शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

साहा-पुजाराच्या त्रिशतकी भागिदारीच्या जोरावर शेष भारताने जिंकला इराणी चषक

By admin | Updated: January 24, 2017 16:59 IST

भारतीय कसोटी संघात आपली दावेदारी मजबूत करण्याच्या प्रयत्नात असलेल्या यष्टीरक्षक वृद्धिमान साहाने येथे सुरु असलेल्या इराणी चषकाच्या सामन्यात दमदार द्विशतकी खेळी केली

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 24 - भारतीय कसोटी संघात आपली दावेदारी मजबूत करण्याच्या प्रयत्नात असलेल्या यष्टीरक्षक वृद्धिमान साहाने येथे सुरु असलेल्या इराणी चषकाच्या सामन्यात दमदार द्विशतकी खेळी केली. रणजी चॅम्पियन गुजरातने दिलेल्या 379 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शेष भारत संघांने पहिल्या चार विकेट अवघ्या 63 धावांत गमवाल्या होत्या. त्यानंतर साहा आणि पुजारा यांनी टिच्चून फलंदाजी करताना विजय विजय मिळवला.पहिले चार फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर साहाने कर्णधार चेतेश्वर पुजाराच्या साथीने पाचव्या विकेटसाठी 316 धावांची अभेद्य भागीदारी रचून शेष भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.सहा-पुजाराच्या त्रिशतकी भागिदारीत रिद्धिमान साहाचा नाबाद 203 धावांचा वाटा होता. त्याने 272 चेंडूंमधली ही खेळी 26 चौकार आणि सहा षटकारांनी सजवली. चेतेश्वर पुजाराने 238 चेंडूंत 16 चौकारांसह 116 धावांची खेळी उभारली. दरम्यान, काल गुजरातने सकाळी आपला डाव घोषित केल्यानंतर विजयासाठी ३७९ धावांचे मुश्किल आव्हान मिळालेल्या शेष भारत संघाची सुरुवात चांगली झाली नाही. अखिल हेरवाडकर (२0) आणि अभिनव मुकुंद (१९) हे दोघे चांगली सलामी देण्यास अपयशी ठरले. इंग्लंडविरुध्द त्रिशतक करणारा करुण नायर (७) पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाला. त्रिशतकानंतरच्या चार डावात त्याने पन्नाशीही पार केलेली नाही. मनोज तिवारीही ७ धावांवर बाद झाल्याने शेष भारतचा डाव ४ बाद ६३ असा अडचणीत आला. यानंतर मैदानात पुजारा आणि साहा यांची जोडी जमली, आणि त्यांनी विजय खेचून आणला.