शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पराभवाला जास्त महत्त्व नाही : रोहित

By admin | Updated: September 30, 2015 23:46 IST

भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्मा याने सराव सामन्यातील दक्षिण आफ्रिकेच्या पराभवाला भारतीय संघ जास्त महत्त्व देणार नाही

धरमशाला : भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्मा याने सराव सामन्यातील दक्षिण आफ्रिकेच्या पराभवाला भारतीय संघ जास्त महत्त्व देणार नाही, असे म्हटले आहे. शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी या संघाला पराभूत करणे मोठे आव्हान असेल आणि त्यांचा संघ प्रत्येक स्वरूपाच्या लढतीत सातत्याने चांगली कामगिरी करीत असल्याचेही रोहितने म्हटले.रोहित म्हणाला, ‘‘हा सराव सामना होता. त्यांनी आपला सर्वोत्तम संघ उतरवला तसेच राखीव खेळाडूंनाही अजमावले. मी त्या सामन्याविषयी जास्त विचार करू इच्छित नाही. प्रत्येक संघ सराव सामन्यात काही प्रयोग करीत असतो. त्यामुळे त्याकडे जास्त गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता नाही. दक्षिण आफ्रिका फक्त टी-२०मध्येच नाही, तर क्रिकेटच्या प्रत्येक स्वरूपात सर्वांत तुल्यबळ संघांपैकी एक आहे.’’भारत जास्त टी-२०चे सामने खेळत नाही, याविषयी रोहितला छेडले असता तो म्हणाला, ‘‘आम्ही एक संघ म्हणून जास्त टी-२० सामने खेळले नाहीत; परंतु अनेक खेळाडू आयपीएलमध्ये खेळले. आम्ही आयपीएलमधील अनुभवाचा उपयोग करू. या स्वरूपात एक संघ म्हणून खेळणे आमच्यासाठी आव्हानात्मक असेल.’’ रोहितने आपला फोकस टी-२० वर्ल्डकपवर असल्याचेही सांगितले. वर्ल्डकप स्पर्धा ५ महिन्यांनंतर होत आहे. तो म्हणाला, ‘‘वर्ल्डकप स्पर्धा जवळ आली आहे आणि आम्हा सर्वांनाच टी-२० सामन्यात खेळण्याच्या संधीचा फायदा घ्यायला हवा. दक्षिण आफ्रिकेने जास्त टी-२० सामने खेळले नाहीत; त्यामुळे त्यांच्यासाठीदेखील हे आव्हानात्मक असेल.’’दक्षिण आफ्रिकेचा टी-२० कर्णधार फाफ डू प्लेसिस याने पहिला सामना वेगवान खेळपट्टीवर घेण्याविषयी आश्चर्य व्यक्त केले होते. पाहुण्या संघाच्या वेगवान आक्रमणाचा सामना करण्यासाठी भारत काय तयारी करीत आहे, याविषयी विचारले असता रोहितने संघाचा फोकस हा फिरकी आणि वेगवान गोलंदाजी या दोन्हींवर असल्याचे सांगितले.तो म्हणाला, ‘‘त्यांच्याजवळ चांगले वेगवान गोलंदाजच नाही, तर प्रभावी फिरकी गोलंदाजही आहेत. सर्व पैलूंवर फोकस करणे योग्य ठरेल.’’ (वृत्तसंस्था)