शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

रणजी फायनल - मुंबई की गुजरात...कोण मारणार बाजी ?

By admin | Updated: January 14, 2017 12:02 IST

रणजी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबईने गुजरातसमोर 312 धावाचं आव्हान ठेवलं आहे

ऑनलाइन लोकमत
इंदूर , दि. 14 - रणजी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबईने गुजरातसमोर 312 धावाचं आव्हान ठेवलं आहे. पाचव्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा लक्ष्याचा पाठलाग करणा-या गुजरातने 47 धावांवर बिनवाद अशी सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर गुजरातने आपले तीन विकेट्स गमावले असून सध्या जुनेजा आणि पार्थिव पटेल खिंड लढवत आहे. पार्थिव पटेलने 72 चेंडूत अर्धशतक पुर्ण केलं आहे. सामना अटीतटीचा होण्याची शक्यता असून बाजी नेमकी कोण मारणार याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागून आहे. पहिल्या सत्राअखेर गुजरातने तीन विकेट्स गमावत 146 धावा केल्या आहेत. विजयासाठी गुजरातला 166 धावांची गरज आहे.
 
मुंबईने गुजरातसमोर ठेवलेलं 312 धावाचं लक्ष्य पुर्ण केल्यास हा एक रेकॉर्ड असेल. इतकी मोठी धावसंख्या आतापर्यत तीन वेळाच पार करण्यात प्रतिस्पर्धी संघ यशस्वी ठरला आहे.. सोबतच पहिल्यांदा रणजी जिंकण्याची संधी गुजरातकडे आहे. दुसरीकडे मुंबईने आतापर्यंत 40 वेळा रणजी जिंकला असून शिरपेचात अजून एक तुरा रोवण्याची संधी त्यांच्याकडे आहे. 
 
गतविजेते संघ - 
२०१५-१६ - कर्नाटक 
२०१३-१४  - कर्नाटक
२०१२-१३  - मुंबई
२०११-१२ - राजस्थान 
 
रणजी करंडक सांघिक विक्रम
- सर्वात जास्त विजय - ४० (मुंबई)
- सर्वात जास्त धावा - ९४४/६ (घोषित) - हैद्राबाद वि. आंध्र - १९९३-९४
- सर्वात कमी धावा - २१/१० - हैद्राबाद वि. राजस्थान - २०१०
 
खेळाडूंचे विक्रम
- सर्वात जास्त धावा - ४४३ नाबाद - बी.बी.निंबाळकर - महाराष्ट्र वि. काठेवाड (सौराष्ट्र) - १९४८-४९
- सर्वात चांगली गोलंदाजी (डाव) - १०/२० - प्रेमांशू चटर्जी - बंगाल वि. आसाम - १९५६-५७
- सर्वात चांगली गोलंदाजी (सामना) - १६/९९ - अनिल कुंबळे- कर्नाटक वि. केरळ - १९९४-९५
 
दुसऱ्या डावात बहरलेल्या फलंदाजीच्या जोरावर गतविजेत्या मुंबईने रणजी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ४११ धावांची मजल मारून गुजरातला विजयासाठी ३१२ धावांचे कठीण आव्हान दिले. या लक्ष्याचा पाठलाग करताना चौथ्या दिवसअखेर गुजरातने बिनबाद ४७ अशी सुरुवात केली.
 
चौथ्या दिवशी ३ बाद २०८ धावसंख्येवरून सुरुवात करताना मुंबईने आक्रमक पवित्रा घेतला. अष्टपैलू अभिषेक नायरने पुन्हा एकदा मुंबईसाठी महत्त्वपूर्ण खेळी करताना १४६ चेंडूत ५ चौकार व ५ षट्कारांसह ९१ धावांची खेळी केली. कर्णधार आदित्य तरेनेही सावधपणे खेळताना ११४ चेंडूत १२ चौकारांसह ६९ धावांची खेळी केली. यादव आणि तरे बाद झाल्यानंतर इतर फलंदाजांना फारशी चमक दाखविता आली नाही. पुन्हा एकदा सिद्धेश लाड (१५) अपयशी ठरला, तर, बलविंदर संधू (२०), शार्दुल ठाकूर (१) आणि विशाल दाभोळकर (१२) दडपणाखाली बाद झाले.
 
चिंतन गजाने मुंबईकरांच्या फलंदाजीला खिंडार पाडताना १२१ चेंडूंत सहा बळी घेतले. आरपी सिंगने दोन बळी घेत त्याला चांगली साथ दिली, तर रुष कलारिया आणि हार्दिक पटेल यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला.
 
यानंतर, मोठ्या धावसंख्येचे आव्हान घेऊन उतरलेल्या गुजरातने चांगली सुरुवात केली. समित गोहेल याने सावध भूमिका घेत खेळपट्टीवर टिकून राहण्यावर भर दिला. दुसऱ्या बाजूने प्रियांक पांचाळने खराब चेंडूंचा चांगला समाचार घेताना गुजरातचा धावफलक हलता ठेवला. या दोघांच्या जोरावर गुजरातने चौथ्या दिवअखेर १३.२ षटकांत बिनबाद ४७ धावांची मजल मारली होती.