शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

सायना, श्रीकांत दुस-या फेरीत

By admin | Updated: April 2, 2015 01:40 IST

इंडियन ओपन चॅम्पियन सायना नेहवाल आणि के. श्रीकांतने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून मलेशिया

मलेशिया : इंडियन ओपन चॅम्पियन सायना नेहवाल आणि के. श्रीकांतने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून मलेशिया ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत नंबर वनवर विराजमान झालेल्या सायनाने महिला एकेरीत इंडोनेशियाच्या मारिया फेबेला दोन सेटमध्ये २१-१३, २१-१६ गुणांनी नमविले. सायनाचा पुढील सामना चीनची क्वालिफायर याओ हूएविरुद्ध होईल. दुसरीकडे पुरुषांच्या एकेरीत भारताच्या के. श्रीकांतने २०१० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कास्यपदकविजेत्या इंग्लंडच्या राजीय ओसेफला तीन गेममध्ये २१-१०, १५-२१, २४-२२ गुणांनी पराभूत केले. गतवर्षी श्रीकांतने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत राजीवला पराभूत केले होते. श्रीकांतचा दुसऱ्या फेरीत १६ वा मानांकित चिनच्या तियान हूवेइविरुद्ध होणार आहे. पहिल्या गेममध्ये सुरुवातीला श्रीकांतने आघाडी घेतली होती. पण नंतर राजीवने काही चांगल्या प्लेसिंग करीत गुण मिळवीत ७-७ अशी बरोबरीनंतर त्याने सलग १० गुण संपादन केले. गुणफरकात जास्त अंतर केल्यानंतर श्रीकांतने आपल्या खेळातील सातत्य कायम राखत शेवटी गेम २१-१० अशी जिंकली. दुसऱ्या गेममध्येसुद्धा श्रीकांतने ६-० अशी आघाडी घेतली होेती. नंतर श्रीकांत आपल्या खेळातील लय राखू शकला नाही आणि गेम १५-२१ अशी गमवावी लागली. तिसऱ्या गेम अटीतटीची झाली. दोन्ही खेळाडू गुणांसाठी प्रयत्नांची शिकस्त करीत होते. श्रीकांत ३-७ गुणांनी पिछाडीवर असताना त्याने अफलातून खेळाचे प्रदर्शन करीत आघाडी तर घेतलीच. नंतर राजीवनेसुद्धा बरोबरी साधली. पण शेवटी श्रीकांतने २४-२२ गुणांनी लढती जिंकली. फॉर्मात असलेल्या श्रीकांतने गतवर्षी नोव्हेंबरमध्ये चायना ओपन सुपर सिरीजचे विजेतेपद जिंकले होते. त्यानंतर हॉँगकॉँग ओपन स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. जागतिक सुपर सिरीजमध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला होता. सय्यद मोदी ग्रांप्री गोल्ड स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केल्यानंतर इंडिया सुपर सिरीजजे विजेतेपद आपल्या नावावर केले होत. सायनाने जानेवारीमध्ये सय्यद मोदी ग्रांप्रीचे विजेतेपद जिंकल्यानंतर आॅल इंग्लंड स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली होती. त्यांनतर थायलंडच्या रेचानोक इंतानोनचा पराभव करून इंडिया ओपनचे विजेतेपद जिंकले. (वृत्तसंस्था)