शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

रिओ ऑलिम्पिक - जर्सीवर 'इंडिया' नसेल तर, खेळू नका

By admin | Updated: August 11, 2016 16:10 IST

रिओ ऑलिम्पिकमधला प्रत्येक दिवस भारतीयांसाठी निराशाजनक ठरत असताना आता आणखी एक वाईट बातमी आली आहे.

ऑनलाइन लोकमत 

रिओ, दि. ११ - रिओ ऑलिम्पिकमधला प्रत्येक दिवस भारतीयांसाठी निराशाजनक ठरत असताना आता आणखी एक वाईट बातमी आली आहे. एआयबीएने भारतीय बॉक्सर्सना देशाचे नाव असलेली जर्सी परिधान करण्यावरुन इशारा दिला आहे. 
 
भारतीय बॉक्सर्सनी देशाचे नाव असलेली जर्सी परिधान केली नाही तर, पुढचे सामने खेळू देणार नाही असा इशारा आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेने दिला आहे. मनोज कुमार आणि विकास कृष्णन यांनी आधीच आपले पहिल्या फेरीचे सामने जिंकले आहेत. शिव थापाला अजून पहिला सामना खेळायचा आहे. 
 
मनोज कुमारने बुधवारी पहिला सामना जिंकल्यानंतर एआयबीएच्या अधिका-यांनी त्याला जर्सीवरुन इशारा दिला. पाठीवर देशाचे नाव लिहीलेली जर्सी नसेल तर पुढच्या सामन्यात खेळू देणार नाही असे मनोज कुमारला सांगण्यात आले आहे. ऑलिम्पिकमध्ये देशाचे नाव असलेली जर्सी घालणे बंधनकारक आहे. रिओमध्ये आता अखेरच्या क्षणी भारतीय बॉक्सर्ससाठी नव्या किटची जुळवाजुळव करण्यासाठी अधिका-यांची धावपळ सुरु आहे.