शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

विराट कोहलीने मोडला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड

By admin | Updated: July 7, 2017 11:20 IST

विराट कोहली एकदिवस आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वात जास्त शतकं करणारा फलंदाज ठरला आहे

ऑनलाइन लोकमत
किंग्स्टन, दि. 7 - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपली रेकॉर्डब्रेक कामगिरी कायम ठेवली असून अजून एक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. गुरुवारी वेस्ट इंडिजविरोधात झालेल्या अंतिम आणि निर्णायक सामन्यात शतकी खेळी करत विराट कोहलीने संघाला विजय मिळवून दिला. विराट कोहलीच्या दमदार खेळीमुळे भारताने अंतिम सामना जिंकत मालिकाही जिंकली. विराट कोहलीने धावांचा पाठलाग करताना आपलं 18 वं शतक पुर्ण केलं. यासोबतच विराट कोहली एकदिवस आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वात जास्त शतकं करणारा फलंदाज ठरला आहे. या रेकॉर्डसोबत विराट कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकलं आहे.
 
आणखी वाचा - 
विराट शतक! भारताने विंडीजविरुद्धची वनडे मालिका जिंकली
अर्जुन तेंडुलकरच्या गोलंदाजीवर बेयरस्टॉ जखमी
पाकिस्तानचं चॅलेंज: म्हणे, चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारताची टरकली
 
जानेवारी महिन्यात धावांचा पाठलाग करत संघाला विजय मिळवून देणा-या सचिन तेंडुलकरच्या 14 शतकांचा रेकॉर्ड विराट कोहलीने मोडला होता. कोहलीने यावेळी 11 धावांची खेळी केली. ही त्याच्या वनडे करिअरमधील 28 वं शतक होतं. तर अंतिम सामन्यात मोक्याच्या वेळी केलेलं हे पाचवं शतक ठरलं. सचिन तेंडुलकरने आपल्या वनडे करिअरमध्ये धावांचा पाठलाग करताना एकूण 17 शतकं केली होती. 
एकदिवसीय सामन्यांमध्ये शतकांच्या रेकॉर्डमध्ये विराट कोहलीने आता सनथ जयसुर्यांची बरोबरी केली आहे. आता तो फक्त रिकी पाँटिंग (31) आणि सचिन तेंडुलकरच्या (49) मागे आहे. सचिन तेंडूलकरने 232 सामन्यांमध्ये 17 शतकं केली होती, तिथे विराट कोहलीने फक्त 102 सामन्यांमध्ये 18 शतकं केली आहेत. 
धावांचा पाठलाग करताना शतक करण्याच्या रेकॉर्डमध्ये श्रीलंकेच्या तिलकरत्न दिलशानचा तिसरा क्रमांक आहे. त्याने 116 सामन्यांमध्ये 11 शतकं केली आहेत.
यासोबतच वेस्ट इंडिजविरोधात खेळताना त्यांच्याच मायभूमीवर दोन शतकं करणारा विराट कोहली पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. याआधी फक्त राहुल द्रविडने कर्णधार असताना वेस्ट इंडिजविरोधात शतक केलं होतं. वेस्ट इंडिजविरोधात शतक करणा-या खेळाडूंमध्ये विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे. 
भारताने विंडीजविरुद्धची वनडे मालिका जिंकली
निर्णायक सामन्यात कर्णधार विराट कोहलीने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने पाचव्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर आठ गडी राखून मात केली. त्याचबरोबर भारतीय संघाने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेवर 3-1 ने कब्जा केला. पाचव्या आणि निर्णायक सामन्यात मोहम्मद शमी आणि उमेश यादवने भेदक मारा करत यजमान संघाला अवघ्या 205 धावांत रोखल्यानंतर विराट कोहलीने शानदार शतकी खेळी करताना अजिंक्य रहाणे आणि दिनेश कार्तिकच्या साथीने जबरदस्त भागीदाऱ्या रचत भारताला विजय मिळवून दिला.