शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

शालेय अभ्यासाचे ओझे कमी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 04:11 IST

देशात खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी अभ्यासाचे ५० टक्के ओझे कमी करण्याची तसेच शालेय स्तरावर खेळ हा विषय सक्तीचा करण्याची तयारी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने दाखविली आहे.

नवी दिल्ली : देशात खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी अभ्यासाचे ५० टक्के ओझे कमी करण्याची तसेच शालेय स्तरावर खेळ हा विषय सक्तीचा करण्याची तयारी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने दाखविली आहे. पुढील शैक्षणिक सत्रापासून ही योजना राबविण्याचा मनोदय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी व्यक्त केला आहे.एका कार्यक्रमात राठोड म्हणाले, ‘शिक्षणात खेळाचा समावेश नसणे ही दुर्दैवी बाब असून २०१९ पर्यंत अभ्यासक्रमातून ५० टक्के भार कमी करण्याची तसेच क्रीडा हा विषय सक्तीचा करण्याची आम्ही तयारी करीत आहोत. खेळांना नवी उभारी देण्यासाठी क्रीडा मंत्रालय सर्वंकष प्रयत्न करीत आहे. २०२२ पर्यंत खेळांवर अधिक पैसा खर्च करता यावा यासाठी साईने (बदललेले नाव- स्पोर्टस् इंडिया) आपल्या कर्मचारी संख्येत ५० टक्के कपात करावी, अशी सूचना करण्यात आली आहे.यंदा आमच्याकडे खेळात प्राविण्य राखणाऱ्या २० शाळा असतील. सरकार प्रत्येक शाळेवर सात ते दहा कोटी रुपये खर्च करणार आहे. प्रत्येक शाळेत दोन अथवा तीन मुख्य खेळ ठेवण्यात येतील. याच खेळांवर त्यांना शंभर टक्के लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. २०१९ च्या रग्बी विश्वचषकाचे भारतात स्वागतप्रसंगी राठोड यांनी चषकाचे अनावरण देखील केले.>सट्टेबाजीला मान्यता देण्याचा विचार नाहीसट्टेबाजीला कायदेशीर मान्यता देण्याचा कुठलाही विचार नसल्याचे राज्यवर्धनसिंग राठोड यांनी राज्यसभेत सांगितले. विधी आयोगाने ५ जुलै रोजी दिलेल्या अहवालात खेळातील सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता देणे संयुक्तिक ठरणार नसल्याचे स्पष्ट केले. सट्टेबाजी व जुगार कायदा विषय राज्यसूचीत मोडतो, असे राठोड म्हणाले.