शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पराभवाला जास्त महत्त्व नाही : रोहित

By admin | Updated: September 30, 2015 23:46 IST

भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्मा याने सराव सामन्यातील दक्षिण आफ्रिकेच्या पराभवाला भारतीय संघ जास्त महत्त्व देणार नाही

धरमशाला : भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्मा याने सराव सामन्यातील दक्षिण आफ्रिकेच्या पराभवाला भारतीय संघ जास्त महत्त्व देणार नाही, असे म्हटले आहे. शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी या संघाला पराभूत करणे मोठे आव्हान असेल आणि त्यांचा संघ प्रत्येक स्वरूपाच्या लढतीत सातत्याने चांगली कामगिरी करीत असल्याचेही रोहितने म्हटले.रोहित म्हणाला, ‘‘हा सराव सामना होता. त्यांनी आपला सर्वोत्तम संघ उतरवला तसेच राखीव खेळाडूंनाही अजमावले. मी त्या सामन्याविषयी जास्त विचार करू इच्छित नाही. प्रत्येक संघ सराव सामन्यात काही प्रयोग करीत असतो. त्यामुळे त्याकडे जास्त गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता नाही. दक्षिण आफ्रिका फक्त टी-२०मध्येच नाही, तर क्रिकेटच्या प्रत्येक स्वरूपात सर्वांत तुल्यबळ संघांपैकी एक आहे.’’भारत जास्त टी-२०चे सामने खेळत नाही, याविषयी रोहितला छेडले असता तो म्हणाला, ‘‘आम्ही एक संघ म्हणून जास्त टी-२० सामने खेळले नाहीत; परंतु अनेक खेळाडू आयपीएलमध्ये खेळले. आम्ही आयपीएलमधील अनुभवाचा उपयोग करू. या स्वरूपात एक संघ म्हणून खेळणे आमच्यासाठी आव्हानात्मक असेल.’’ रोहितने आपला फोकस टी-२० वर्ल्डकपवर असल्याचेही सांगितले. वर्ल्डकप स्पर्धा ५ महिन्यांनंतर होत आहे. तो म्हणाला, ‘‘वर्ल्डकप स्पर्धा जवळ आली आहे आणि आम्हा सर्वांनाच टी-२० सामन्यात खेळण्याच्या संधीचा फायदा घ्यायला हवा. दक्षिण आफ्रिकेने जास्त टी-२० सामने खेळले नाहीत; त्यामुळे त्यांच्यासाठीदेखील हे आव्हानात्मक असेल.’’दक्षिण आफ्रिकेचा टी-२० कर्णधार फाफ डू प्लेसिस याने पहिला सामना वेगवान खेळपट्टीवर घेण्याविषयी आश्चर्य व्यक्त केले होते. पाहुण्या संघाच्या वेगवान आक्रमणाचा सामना करण्यासाठी भारत काय तयारी करीत आहे, याविषयी विचारले असता रोहितने संघाचा फोकस हा फिरकी आणि वेगवान गोलंदाजी या दोन्हींवर असल्याचे सांगितले.तो म्हणाला, ‘‘त्यांच्याजवळ चांगले वेगवान गोलंदाजच नाही, तर प्रभावी फिरकी गोलंदाजही आहेत. सर्व पैलूंवर फोकस करणे योग्य ठरेल.’’ (वृत्तसंस्था)