्यान, मनोहर यांनी वैयिक्तक कारणामुळे राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. ५९ वर्षांचे मनोहर यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा होता.मनोहर यांनी आपले राजीनामापत्र आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांना पाठविले आहे. त्यात ते म्हणतात, ‘‘गेल्या वर्षी माझी आयसीसीच्या चेअरमनपदी एकमताने निवड झाली होती. मी आयसीसीचा पहिला स्वतंत्र चेअरमन बनलो. समितीच्या प्रत्येक निर्णयात आपले सर्वश्रेष्ठ योगदान देण्याचा आणि नि:पक्षपातीपणे काम करण्याचा मी प्रयत्न केला. मात्र, आता वैयिक्तक कारणांमुळे या पदावर राहणे मला शक्य होणार नाही; त्यामुळे मी पदाचा राजीनामा देत आहे.’’‘कर्तव्यकठोर प्रशासक’ अशी ओळख असलेले मनोहर यांनी दोन वेळा भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षपद भूषविले होते. २५ सप्टेंबर २००८ ते १९ सप्टेंबर २०११ दरम्यान मनोहर यांनी पहिल्यांदा बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवले होते. त्यानंतर २०१५मध्ये जगमोहन दालमिया यांचे निधन झाल्यानंतर पुन्हा एकदा शशांक मनोहर यांच्याकडे बीसीसीआयचे अध्यक्षपद सोपविण्यात आले होते.आयसीसी चेअरमनपद भूषणविण्याची संधी मिळाल्यावर मनोहर यांनी १० मे २०१६ रोजी बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. दरम्यान १२ मे २०१६ रोजी त्यांची आयसीसी चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली होती. लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्याची वेळ येताच मनोहर यांनी बीसीसीआयमधून पळ काढल्याचे आणि बुडते जहाज सोडून सुरक्षित स्थळ शोधल्याची टीका बीसीसीआय पदाधिकाऱ्यांनी मनोहर यांच्यावर त्या वेळी केली होती.आयसीसीने शशांक मनोहर यांचा राजीनामा मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मनोहर यांचा ई-मेल मिळाला असून, परिस्थितीचे आकलन केल्यानंतर पुढील पावले उचलली जातील, असे स्पष्ट करण्यात आले.(वृत्तसंस्था) या कारणामुळे दिला राजीनामा!आयसीसीत कायदेशीर आणि आर्थिक सुधारणा करण्यास मनोहर यांनी सुरुवात केली होती. त्यांनी त्यासाठी ‘बिग थ्री’(भारत, आॅस्ट्रेलिया व इंग्लंड) यांचे वर्चस्व संपुष्टात आणले. या सुधारणा आयसीसीच्या पुढील बैठकीत पारित होणार होत्या. बीसीसीआयने याविरुद्ध मोर्चेबांधणी करून बांगलादेश, श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांचा पाठिंबा मिळविला. आर्थिक सुधारणा पारित करण्यासाठी दोनतृतीयांश बहुमत असावे लागते. बीसीसीआयचा संभाव्य विरोध लक्षात घेऊन त्यांनी राजीनामा दिल्याचे सूत्रांचे मत आहे.