शहरं
Join us  
Trending Stories
1
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
4
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
5
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
6
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
7
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
8
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
9
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
10
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
11
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
12
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
13
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
14
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?
15
ITR चुकला? घाबरू नका, 'या' तारखेपर्यंत भरा बिलिटेड रिटर्न; पण, इतका दंड आणि व्याज भरावे लागणार
16
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
17
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
18
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
19
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
20
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?

विंडीजविरुद्धची मालिका निर्धोक : बीसीसीआय

By admin | Updated: October 10, 2014 04:44 IST

वेस्ट इंडीजचे क्रिकेटपटू आणि त्यांच्या बोर्डादरम्यान वेतन वादावरून खडाजंगी सुरू असली तरी मालिकेवर कुठलेही संकट नसल्याचे स्पष्टीकरण बीसीसीआयने दिले.

नवी दिल्ली : वेस्ट इंडीजचे क्रिकेटपटू आणि त्यांच्या बोर्डादरम्यान वेतन वादावरून खडाजंगी सुरू असली तरी मालिकेवर कुठलेही संकट नसल्याचे स्पष्टीकरण बीसीसीआयने दिले. बीसीसीआय सचिव संजय पटेल म्हणाले, ‘भारत-विंडीज मालिकेला कुठलाही धोका नाही हे मी स्पष्ट करूइच्छितो. सर्व सामने निर्धारित वेळापत्रकानुसार होतील. मी स्वत: विंडीज बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यांनी मला कुठलाही व्यत्यय येणार नाही, असे आश्वासन दिले. मला विंडीज बोर्डाचे अध्यक्ष डेव्ह कॅमरून यांचा ई-मेल मिळाला. त्यात त्यांनी संकट टाळण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबद्दल बीसीसीआयचे आभार मानले आहेत.’ मालिका आटोपल्यानंतर हे संकट सोडविण्यासाठी मध्यस्थी करण्यास बीसीसीआयला आनंद होईल, असे सांगून पटेल पुढे म्हणाले, ‘तीन कसोटी, पाच वन-डे आणि एक टी-२० सामन्यांचा समावेश असलेली ही मालिका सहीसलामत पार पाडण्यात आम्हाला आनंद वाटेल. भविष्यातील दौरा कार्यक्रमांतर्गत हा दौरा असून, या कॅलेंडरचे उल्लंघन करण्यात येऊ नये. सर्व सदस्य देश या कॅलेंडरचे पालन करीत असतात. विंडीजचे खेळाडू व्यावसायिक असल्यामुळे ते एकत्र बसून समस्येवर तोडगा काढू शकतात. आमची गरज असेल तर मध्यस्थी करण्यास बीसीसीआय तयार आहे.’कोची सामन्यात खोळंबा येऊ नये यासाठी बीसीसीआयने विंडीज खेळाडूंना किंवा त्यांच्या बोर्डाला पैसे दिल्याच्या वृत्ताचे पटेल यांनी खंडन केले. ते म्हणाले, ‘या केवळ अफवा आहेत. काहीही तथ्य नाही. बीसीसीआयने कुठलीही आर्थिक देवाण-घेवाण केली नाही आणि अशा आर्थिक देवाण-घेवाणीची योजना देखील नाही. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. क्रिकेट बोर्ड या नात्याने समस्येवर तोडगा कसा काढावा या संदर्भात आम्ही केवळ सल्ला देऊ शकतो.’