शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

..तर वर्ल्डकप फायनलचा निकाल सुपर ओव्हरद्वारे

By admin | Updated: January 29, 2015 13:47 IST

क्रिकेट विश्वचषकातील अंतिम सामना बरोबरीत सुटल्यास सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) गुरुवारी घेतला.

ऑनलाइन लोकमत 
दुबई, दि. २९ -  क्रिकेट विश्वचषकातील अंतिम सामना बरोबरीत सुटल्यास सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) गुरुवारी घेतला. तसेच सध्या सुरु असलेल्या क्रिकेट मालिकांमध्ये षटकांची गती धीमी राखल्याबद्दल विश्वचषकातील सामन्यांमध्ये निलंबित करता येणार नाही अशी दिलासादायक घोषणाही आयसीसीने केली आहे. 
गुरुवारी दुबईतील आयसीसीच्या मुख्यालयात बैठक पार पडली असून या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापूर्वी २०११ च्या विश्वचषकात आयसीसीने अंतिम सामना बरोबरीत सुटल्यास सुपर ओव्हर खेळवण्याचा निर्णय प्रायोगिक तत्वावर घेतला होता. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या बैठकीत आयसीसीने २०१५ च्या विश्वचषकातील अंतिम सामना बरोबरीत सुटल्यास सुपर ओव्हर न खेळविण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे दोन्ही संघांना विभागून विश्वविजेतेपद दिले जाणार होते. मात्र आज झालेल्या बैठकीत आयसीसीने आधीचा निर्णय रद्द करुन आवश्यकता असल्यास सुपर ओव्हर खेळवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता अंतिम सामना बरोबरीत सुटल्यास क्रिकेट प्रेमींना सुपर ओव्हरचा थरार अनुभवता येणार आहे. 
सध्या सुरु असलेल्या क्रिकेट मालिकांमध्ये षटकांची गती कमी राखल्यास कर्णधाराचे निलंबन होऊ शकते. मात्र या कारवाईची अंमलबजावणी विश्वचषकात न करता विश्वचषकानंतर होणा-या स्पर्धांमध्ये केली जाईल असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. १४ फेब्रुवारी ते २९ मार्च या कालावधीत विश्वचषक स्पर्धा होणार असून या स्पर्धेत एकूण १४ संघ सहभागी झाले आहेत. 
.................
२०१६ मधील टी -२० विश्वचषक भारतात 
२०१६ मधील टी - २० विश्वचषक भारतात रंगणार असून गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर आयसीसीने ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. तर २०१९ मध्ये होणारे विश्वचषक इंग्लंडमध्ये होणार आहे.