शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

..तर वर्ल्डकप फायनलचा निकाल सुपर ओव्हरद्वारे

By admin | Updated: January 29, 2015 13:47 IST

क्रिकेट विश्वचषकातील अंतिम सामना बरोबरीत सुटल्यास सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) गुरुवारी घेतला.

ऑनलाइन लोकमत 
दुबई, दि. २९ -  क्रिकेट विश्वचषकातील अंतिम सामना बरोबरीत सुटल्यास सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) गुरुवारी घेतला. तसेच सध्या सुरु असलेल्या क्रिकेट मालिकांमध्ये षटकांची गती धीमी राखल्याबद्दल विश्वचषकातील सामन्यांमध्ये निलंबित करता येणार नाही अशी दिलासादायक घोषणाही आयसीसीने केली आहे. 
गुरुवारी दुबईतील आयसीसीच्या मुख्यालयात बैठक पार पडली असून या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापूर्वी २०११ च्या विश्वचषकात आयसीसीने अंतिम सामना बरोबरीत सुटल्यास सुपर ओव्हर खेळवण्याचा निर्णय प्रायोगिक तत्वावर घेतला होता. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या बैठकीत आयसीसीने २०१५ च्या विश्वचषकातील अंतिम सामना बरोबरीत सुटल्यास सुपर ओव्हर न खेळविण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे दोन्ही संघांना विभागून विश्वविजेतेपद दिले जाणार होते. मात्र आज झालेल्या बैठकीत आयसीसीने आधीचा निर्णय रद्द करुन आवश्यकता असल्यास सुपर ओव्हर खेळवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता अंतिम सामना बरोबरीत सुटल्यास क्रिकेट प्रेमींना सुपर ओव्हरचा थरार अनुभवता येणार आहे. 
सध्या सुरु असलेल्या क्रिकेट मालिकांमध्ये षटकांची गती कमी राखल्यास कर्णधाराचे निलंबन होऊ शकते. मात्र या कारवाईची अंमलबजावणी विश्वचषकात न करता विश्वचषकानंतर होणा-या स्पर्धांमध्ये केली जाईल असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. १४ फेब्रुवारी ते २९ मार्च या कालावधीत विश्वचषक स्पर्धा होणार असून या स्पर्धेत एकूण १४ संघ सहभागी झाले आहेत. 
.................
२०१६ मधील टी -२० विश्वचषक भारतात 
२०१६ मधील टी - २० विश्वचषक भारतात रंगणार असून गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर आयसीसीने ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. तर २०१९ मध्ये होणारे विश्वचषक इंग्लंडमध्ये होणार आहे.