शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

स्टेनबाबत साशंकता, मर्चेंट संघात

By admin | Updated: November 21, 2015 04:14 IST

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत ०-१ ने पिछाडीवर असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाने दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज डेल स्टेनच्या फिटनेसबाबत साशंकता असल्यामुळे

नवी दिल्ली : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत ०-१ ने पिछाडीवर असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाने दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज डेल स्टेनच्या फिटनेसबाबत साशंकता असल्यामुळे टायटन्सचा खेळाडू मर्चेंट डी लांगे याचा मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांसाठी संघात समावेश करण्याचा निर्णय घेतला.जगातील अव्वल वेगवान गोलंदाज स्टेन स्नायूच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. त्यामुळे २५ नोव्हेंबरपासून नागपूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी मर्चेंटचा संघात समावेश करण्यात आला. वेगवान गोलंदाज मर्चेंटने दक्षिण आफ्रिका संघातर्फे दोन कसोटी सामन्यांत प्रतिनिधित्व केले आहे. २०१२ मध्ये वेलिंग्टनमध्ये तो अखेरचा कसोटी सामना खेळला होता. दरम्यान, भारत दौऱ्यात सुरुवातीला खेळल्या गेलेल्या टी-२० मालिकेसाठी त्याचा दक्षिण आफ्रिका संघात समावेश होता. दक्षिण आफ्रिका संघाने टी-२० व वन-डे मालिकेत भारताचा पराभव केला. दक्षिण आफ्रिका संघाचे प्रशिक्षक रसेल डोमिंगो संघाच्या निवडीबाबत बोलताना म्हणाले, ‘आमच्या संघात सध्या मोर्न मोर्केल, कॅगिसो रबादा आणि केली एबोट हे तीन वेगवान गोलंदाज फिट आहेत, मर्चेंटमध्ये खेळपट्टीवर चेंडूला उसळी मिळविण्याची क्षमता आहे. चेंडू जर रिव्हर्स स्विंग झाला तर आम्हाला त्याची गरज भासेल.’डोमिंगो म्हणाले, स्थानिक क्रिकेटमध्ये मर्चेंटला कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही, पण त्याच्यात प्रतिभा असल्याची आम्हाला कल्पना आहे. तो आपल्या गोलंदाजीच्या बळावर सामन्याचा निकाल बदलण्यास सक्षम आहे. १५० किलोमीटर वेगाने मारा करणारा गोलंदाज संघासाठी नेहमीच महत्त्वाचा असतो.जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाला मोहाली कसोटी सामन्यात १०८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला तर अनिर्णीत संपलेल्या बेंगळुरू कसोटी सामन्यातही त्यांची सुरुवात निराशाजनक झाली. भारतीय फिरकीपटूंविरुद्ध दक्षिण आफ्रिका संघाचा पहिला डाव २१४ धावांत संपुष्टात आला. पाहुणा संघ नागपूर कसोटी सामन्यात मालिकेत बरोबरी साधण्यात यशस्वी ठरेल, असा विश्वास प्रशिक्षकांनी व्यक्त केला. डोमिंगो म्हणाले, ‘आम्हाला यापूर्वीही अशा परिस्थितीला सामोरे जावे लागले असून आम्ही पुनरागमन करण्यात यशस्वी ठरलो होतो. मालिकेत अद्याप दोन लढती शिल्लक असून आम्ही शर्यतीत कायम आहोत. नागपूरची खेळपट्टी नक्कीच आमच्यासाठी अनुकूल निकाल देईल, असा विश्वास आहे. आम्ही ०-१ ने पिछाडीवर असलो तरी नागपूरमध्ये मालिकेत बरोबरी साधण्यात यश येईल.’प्रशिक्षकांनी अव्वल कसोटी संघाचा हवाला देताना सांगितले की, ‘आमच्या संघाने यापूर्वीही अनेकदा निकाल बदलण्यात यश मिळवले आहे. आम्हाला अशा परिस्थितीचा चांगला अनुभव आहे. पहिल्या दोन सामन्यांतील कामगिरीपासून खेळाडंूनी बोध घेतला असावा.’दुसऱ्या बाजूचा विचार करता चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत आघाडी मिळविणाऱ्या भारतीय संघाने उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी १७ सदस्यांच्या संघात कुठलाच बदल केलेला नाही. (वृत्तसंस्था)