शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

सायना-सिंधूसह ७ बॅडमिंटनपटू पात्र

By admin | Updated: May 4, 2016 03:56 IST

आॅलिम्पिक कांस्यपदकविजेती सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांच्यासह ७ बॅडमिंटनपटू ब्राझीलच्या रिओमध्ये यंदा आॅगस्ट महिन्यात होणाऱ्या आॅलिम्पिकसाठी पात्र ठरले

नवी दिल्ली : आॅलिम्पिक कांस्यपदकविजेती सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांच्यासह ७ बॅडमिंटनपटू ब्राझीलच्या रिओमध्ये यंदा आॅगस्ट महिन्यात होणाऱ्या आॅलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवणाऱ्या भारतीय खेळाडूंची एकूण संख्या आता ८६ झाली आहे. लंडन आॅलिम्पिकची कांस्यपदकविजेती सायना व सिंधू (विश्व क्रमवारीत अनुक्रमे आठवे व दहावे स्थान) यांचा अव्वल १० खेळाडूंमध्ये समावेश आहे. किदांबी श्रीकांत पुरुष एकेरीच्या क्रमवारीत ११व्या स्थानी, तर महिला दुहेरीची जोडी ज्वाला गुट्टा व अश्विनी पोनप्पा १५व्या स्थानी आहे. मनू अत्री व बी. सुमीत रेड्डी पुरुष दुहेरीच्या मानांकनामध्ये १९व्या स्थानी आहेत. या सात खेळाडूंनी बॅडमिंटन स्पर्धेसाठी रिओ आॅलिम्पिकचे तिकीट मिळवले आहे. भारताचे मुख्य बॅडमिंटन प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद म्हणाले, ‘‘पात्रता प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आमच्याकडे सरावासाठी जवळजवळ आठ आठवड्यांचा कालावधी शिल्लक आहे. खेळाडूंसाठी हा कालावधी पुरेसा आहे. मला या वेळी अधिक पदकांची आशा आहे. लंडन आॅलिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत भारतातर्फे एकमेव कांस्यपदक सायना नेहवालने पटकावले होते.’’भारतीय बॅडमिंटनच्या इतिहासात सर्वांत अधिक खेळाडूंनी या वेळी पात्रता मिळवली आहे. ही संख्या २०१२च्या आॅलिम्पिकमध्ये पाच होती. या वेळी यात दोनची भर पडली असून, सात झाली आहे. भारतातर्फे यात आणखी एका खेळाडूची भर पडू शकली असती; पण पारुपल्ली कश्यपवर गेल्या महिन्यात शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे तो आॅलिम्पिकमध्ये सहभागी होण्याच्या शर्यतीतून बाहेर पडला. याव्यतिरिक्त भारतीय भारोत्तोलकांनी महिला व पुरुष विभागांत प्रत्येकी एक कोटा स्थान मिळविले आहे. २०१२च्या आॅलिम्पिकमध्ये एकूण ८३ भारतीय खेळाडू सहभागी झाले होते. त्यांत ६० पुरुष व २३ महिला खेळाडूंचा समावेश होता. या वेळी हा आकडा ८६ पर्यंत पोहोचला आहे. त्यात ४८ पुरुष व ३८ महिला खेळाडूंचा समावेश अहे. रिओसाठी भारतीय पथकाचे प्रमुख असलेले राकेश गुप्ता म्हणाले, ‘‘सात बॅडमिंटनपटू रिओसाठी पात्र ठरणे मोठी बाब आहे. या मोहिमेत सहभागी झालेल्या अन्य खेळाडूंनाही त्यामुळे प्रेरणा मिळेल. भारत्तोलनामध्ये भारताने दोन कोटा स्थान मिळवली असून भारोत्तोलकांच्या नावाची घोषणा निवड चाचणीनंतर केली जाईल. आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवणाऱ्या खेळाडूंच्या संख्येत आणखी भर पडणार असून हा आकडा १०० पर्यंत जाण्याची आशा आहे.’’गुप्ता पुढे म्हणाले, ‘‘रिओसाठी पात्रता मिळवणारे खेळाडू प्रशंसेस पात्र आहेत. विश्व मानांकन, पात्रता प्रक्रिया आणि आंतरराष्ट्रीय महासंघ व आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीचे मापदंड पूर्ण केल्यानंतरच खेळाडू आॅलिम्पिकसाठी पात्र ठरतो.’’भारताला अ‍ॅथलेटिक्समध्ये आणखी कोटा मिळविण्याची संधी आहे. त्यासाठी पुढच्या महिन्यात चाचणी होईल. याव्यतिरिक्त दोन पुरुष व एक महिला गोल्फरला पात्रता यादीमध्ये स्थान मिळवण्याची संधी आहे. टेनिसमध्येही लवकरच काही मोठी नावे रिओ आॅलिम्पिकच्या पात्रता यादीमध्ये दिसतील. बॉक्सिंगमध्येही भारताला आशा आहे. टेनिसमध्ये २०१२च्या आॅलिम्पिकसाठी पाच पुरुष व दोन महिला खेळाडूंसह एकूण ७ खेळाडू पात्र ठरले होते. भारताने तिरंदाजी, अ‍ॅथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, हॉकी, रोइंग, जिम्नॅस्टिक्स, नेमबाजी, टेबल टेनिस, भारोत्तोलन आणि कुस्ती आदी क्रीडाप्रकारांसाठी पात्रता मिळविली आहे. (वृत्तसंस्था)