शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

एका ट्रॉफीचा पुनर्जन्म!

By admin | Updated: June 1, 2017 07:08 IST

पुनर्जन्माबाबत तुम्ही बरंच काही ऐकलं असेलच. नाटक सिनेमामधून पुनर्जन्माच्या अनेक कथा पाहिल्या असतील. पण क्रिकेट जगतात चक्क एका ट्रॉफीचाच पुनर्जन्म

बाळकृष्ण परब/ऑनलाइन लोकमत
पुनर्जन्माबाबत तुम्ही बरंच काही ऐकलं असेलच. नाटक सिनेमामधून पुनर्जन्माच्या अनेक कथा पाहिल्या असतील. आजच्या विज्ञान युगात पुनर्जन्मासारख्या कथांवर विश्वास बसणे तसे कठीणच. पण क्रिकेट जगतात चक्क एका ट्रॉफीचाच पुनर्जन्म झालाय. हो, हे अगदी खरं आहे. या पुनर्जन्म झालेल्या ट्रॉफीचं नाव आहे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी.  आठव्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होतेय. चार वर्षांपूर्वी बंद करण्यात आलेल्या या स्पर्धेला आयसीसीने पुन्हा सुरुवात केलीय. त्यामुळे हा या स्पर्धेचा पुनर्जन्मच म्हटला पाहिजे. 
ट्वेंटी-20 क्रिकेटमुळे एकदिवसीय क्रिेकेटला फटका बसण्याची भीती ट्वेंटी-20 क्रिकेटला सुरुवात झाल्यापासून व्यक्त करण्यात येऊ लागली होती. त्याच काळात पहिली ट्वेंटी-20 विश्वचषक स्पर्धा आयोजित झाल्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या  अस्तित्वावर गंडांतर येऊ लागले. 
सुमारे 20 वर्षांपूर्वी असोसिएट्स देशांमधील क्रिकेटप्रेमींना अव्वल दर्जाच्या क्रिकेटचा आनंद घेता यावा आणि आयसीसीच्या खात्यातही काही अधिकचे डॉलर पडावेत म्हणून ही स्पर्धा सुरू करण्यात आली होती. भारतीय क्रिकेटमध्ये रुपये आणि डॉलरची गंगा आणणारे दिवंगत जगमोहन दालमिया हे या स्पर्धेचे जन्मदाते. 1998 साली बांगलादेशात नॉकआऊट स्पर्धा या नावाने खेळवण्यात आलेली ही स्पर्धा तेव्हा कमालीची यशस्वी ठरली होती. 2000 साली झालेल्या दुसऱ्या स्पर्धेपर्यंत तिचे नाव नॉकआऊट स्पर्धा असेच होते. 
पुढे 2002 साली श्रीलंकेत ही स्पर्धा आयोजित झाली. त्यावेळी तिचे नामकरण आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी असे करण्यात आले. 2013 पर्यंत ही स्पर्धा याच नावाने खेळवली गेली. जगातील अव्वल संघांचा सहभाग असल्याने या स्पर्धेला मिनी विश्वचषकाचा दर्जा मिळाला. पण हा मान मिळवताना ट्वेंटी-20 विश्वचषकाशी चॅम्पियन्स ट्रॉफीची टक्कर होऊ लागली.     ट्वेंटी-20 क्रिकेटची वाढती लोकप्रियता आणि कसोटी विश्वचषक सुरू करण्याची कल्पना यात अखेर चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन बंद करण्याचा निर्णय आयसीसीने साली घेतला. त्याबरोबरच 2013 साली या स्पर्धेचे शेवटचे आयोजन इंग्लंडमध्ये करण्यात आले होते. 
एकदिवसीय, ट्वेंटी-20 आणि कसोटी या क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये केवळ एकच जागतिक स्पर्धा असावी, अशी कल्पनाही आयसीसीमध्ये पुढे आली. त्यातून कसोटी अजिंक्यपद स्पर्धा नियोजित झाली. पण कसोटी क्रिकेटची घटलेली लोकप्रियता, प्रायोजकांनी घेतलेला आखडता हात, यामुळे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा आयसीसीचा विचार बारगळला. त्याबरोबरच चॅम्पियन्स ट्रॉफीला पुनर्जन्म मिळाला. ज्या इंग्लंडच्या भूमिवर चॅम्पियन्स ट्रॉफीचे शेवटचे आयोजन करण्यात आले तेथेच ही स्पर्धा आजपासून नव्याने आयोजित होतेय. पण तिच्या भविष्याबाबत अनिश्चितता कायम आहे. या स्पर्धेचे पुढचे आयोजन 2021 साली भारतात नियोजित आहे. मात्र आयसीसीने प्रस्तावित केलेली वनडे लीग सुरू झाल्यास चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनाला पुन्हा ब्रेक लागू शकतो. त्यामुळे या स्पर्धेचे नेमके भविष्य काय हे ब्रह्मदेवालाच ठावूक!!! तूर्तास आपण यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा आनंद घेऊ, आगे जो होगा देखा जाएगा!!!