शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

सायना, श्रीकांतच्या कामगिरीवर नजरा

By admin | Updated: August 9, 2015 22:39 IST

भारतीय स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि किदाम्बी श्रीकांत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय खेळाडू उद्यापासून सुरू होणाऱ्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेच्या मैदानात उतरणार आहेत

जकार्ता : भारतीय स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि किदाम्बी श्रीकांत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय खेळाडू उद्यापासून सुरू होणाऱ्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेच्या मैदानात उतरणार आहेत. या स्पर्धेत या दोन खेळाडूंवर अनेकांच्या नजरा असतील. सायना आणि श्रीकांत यांना प्रबळ दावेदार मानले जात आहे. उल्लेखनीय म्हणजे, स्पर्धेत भारताचे दोन खेळाडू अव्वल पाच खेळाडूंमध्ये समाविष्ट असणे, ही पहिलीच वेळ आहे. सायना सध्या भारतीय एकेरीत दुसऱ्या, तर श्रीकांत पुरुष एकेरीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. युवा पी. व्ही. सिंधू हिच्यावरही नजरा असतील. तिने २०१३ आणि २०१४ मध्ये महिला एकेरीत कांस्यपदक पटकाविले होते. याआधी, २०११ मध्ये ज्वाला गुट्टा आणि आश्विनी पोनप्पा हिने महिला दुहेरीत पदक मिळवत भारताला विश्व चॅम्पियनशिपमध्ये २८ वर्षांनंतर पहिले पदक मिळवून दिले होते. आॅलिम्पिक कांस्यपदक विजेती सायनाने आतापर्यंत एकही विश्व चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकले नाही. ती पाच वेळा उपांत्यपूर्व फेरीच्या पुढे मजल मारू शकली नाही. दुसरीकडे, श्रीकांत दुसऱ्यांदा विश्व चॅम्पियनशिपमध्ये सहभागी झाला आहे. सायना हिला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे. दुसऱ्या फेरीत तिचा सामना हॉँगकॉँगच्या चेंग नगान आणि एस्तोनियाच्या कॅटी तोलमोफ याच्यातील विजेत्याशी होईल. (वृत्तसंस्था)