शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

आरसीबी आणि २३ एप्रिलचा अजब योगायोग

By admin | Updated: April 24, 2017 15:58 IST

क्रिकेटला महान अनिश्चिततेचा खेळ का म्हटले जाते याचा प्रत्यय क्रिकेटप्रेमींना रविवारी पुन्हा एकदा आला. सध्याच्या अव्वल क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला

बाळकृष्ण परब/ ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - क्रिकेटला महान अनिश्चिततेचा खेळ का म्हटले जाते याचा प्रत्यय क्रिकेटप्रेमींना रविवारी पुन्हा एकदा आला.  सध्याच्या अव्वल क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आयपीएलमधील सर्वात लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. त्याबरोबरच जुळून आला एक अजब आणि विचित्र योगायोग. आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च आणि निचांकी अशा दोन्ही धावसंख्याचे विक्रम आरसीबीच्या नावावर नोंदवले गेले आहेत. विचित्र बाब म्हणजे हे दोन्ही विक्रम एकाच दिवशी म्हणजे २३ एप्रिलला नोंदवले गेले आहेत.
बरोबर चार वर्षांपूर्वी २३ एप्रिल २०१३ दिवशी ख्रिस गेलच्या तुफानाने आयपीएल आणि ट्वेंटी-२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम रचला होता. त्याच्या १७५ धावांच्या वादळी खेळीच्या जोरावर बंगळुरूने ५ बाद २६३ ही आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या रचली होती. आता चार वर्षांनी २३ एप्रिल याच दिवशी बंगळुरूच्या नावावर सर्वबाद ४९ हा आयपीएलमधील सर्वात निचांकी धावसंख्येचा विक्रम आरसीबीच्या नावावर नोंदवला गेलाय. 
त्यानिमित्ताने एखाद्याशी क्रिकेट कसा क्रूर खेळ खेळू शकतो. यशोशिखरावर असलेल्याला पार सागरतळाला कसा पाठवू शकतो, हे आज इडन गार्डनवर दिसले. ऐतिहासिक इडन गार्डनवर कोलकात्याला १३१ धावांत गुंडाळल्यावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा सामना सहज जिंकेल, असाच सर्वांचा होरा होता. पण प्रत्यक्षात मैदानावर जे काही घडले, त्याची कुणीही कल्पना केली नसेल. 
 अजून एक योगायोग म्हणजे आठ वर्षांपूर्वी २००९ साली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळतानाच राजस्थान रॉयल्सवर सर्वबाद ५८ या आयपीएलमधील तेव्हाच्या निचांकी धावसंख्येवर गारद होण्याची नामुष्की ओढवली होती. 
त्या सामन्यातले दोन खेळाडू आजही खेळले. ते म्हणजे विराट कोहली आणि रॉबिन उथप्पा. फरक एवढाच की त्या सामन्यात दोघेही एकाच संघात होते. तर आज एकमेकामविरुद्ध. 
बंगळरुच्या दुर्दैवाने या योगायोगांची मालिका येथेच संपत नाही. आयपीएलमध्ये सर्वात प्रथम १०० हून कमी धावांत गारद होण्याची नामुष्की रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवरच ओढवली होती. त्यावेळीही कोलकाता नाइटरायडर्सचा संघच प्रतिस्पर्धी होता. १८ एप्रिल २००८ साली झालेल्या त्या सामन्यात आरसीबीचा संघ अवघ्या ८२ धावांत गारद झाला होता. आता आयपीएलमध्ये ५० हून कमी धावांत गारद होणारा पहिला संघ ठरण्याची नामुष्कीही आरसीबीवरच ओढवलीय. पुन्हा समोर प्रतिस्पर्धी कोलकाता नाइटरायडर्स.
एकंदरीत आजच्या पराभवाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या आत्मविश्वासाला जबर धक्का पोहोचला असेल, त्यामुळे पुढच्या सामन्यापूर्वी त्यातून सावरणे आरसीबी आणि कर्णधार विराट कोहलीसाठी खूप कठीण जाणार आहे.