शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
2
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
3
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
4
GT चं काही खरं नाही; तळाला असलेल्या CSK च्या बॅटर्संनी केला मोठा धमाका
5
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली
6
Tejashwi Yadav : “मला हे आवडत नाही आणि मी ते सहनही करू शकत नाही”; तेजस्वी यादव यांनी स्पष्टच सांगितलं
7
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
8
'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव
9
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
10
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
11
...ती पोस्ट नडली, तेजप्रताप यादव यांची RJDमधून हकालपट्टी, वडील लालूप्रसाद यादव यांनी केली कारवाई
12
Harsha Richhariya : “महाकुंभमुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदललं, कधी कल्पनाही...”; असं का म्हणाली हर्षा रिछारिया?
13
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
14
महिलांसाठी खुशखबर! पोस्ट ऑफिसच्या 'या' ५ योजनांमध्ये करा गुंतवणूक, बँकांपेक्षाही जास्त व्याज आणि सुरक्षित भविष्य!
15
एअरटेलच्या वारसदाराने युके सोडले! श्रीमंतावर कर लादला म्हणून? अरबांच्या देशात शिफ्ट झाले...
16
"१० वर्षांपूर्वी माझा घटस्फोट झाला, त्यानंतर...", Divorce बद्दल अपूर्वा नेमळेकरचं भाष्य, म्हणाली- "मी अजूनही सिंगल..."
17
पाकिस्तानच्या २ गद्दारांना अमेरिकेतून अटक, बनावट कंपनीच्या नावाखाली सरकारलाही फसवत होते!
18
वरमाला घालतेवेळी नवऱ्याचे हात पाहून नवरीला आला संशय! संतापत लग्न करण्यास दिला नकार
19
फक्त हॉटेल्सच नाही, आता तुमचं घरही 'ओयो' भाड्याने देणार! कंपनीचा 'हा' प्लॅन ठरणार गेम चेंजर?

मालिका विजयाची हॅट्ट्रीक

By admin | Updated: August 15, 2016 04:13 IST

टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवताना यजमान वेस्ट इंडिजचा तिसऱ्या कसोटी सामन्यात तब्बल २३७ धावांनी धुव्वा उडवला

ग्रोस इसलेट : गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवताना यजमान वेस्ट इंडिजचा तिसऱ्या कसोटी सामन्यात तब्बल २३७ धावांनी धुव्वा उडवला. या दणदणीत विजयासह भारताने चार सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली असून सलग तिसऱ्यांदा कॅरेबियन जमिनीवर कसोटी मालिका जिंकली. भारताने यजमानांपुढे दुसऱ्या डावात विजयासाठी ३४६ धावांचे लक्ष्य ठेवले. मात्र गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना विंडिज संघाला ४७.३ षटकात केवळ १०८ धावांमध्ये गुंडाळले. मोहम्मद शमी (३/१५), इंशांत शर्मा (२/३०), रविंद्र जडेजा (२/२०), भुवनेश्वर कुमार (१/१३) आणि रविचंद्रन अश्विन (१/२८) यांनी दमदार मारा करत विंडिजला गुडघे टेकविण्यास भाग पाडले. मुंबईकर अजिंक्य रहाणेने (नाबाद ७८) झळकावलेल्या झुंजार अर्धशतकाच्या जोरावर भारताने आपला दुसरा डाव ७ बाद २१७ धावांवर घोषित करुन विंडिजपुढे विजयासाठी ३४६ धावांचे कठीण आव्हान उभे केले. या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडिजची विश्रांतीपर्यंत ३ बाद ५३ धावा अशी अवस्था झाली होती. यानंतर मात्र, भारतीयांनी भेदक मारा करताना यजमानांना पुर्णपणे दबावाखाली ठेवले.विंडिजची आघाडीची फळी स्वस्तात परतली. लिआॅन जॉन्सन (०), कार्लोस ब्रेथवेट (४) आणि अनुभवी मार्लोन सॅम्युअल्स (१२) झटपट परतल्याने विंडिजची सुरुवात अडखळती झाली होती. विश्रांतीनंतर डॅरेन ब्रावोने एकाकी किल्ला लढवताना दमदार ५९ धावांची खेळी केली. मात्र, दुसऱ्या बाजूने इतर फलंदाजांची योग्य साथ मिळत नसल्याने त्याची खेळी व्यर्थ गेली. विशेष म्हणजे अखेरचे ५ फलंदाज केवळ २४ धावांत परतल्याने यजमानांना सामन्यासह मालिकाही गमवावी लागली. तत्पूर्वी, भारताने ३ बाद १५७ धावांवरुन खेळण्यास सुरुवात केल्यानंतर रोहित शर्मा (४१) लगेच पायचीत बाद झाला. यानंतर पहिल्या डावातील शतकवीर वृध्दिमान साहा (१४), आणि अष्टपैलू आर. अश्विन (१) यांच्यासह अष्टपैलू जडेजा (१६) झटपट परतले. त्याचवेळी रहाणेने ११६ चेडूत ७८ धावांची नाबाद दमदार खेळी केली. कर्णधार कोहलीने संघाच्या २१७ धावा धावफलकावर लागल्यानंतर दुसरा डाव घोषित केला. मिग्युएल कमिन्सने चमदार गोलंदाजी करताना ४८ धावांत ६ फलंदाजांनी माघारी धाडले. यानंतर उर्वरीत सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी जबरदस्त वर्चस्व राखले. (वृत्तसंस्था)>संक्षिप्त धावफलक>भारत (पहिला डाव) : सर्वबाद ३५३ धावा.वेस्ट इंडिज (पहिला डाव) : सर्वबाद २२५ धावा.>भारत (दुसरा डाव) : ४८ षटकात ७ बाद २१७ धावा घोषित. (अजिंक्य रहाणे नाबाद ७८, रोहित शर्मा ४१; मिग्युएल कमिन्स ६/४८, रोस्टन चेस १/४१)वेस्ट इंडिज (दुसरा डाव) : ४७.३ षटकात सर्वबाद १०८ धावा. (डॅरेन ब्रावो ५९; मोहम्मद शमी ३/१५, रविंद्र जडेजा २/२०, इशांत शर्मा २/३०).>लक्षवेधीवेस्ट इंडिजविरुध्द त्यांच्याच भूमीत भारताने पहिल्यांदाच सलग तिसरी कसोटी मालिका जिंकली.कॅरेबियन धर्तीवर एकाच कसोटी मालिकेत दोन सामने जिंकण्याची भारताची पहिलीच वेळ.विंडिजविरुद्ध याआधीच्या दोन मालिका भारताने १-० ने जिंकल्या होत्या.भारताने आशियाबाहेर धावांच्या फरकाने मिळवलेला हा तिसऱ्या क्रमांकाचा मोठा विजय.