शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

रिओ ऑलिम्पिक : भारत १२ ते १५ पदक जिंकेल...

By admin | Updated: July 11, 2016 17:54 IST

बॅडमिंटन स्टार फुलराणी सायना नेहवाल, नेमबाज जीतू राय आणि कुश्तीपटूंना पदकांचे प्रबळ दावेदार म्हणून ठरवताना

नवी मुंबई : बॅडमिंटन स्टार फुलराणी सायना नेहवाल, नेमबाज जीतू राय आणि कुश्तीपटूंना पदकांचे प्रबळ दावेदार म्हणून ठरवताना, भारतीय ओलिम्पिक संघटनेने (आयओए) रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू १२ ते १५ पदक जिंकतील असा विश्वास व्यक्त केला. गतस्पर्धेच्या तुलनेत दुप्पट पदकं जिंकण्यात भारताला यश येईल, असे आयओएचे महासचिव राजीव मेहता यांनी सांगितले.
एका कार्यक्रमामध्ये बोलताना मेहता म्हणाले की, यंदाच्या स्पर्धेत भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा संघ आॅलिम्पिकमध्ये सहभागी होत असून, आम्हाला विश्वास आहे की, भारतीय खेळाडू यावेळी १२ ते १५ पदकं जिंकण्यात यशस्वी होतील. तसेच, आम्हाला प्रत्येक खेळाडूकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा असून सायना, जीतू, विकास कृष्णन, टेनिसमध्ये दुहेरी जोडी, तिरंदाजी, कुश्ती आणि हॉकी संघाकडून विशेष आशा आहे, असेही मेहता यांनी सांगितले.
त्याचवेळी, ऑलिम्पिकमधील भारतीय संघाचे प्रमुख राकेश गुप्ता यांनी मात्र सावध भूमिका घेताना सांगितले की, यंदाच्या आॅलिम्पिकमध्ये १५ पदक मिळवण्याबाबत ठामपणे सांगता येणार नाही, परंतु एक मात्र नक्की की यावेळी भारताला गतआॅलिम्पिकच्या तुलनेत अधिक पदक मिळतील.ह्णह्ण २०१२ साली झालेल्या आॅलिम्पिकमध्ये भारताने एकूण ६ पदक जिंकले होते.
मिशन ऑलिम्पिकच्या एका अहवालानुसार भारताला यावेळी २० पदकांची आशा आहे. याबाबत विचारले असता गुप्ता यांनी सांगितले की, ह्यह्यमी अजून हा अहवाल पाहिला नसून हा अहवाल बघितल्याशिवाय कोणतीही टिप्पणी करणे अयोग्य ठरेल. आम्ही १५ पदकांची शाश्वती नाही देऊ शकत, मात्र गतस्पर्धेच्या तुलनेत यावेळी नक्कीच अधिक पदक जिंकू.ह्णह्ण
सध्या संघटनेच्या वादामुळे चर्चेत असलेल्या बॉक्सिंग खेळाबाबत गुप्ता यांनी म्हटले की, ह्यह्यराष्ट्रीय संघटना नसल्याने भारतीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्याची संधी कमी मिळाली. तरीही, यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये त्यांना कोणतीही अडचण येणार नाही.