शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

रवी शास्त्री प्रशिक्षक पदासाठी मैदानात

By admin | Updated: June 28, 2017 00:45 IST

गेले काही दिवस विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यातील वादामुळे बीसीसीआयमधील वातावरण ढवळून निघाले आहे.

नवी दिल्ली : गेले काही दिवस विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यातील वादामुळे बीसीसीआयमधील वातावरण ढवळून निघाले आहे. कुणीही तिढा सोडविण्यासाठी पुढाकार घेताना दिसत नाही. तर्क-वितर्कांना पेव फुटले असताना विराट कोहली मात्र सर्वांवर मात करून गेला. स्वत:च्या पसंतीचे रवी शास्त्री प्रशिक्षकपदी यावेत म्हणून हे सर्व प्रकरण घडवून आणल्याचे मीडियात प्रकाशित झाले. रवी शास्त्री यांनी प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्याचा मंगळवारी निर्णय घेतल्याने कोहलीची खेळी यशस्वी ठरल्याचे निष्पन्न झाले. बीसीसीआयनेदेखील प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्याची तारीख ९ जुलैपर्यंत वाढविली.शास्त्री हे फार इच्छुक असून पदासाठी अर्ज करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तथापि, २०१९ च्या विश्वचषकापर्यंत संपूर्ण दोन वर्षांचा कार्यकाळ सोपविण्याची हमी हवी असल्याची शास्त्री यांची अट आहे. शास्त्री यांना गोलंदाजी कोच भरत अरुण यांच्यासह संपूर्ण सपोर्ट स्टाफदेखील स्वमर्जीतील हवा आहे. या सर्वांनी आधीच्या कार्यकाळात चांगली भूमिका बजावल्याचे शास्त्रींचे म्हणणे आहे. शास्त्री हे आॅगस्ट २०१४ ते जून २०१६ या कालावधीत भारतीय संघाचे संचालक राहिले. त्यांची जागा कुंबळे यांनी नंतर मुख्य कोच म्हणून घेतली. अलीकडे कोहलीशी मतभेद होताच कुंबळे यांनी पद सोडले आहे. कोच म्हणून शास्त्री हे कोहलीची प्रथम पसंती असून, दोघांमध्ये सलोख्याचे संबंध आहेत, हे विशेष. अगदी ठरल्याप्रमाणे अखेर रवी शास्त्री यांनी भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदासाठी अर्ज दाखल करण्याचे ठरवले. स्वत: रवी शास्त्री यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत कुंबळे यांना मुदतवाढ मिळूनही कुंबळेंनी राजीनामा दिल्यामुळे बीसीसीआयला प्रशिक्षकपदाच्या अर्जासाठी मुदतवाढ द्यावी लागली. काही वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संघातील काही खेळाडू आणि कर्णधार विराट कोहली अनिल कुंबळेंऐवजी रवी शास्त्री यांच्या नावासाठी आग्रही होते. कुंबळेंच्या राजीनाम्यानंतर प्रशिक्षक म्हणून निवड होणार असेल अशी खात्री बीसीसीआय देणार असेल तरच आपण अर्ज करू, असा पवित्रा शास्त्रींनी घेतल्याचे म्हटले जाते.