शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

स्पर्धेदरम्यान जबाबदारीने वागा - राठोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 03:06 IST

१८ आॅगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान जकार्ता आणि पालेमबांग येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताने ५७२ खेळाडूंसह ८00 पेक्षा जास्त सदस्यांचा पथक पाठवला आहेत.

नवी दिल्ली : १८ आॅगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान जकार्ता आणि पालेमबांग येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताने ५७२ खेळाडूंसह ८00 पेक्षा जास्त सदस्यांचा पथक पाठवला आहेत. या स्पर्धेदरम्यान खेळाडू व पदाधिकाºयांनी मैदान आणि त्याबाहेर जबाबदारीने वागावे, असेही केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी सांगितले.भारतीय आॅलिम्पिक संघटनेद्वारे आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी रवाना होणाºया पथकासाठी आयोजित सोहळ्यात राठोड म्हणाले, ‘‘तुम्ही खेळाडू या स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करीत आहात, ही गौरवाची बाब आहे आणि तुम्ही हा सन्मान मिळवला आहे, जेव्हा तुम्ही स्पर्धेत सहभागी व्हाल तेव्हा क्रीडाग्रामात राहाल, त्या वेळेस तुमची वैयक्तिक ओळख असणार नाही आणि फक्त तुमची ओळख ही ‘भारत’ या नावाने असेल. ही तुमच्यासाठी मोठी जबाबदारी आहे. तुम्ही मैदान व बाहेर जे काही कराल तेव्हा अरबो लोकांच्या देशाचे तुम्ही प्रतिनिधित्व करीत आहात. ही बाब लक्षात ठेवा. तुम्ही खेळाडू असा अथवा पदाधिकारी ही बाब प्रत्येक वेळी स्मरणात ठेवायला हवी.’’ याप्रसंगी आयओएचे अध्यक्ष नरिंदर बत्रा, महासचिव राजीव मेहता, भारतीय पथकाचे प्रमुख ब्रिजभूषणसिंह उपस्थित होते. याप्रसंगी अव्वल खेळाडू हॉकी स्टार सरदारसिंह उपस्थित होते.याआधीच्या तुलनेत या वेळेस भारत जास्त पदके जिंकेल, अशी आशा आहे; परंतु खेळाडूंनी निकालाचा जास्त विचार करू नये, असेही राठोड यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, ‘‘तुम्ही इतक्या वर्षांपासून तयारी करीत आहात आणि पदक जिंकणे हे तुमचे स्वप्न असेल. हजारो तास केलेली ट्रेनिंग आणि कठोर मेहनत तुम्हाला मदत करील. स्वत:वर विश्वास ठेवा असा मी तुम्हाला सल्ला देईल. कृपया निकालाविषयी जास्त चिंता करू नका आणि तुम्हाला तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला हवा. मी भारतीय खेळाडूंचा उत्साह आणि दृढनिश्चय पाहिला आहे. त्यात १९९0 च्या दशकाच्या तुलनेत १५ वर्षांचा असो अथवा ४0 वर्षांचा खेळाडू यात खूप जास्त बदल झाला आहे. मी या खेळाडूंना तयार करण्यासाठी आयओए आणि राष्ट्रीय क्रीडा महासंघाचे अभिनंदन करतो. आम्हाला सर्वांना एकत्रित येऊन काम करावे लागेल. कोणीही एकटा काम करू शकत नाही. हे भारतीय खेळासाठी चांगले आहे.’’ (वृत्तसंस्था)>पत्रकारांशी बोलताना राठोड म्हणाले की, ‘आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करणे हे आयओए आणि एनएसएफचा विशेष अधिकार असून मंत्रालय यात हस्तक्षेप करू इच्छित नाही.’ते म्हणाले, ‘आशियाई स्पर्धा निवड प्रक्रियेची जबाबदारी आम्ही आयओए व एनएसएफवर दिली. यात जास्त लोकांचा सहभाग नसणे योग्य ठरेल. त्यामुळे निवडीची जबाबदारी ही आयओएवर असेल; परंतु जर यात थोडीही विसंगती आढल्यास आम्ही नक्की लक्ष घालू.’