शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
2
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
3
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
4
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
5
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
6
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
7
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
8
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
9
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
10
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
11
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
12
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
13
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
14
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
15
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
16
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
17
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
18
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
19
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
20
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी

"सचिन, लक्ष्मण आणि गांगुलीने कुंबळेशी साधी चर्चाही केली नव्हती"

By admin | Updated: June 27, 2017 11:21 IST

सचिन तेंडूलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सौरभ गांगुली सदस्य असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने कुंबळेशी कधीच चर्चा केली नव्हती

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत झालेल्या मतभेदानंतर अनिल कुंबळेने प्रशिक्षकपदाचा राजीनामा देऊन आठवडा उलटला असला तरी अद्याप चर्चा थांबलेली नाही. रोज या प्रकरणी काहीतरी नवीन माहिती समोर येत आहे. हा संपुर्ण वाद समोर आला तेव्हा क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) कुंबळे आणि कोहलीसोबत चर्चा करुन प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार सचिन तेंडूलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सौरभ गांगुली सदस्य असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने कुंबळेशी कधीच चर्चा केली नव्हती. त्यांनी फक्त विराट कोहलीशी चर्चा करत संपुर्ण वाद जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. 
 
बीसीसीआयच्या सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, ""कोहलीशी चर्चा केल्यानंतर सल्लागार समितीने सर्व काही ठीक असून ही काही मोठी समस्या नाही, तसंच संघाचं प्रदर्शनही चांगलं असल्याने कुंबळेला हटवण्याची गरज नाही असा निष्कर्ष काढला होता"". कुंबळेने गेल्या एक वर्षात चांगली कामगिरी केली असल्याने सल्लागार समितीने कुंबळेला भेटून त्याची बाजू जाणून घेण्याचा कोणताच प्रयत्न केला नाही. आणि कदाचित याच गोष्टीमुळे विराट कोहली नाराज झाला होता. चॅम्पिअन्स ट्रॉफीनंतर विराट कोहलीने लंडनमध्ये बीसीसीआय अधिका-यांशी यासंबंधी चर्चा केली. 
 
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ""बोर्डाला आपला निर्णय कळवल्यानंतर सल्लागार समिती या बैठकीत सहभागी झाली नाही. या बैठकीत कुंबळे आणि कोहली यांच्या व्यतिरिक्त बीसीसीआय अधिकारी अमिताभ चौधरी, राहुल जोहरी आणि एमवी श्रीधर उपस्थित होते"". यानंतर कुंबळेकडे संघासोबत वेस्ट इंडिज दौ-यावर जाण्याचा पर्याय उपलब्ध असतानाही त्याने तात्काळ राजीनामा देऊन टाकला. 
 
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ""45 मिनिटांच्या या बैठकीत कोहलीच जास्त वेळ बोलत होता. त्याने आपल्याला कुंबळेसोबत काम करण्यावर तसंच त्याच्या प्रशिक्षणाच्या पद्धतीवर आक्षेप असल्याचं सांगितलं. हा कुंबळेसारख्या महान खेळाडूचा अपमान होता. त्यामुळेच कदाचित आपला कार्यकाळ पुर्ण होण्याच्या आधीच कुंबळेने राजीनामा देऊन टाकला. सोबतच वेस्ट इंडिजच्या दौ-यावर जाण्यासही नकार दिला"".