शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

रिओ ऑलिम्पिक : भारत १२ ते १५ पदक जिंकेल...

By admin | Updated: July 11, 2016 17:54 IST

बॅडमिंटन स्टार फुलराणी सायना नेहवाल, नेमबाज जीतू राय आणि कुश्तीपटूंना पदकांचे प्रबळ दावेदार म्हणून ठरवताना

नवी मुंबई : बॅडमिंटन स्टार फुलराणी सायना नेहवाल, नेमबाज जीतू राय आणि कुश्तीपटूंना पदकांचे प्रबळ दावेदार म्हणून ठरवताना, भारतीय ओलिम्पिक संघटनेने (आयओए) रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू १२ ते १५ पदक जिंकतील असा विश्वास व्यक्त केला. गतस्पर्धेच्या तुलनेत दुप्पट पदकं जिंकण्यात भारताला यश येईल, असे आयओएचे महासचिव राजीव मेहता यांनी सांगितले.
एका कार्यक्रमामध्ये बोलताना मेहता म्हणाले की, यंदाच्या स्पर्धेत भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा संघ आॅलिम्पिकमध्ये सहभागी होत असून, आम्हाला विश्वास आहे की, भारतीय खेळाडू यावेळी १२ ते १५ पदकं जिंकण्यात यशस्वी होतील. तसेच, आम्हाला प्रत्येक खेळाडूकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा असून सायना, जीतू, विकास कृष्णन, टेनिसमध्ये दुहेरी जोडी, तिरंदाजी, कुश्ती आणि हॉकी संघाकडून विशेष आशा आहे, असेही मेहता यांनी सांगितले.
त्याचवेळी, ऑलिम्पिकमधील भारतीय संघाचे प्रमुख राकेश गुप्ता यांनी मात्र सावध भूमिका घेताना सांगितले की, यंदाच्या आॅलिम्पिकमध्ये १५ पदक मिळवण्याबाबत ठामपणे सांगता येणार नाही, परंतु एक मात्र नक्की की यावेळी भारताला गतआॅलिम्पिकच्या तुलनेत अधिक पदक मिळतील.ह्णह्ण २०१२ साली झालेल्या आॅलिम्पिकमध्ये भारताने एकूण ६ पदक जिंकले होते.
मिशन ऑलिम्पिकच्या एका अहवालानुसार भारताला यावेळी २० पदकांची आशा आहे. याबाबत विचारले असता गुप्ता यांनी सांगितले की, ह्यह्यमी अजून हा अहवाल पाहिला नसून हा अहवाल बघितल्याशिवाय कोणतीही टिप्पणी करणे अयोग्य ठरेल. आम्ही १५ पदकांची शाश्वती नाही देऊ शकत, मात्र गतस्पर्धेच्या तुलनेत यावेळी नक्कीच अधिक पदक जिंकू.ह्णह्ण
सध्या संघटनेच्या वादामुळे चर्चेत असलेल्या बॉक्सिंग खेळाबाबत गुप्ता यांनी म्हटले की, ह्यह्यराष्ट्रीय संघटना नसल्याने भारतीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्याची संधी कमी मिळाली. तरीही, यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये त्यांना कोणतीही अडचण येणार नाही.