शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

..तर वर्ल्डकप फायनलचा निकाल सुपर ओव्हरद्वारे

By admin | Updated: January 29, 2015 13:47 IST

क्रिकेट विश्वचषकातील अंतिम सामना बरोबरीत सुटल्यास सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) गुरुवारी घेतला.

ऑनलाइन लोकमत 
दुबई, दि. २९ -  क्रिकेट विश्वचषकातील अंतिम सामना बरोबरीत सुटल्यास सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) गुरुवारी घेतला. तसेच सध्या सुरु असलेल्या क्रिकेट मालिकांमध्ये षटकांची गती धीमी राखल्याबद्दल विश्वचषकातील सामन्यांमध्ये निलंबित करता येणार नाही अशी दिलासादायक घोषणाही आयसीसीने केली आहे. 
गुरुवारी दुबईतील आयसीसीच्या मुख्यालयात बैठक पार पडली असून या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापूर्वी २०११ च्या विश्वचषकात आयसीसीने अंतिम सामना बरोबरीत सुटल्यास सुपर ओव्हर खेळवण्याचा निर्णय प्रायोगिक तत्वावर घेतला होता. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या बैठकीत आयसीसीने २०१५ च्या विश्वचषकातील अंतिम सामना बरोबरीत सुटल्यास सुपर ओव्हर न खेळविण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे दोन्ही संघांना विभागून विश्वविजेतेपद दिले जाणार होते. मात्र आज झालेल्या बैठकीत आयसीसीने आधीचा निर्णय रद्द करुन आवश्यकता असल्यास सुपर ओव्हर खेळवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता अंतिम सामना बरोबरीत सुटल्यास क्रिकेट प्रेमींना सुपर ओव्हरचा थरार अनुभवता येणार आहे. 
सध्या सुरु असलेल्या क्रिकेट मालिकांमध्ये षटकांची गती कमी राखल्यास कर्णधाराचे निलंबन होऊ शकते. मात्र या कारवाईची अंमलबजावणी विश्वचषकात न करता विश्वचषकानंतर होणा-या स्पर्धांमध्ये केली जाईल असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. १४ फेब्रुवारी ते २९ मार्च या कालावधीत विश्वचषक स्पर्धा होणार असून या स्पर्धेत एकूण १४ संघ सहभागी झाले आहेत. 
.................
२०१६ मधील टी -२० विश्वचषक भारतात 
२०१६ मधील टी - २० विश्वचषक भारतात रंगणार असून गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर आयसीसीने ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. तर २०१९ मध्ये होणारे विश्वचषक इंग्लंडमध्ये होणार आहे.