शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
5
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
6
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
7
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
8
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
9
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
10
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
11
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
12
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
13
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
14
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
15
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
16
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
17
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
18
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
19
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
20
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...

शाहिद आफ्रिदीने कर्णधारपद सोडले

By admin | Updated: April 3, 2016 21:30 IST

आयसीसी विश्व टी-२० क्रिकेट स्पर्धेत पाक संघाच्या निराशाजनक कामगिरीमुळे टीकाकारांचे लक्ष्य ठरलेल्या शाहीद आफ्रिदीने आज कर्णधारपदाचा राजीनामा दिला, पण टी-२० क्रिकेटमध्ये तो खेळणे सुरू ठेवणार आहे.

ऑनलाइन लोकमतकराची, दि. ३ - आयसीसी विश्व टी-२० क्रिकेट स्पर्धेत पाक संघाच्या निराशाजनक कामगिरीमुळे टीकाकारांचे लक्ष्य ठरलेल्या शाहीद आफ्रिदीने आज, रविवारी कर्णधारपदाचा राजीनामा दिला, पण टी-२० क्रिकेटमध्ये तो खेळणे सुरू ठेवणार आहे.आफ्रिदीच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाला भारताच्या यजमानपदाखाली आयोजित टी-२० विश्वकप स्पर्धेत उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले. स्पर्धेदरम्यान केलेल्या वक्तव्यामुळेही त्याला टीकेला सामोरे जावे लागले. कर्णधार म्हणून विश्व टी-२० स्पर्धा अखेरची स्पर्धा ठरू शकते, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) आणि ३६ वर्षीय अष्टपैलू आफ्रिदीने संकेत दिले होते.

आफ्रिदीने टिष्ट्वट केले की,‘पाकिस्तान आणि जगभरातील चाहत्यांना सूचित करीत आहे की, आज, रविवारी मी माझ्या इच्छेने पाकिस्तान टी-२० संघाचे कर्णधारपद सोडत आहे. मातृभूमीला सन्मान व प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी कर्णधारपदाचे कर्तव्य बजावण्यात यशस्वी ठरल्यामुळे मी अल्लाचा आभारी आहे.’

आफ्रिदीने पुढे म्हटले की, ‘खेळाडू म्हणून संघासाठी भविष्यातही उपलब्ध राहीन.’ पीसीबीचे अध्यक्ष शहरयार खान यांनी मात्र या अष्टपैलू खेळाडूचे संघातील स्थान पक्के नसल्याचे स्पष्ट केले आहे.

विश्व टी-२० स्पर्धेदरम्यान आफ्रिदी वादामध्ये अडकला होता. सुरुवातीला त्याने खेळाडूंना पाकच्या तुलनेत भारतात अधिक प्रेम मिळत असल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे आफ्रिदी पाकमध्ये टीकेचे लक्ष्य ठरला होता. त्यानंतर पाकिस्तानने साखळी फेरीत तीन सामने गमावले. त्यात भारताविरुद्ध पत्कराव्या लागलेल्या पराभवाचाही समावेश आहे. त्यामुळे पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. त्याने मोहालीमध्ये संघाला पाठिंबा देणाऱ्यांचे आभार व्यक्त करताना काश्मिरी लोकांचा प्रामुख्याने उल्लेख केला. त्यामुळे वाद निर्माण झाला. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्याआफ्रिदीवर बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी टीका केली होती.

 

>>  आफ्रिदी म्हणाला, ‘मी पीसीबी व पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांच्याप्रति आभार व्यक्त करतो. त्यांच्यामुळे मला राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. मी देशातर्फे लीग क्रिकेट स्पर्धेत खेळणे सुरू ठेवण्यास इच्छुक आहे. पाकिस्तान संघासाठी एक खेळाडू म्हणून जगभरात माझी कामगिरी उल्लेखनीय ठरावी, यासाठी अल्लाला साकडे घालावे, अशी मी चाहत्यांना विनंती करतो.’आफ्रिदीने कारकिर्दीत पाकिस्तानतर्फे २७ कसोटी सामन्यात १७१६ धावा फटकावल्या असून, ४८ बळी घेतले आहेत. त्याने २०१० मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. आफ्रिदीने ३९८ वन-डे आंतरराष्ट्रीय सामने खेळताना ८०६४ धावा फटकावल्या आणि ३९५ बळी घेतले. त्याने आतापर्यंत ९८ टी-२० आंतरारष्ट्रीय खेळले असून १४०५ धावा फटकावल्या आहेत. या व्यतिरिक्त त्याने टी-२० मध्ये ९७ बळी घेतले आहेत.