शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

आरसीबी आणि २३ एप्रिलचा अजब योगायोग

By admin | Updated: April 24, 2017 15:58 IST

क्रिकेटला महान अनिश्चिततेचा खेळ का म्हटले जाते याचा प्रत्यय क्रिकेटप्रेमींना रविवारी पुन्हा एकदा आला. सध्याच्या अव्वल क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला

बाळकृष्ण परब/ ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - क्रिकेटला महान अनिश्चिततेचा खेळ का म्हटले जाते याचा प्रत्यय क्रिकेटप्रेमींना रविवारी पुन्हा एकदा आला.  सध्याच्या अव्वल क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आयपीएलमधील सर्वात लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. त्याबरोबरच जुळून आला एक अजब आणि विचित्र योगायोग. आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च आणि निचांकी अशा दोन्ही धावसंख्याचे विक्रम आरसीबीच्या नावावर नोंदवले गेले आहेत. विचित्र बाब म्हणजे हे दोन्ही विक्रम एकाच दिवशी म्हणजे २३ एप्रिलला नोंदवले गेले आहेत.
बरोबर चार वर्षांपूर्वी २३ एप्रिल २०१३ दिवशी ख्रिस गेलच्या तुफानाने आयपीएल आणि ट्वेंटी-२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम रचला होता. त्याच्या १७५ धावांच्या वादळी खेळीच्या जोरावर बंगळुरूने ५ बाद २६३ ही आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या रचली होती. आता चार वर्षांनी २३ एप्रिल याच दिवशी बंगळुरूच्या नावावर सर्वबाद ४९ हा आयपीएलमधील सर्वात निचांकी धावसंख्येचा विक्रम आरसीबीच्या नावावर नोंदवला गेलाय. 
त्यानिमित्ताने एखाद्याशी क्रिकेट कसा क्रूर खेळ खेळू शकतो. यशोशिखरावर असलेल्याला पार सागरतळाला कसा पाठवू शकतो, हे आज इडन गार्डनवर दिसले. ऐतिहासिक इडन गार्डनवर कोलकात्याला १३१ धावांत गुंडाळल्यावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा सामना सहज जिंकेल, असाच सर्वांचा होरा होता. पण प्रत्यक्षात मैदानावर जे काही घडले, त्याची कुणीही कल्पना केली नसेल. 
 अजून एक योगायोग म्हणजे आठ वर्षांपूर्वी २००९ साली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळतानाच राजस्थान रॉयल्सवर सर्वबाद ५८ या आयपीएलमधील तेव्हाच्या निचांकी धावसंख्येवर गारद होण्याची नामुष्की ओढवली होती. 
त्या सामन्यातले दोन खेळाडू आजही खेळले. ते म्हणजे विराट कोहली आणि रॉबिन उथप्पा. फरक एवढाच की त्या सामन्यात दोघेही एकाच संघात होते. तर आज एकमेकामविरुद्ध. 
बंगळरुच्या दुर्दैवाने या योगायोगांची मालिका येथेच संपत नाही. आयपीएलमध्ये सर्वात प्रथम १०० हून कमी धावांत गारद होण्याची नामुष्की रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवरच ओढवली होती. त्यावेळीही कोलकाता नाइटरायडर्सचा संघच प्रतिस्पर्धी होता. १८ एप्रिल २००८ साली झालेल्या त्या सामन्यात आरसीबीचा संघ अवघ्या ८२ धावांत गारद झाला होता. आता आयपीएलमध्ये ५० हून कमी धावांत गारद होणारा पहिला संघ ठरण्याची नामुष्कीही आरसीबीवरच ओढवलीय. पुन्हा समोर प्रतिस्पर्धी कोलकाता नाइटरायडर्स.
एकंदरीत आजच्या पराभवाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या आत्मविश्वासाला जबर धक्का पोहोचला असेल, त्यामुळे पुढच्या सामन्यापूर्वी त्यातून सावरणे आरसीबी आणि कर्णधार विराट कोहलीसाठी खूप कठीण जाणार आहे.