शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
5
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
6
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
7
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
8
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
9
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
10
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
11
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
12
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
13
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
14
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
15
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
16
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
17
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
18
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
19
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
20
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...

स्पर्धेदरम्यान जबाबदारीने वागा - राठोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 03:06 IST

१८ आॅगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान जकार्ता आणि पालेमबांग येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताने ५७२ खेळाडूंसह ८00 पेक्षा जास्त सदस्यांचा पथक पाठवला आहेत.

नवी दिल्ली : १८ आॅगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान जकार्ता आणि पालेमबांग येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताने ५७२ खेळाडूंसह ८00 पेक्षा जास्त सदस्यांचा पथक पाठवला आहेत. या स्पर्धेदरम्यान खेळाडू व पदाधिकाºयांनी मैदान आणि त्याबाहेर जबाबदारीने वागावे, असेही केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी सांगितले.भारतीय आॅलिम्पिक संघटनेद्वारे आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी रवाना होणाºया पथकासाठी आयोजित सोहळ्यात राठोड म्हणाले, ‘‘तुम्ही खेळाडू या स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करीत आहात, ही गौरवाची बाब आहे आणि तुम्ही हा सन्मान मिळवला आहे, जेव्हा तुम्ही स्पर्धेत सहभागी व्हाल तेव्हा क्रीडाग्रामात राहाल, त्या वेळेस तुमची वैयक्तिक ओळख असणार नाही आणि फक्त तुमची ओळख ही ‘भारत’ या नावाने असेल. ही तुमच्यासाठी मोठी जबाबदारी आहे. तुम्ही मैदान व बाहेर जे काही कराल तेव्हा अरबो लोकांच्या देशाचे तुम्ही प्रतिनिधित्व करीत आहात. ही बाब लक्षात ठेवा. तुम्ही खेळाडू असा अथवा पदाधिकारी ही बाब प्रत्येक वेळी स्मरणात ठेवायला हवी.’’ याप्रसंगी आयओएचे अध्यक्ष नरिंदर बत्रा, महासचिव राजीव मेहता, भारतीय पथकाचे प्रमुख ब्रिजभूषणसिंह उपस्थित होते. याप्रसंगी अव्वल खेळाडू हॉकी स्टार सरदारसिंह उपस्थित होते.याआधीच्या तुलनेत या वेळेस भारत जास्त पदके जिंकेल, अशी आशा आहे; परंतु खेळाडूंनी निकालाचा जास्त विचार करू नये, असेही राठोड यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, ‘‘तुम्ही इतक्या वर्षांपासून तयारी करीत आहात आणि पदक जिंकणे हे तुमचे स्वप्न असेल. हजारो तास केलेली ट्रेनिंग आणि कठोर मेहनत तुम्हाला मदत करील. स्वत:वर विश्वास ठेवा असा मी तुम्हाला सल्ला देईल. कृपया निकालाविषयी जास्त चिंता करू नका आणि तुम्हाला तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला हवा. मी भारतीय खेळाडूंचा उत्साह आणि दृढनिश्चय पाहिला आहे. त्यात १९९0 च्या दशकाच्या तुलनेत १५ वर्षांचा असो अथवा ४0 वर्षांचा खेळाडू यात खूप जास्त बदल झाला आहे. मी या खेळाडूंना तयार करण्यासाठी आयओए आणि राष्ट्रीय क्रीडा महासंघाचे अभिनंदन करतो. आम्हाला सर्वांना एकत्रित येऊन काम करावे लागेल. कोणीही एकटा काम करू शकत नाही. हे भारतीय खेळासाठी चांगले आहे.’’ (वृत्तसंस्था)>पत्रकारांशी बोलताना राठोड म्हणाले की, ‘आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करणे हे आयओए आणि एनएसएफचा विशेष अधिकार असून मंत्रालय यात हस्तक्षेप करू इच्छित नाही.’ते म्हणाले, ‘आशियाई स्पर्धा निवड प्रक्रियेची जबाबदारी आम्ही आयओए व एनएसएफवर दिली. यात जास्त लोकांचा सहभाग नसणे योग्य ठरेल. त्यामुळे निवडीची जबाबदारी ही आयओएवर असेल; परंतु जर यात थोडीही विसंगती आढल्यास आम्ही नक्की लक्ष घालू.’