शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

विराट कोहलीने मोडला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड

By admin | Updated: July 7, 2017 11:20 IST

विराट कोहली एकदिवस आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वात जास्त शतकं करणारा फलंदाज ठरला आहे

ऑनलाइन लोकमत
किंग्स्टन, दि. 7 - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपली रेकॉर्डब्रेक कामगिरी कायम ठेवली असून अजून एक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. गुरुवारी वेस्ट इंडिजविरोधात झालेल्या अंतिम आणि निर्णायक सामन्यात शतकी खेळी करत विराट कोहलीने संघाला विजय मिळवून दिला. विराट कोहलीच्या दमदार खेळीमुळे भारताने अंतिम सामना जिंकत मालिकाही जिंकली. विराट कोहलीने धावांचा पाठलाग करताना आपलं 18 वं शतक पुर्ण केलं. यासोबतच विराट कोहली एकदिवस आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वात जास्त शतकं करणारा फलंदाज ठरला आहे. या रेकॉर्डसोबत विराट कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकलं आहे.
 
आणखी वाचा - 
विराट शतक! भारताने विंडीजविरुद्धची वनडे मालिका जिंकली
अर्जुन तेंडुलकरच्या गोलंदाजीवर बेयरस्टॉ जखमी
पाकिस्तानचं चॅलेंज: म्हणे, चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारताची टरकली
 
जानेवारी महिन्यात धावांचा पाठलाग करत संघाला विजय मिळवून देणा-या सचिन तेंडुलकरच्या 14 शतकांचा रेकॉर्ड विराट कोहलीने मोडला होता. कोहलीने यावेळी 11 धावांची खेळी केली. ही त्याच्या वनडे करिअरमधील 28 वं शतक होतं. तर अंतिम सामन्यात मोक्याच्या वेळी केलेलं हे पाचवं शतक ठरलं. सचिन तेंडुलकरने आपल्या वनडे करिअरमध्ये धावांचा पाठलाग करताना एकूण 17 शतकं केली होती. 
एकदिवसीय सामन्यांमध्ये शतकांच्या रेकॉर्डमध्ये विराट कोहलीने आता सनथ जयसुर्यांची बरोबरी केली आहे. आता तो फक्त रिकी पाँटिंग (31) आणि सचिन तेंडुलकरच्या (49) मागे आहे. सचिन तेंडूलकरने 232 सामन्यांमध्ये 17 शतकं केली होती, तिथे विराट कोहलीने फक्त 102 सामन्यांमध्ये 18 शतकं केली आहेत. 
धावांचा पाठलाग करताना शतक करण्याच्या रेकॉर्डमध्ये श्रीलंकेच्या तिलकरत्न दिलशानचा तिसरा क्रमांक आहे. त्याने 116 सामन्यांमध्ये 11 शतकं केली आहेत.
यासोबतच वेस्ट इंडिजविरोधात खेळताना त्यांच्याच मायभूमीवर दोन शतकं करणारा विराट कोहली पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. याआधी फक्त राहुल द्रविडने कर्णधार असताना वेस्ट इंडिजविरोधात शतक केलं होतं. वेस्ट इंडिजविरोधात शतक करणा-या खेळाडूंमध्ये विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे. 
भारताने विंडीजविरुद्धची वनडे मालिका जिंकली
निर्णायक सामन्यात कर्णधार विराट कोहलीने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने पाचव्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर आठ गडी राखून मात केली. त्याचबरोबर भारतीय संघाने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेवर 3-1 ने कब्जा केला. पाचव्या आणि निर्णायक सामन्यात मोहम्मद शमी आणि उमेश यादवने भेदक मारा करत यजमान संघाला अवघ्या 205 धावांत रोखल्यानंतर विराट कोहलीने शानदार शतकी खेळी करताना अजिंक्य रहाणे आणि दिनेश कार्तिकच्या साथीने जबरदस्त भागीदाऱ्या रचत भारताला विजय मिळवून दिला.