शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

रणतुंगांचे वक्तव्य अपमानकारक! भारतीय खेळाडूंची संतप्त प्रतिक्रिया

By admin | Updated: July 14, 2017 21:33 IST

अर्जुन रणतुंगा यांनी २०११ च्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम लढतीच्या चौकशीच्या केलेल्या मागणीबाबत भारतीय खेळाडूंनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १४ - श्रीलंकेचे माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांनी  २०११ च्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम लढतीच्या    चौकशीच्या केलेल्या मागणीबाबत २०११ च्या विश्वविजेत्या भारतीय संघातील खेळाडूंनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रणतुंगांनी अंतिम लढतीच्या चौकशीची केलेली मागणी ही अपमानकारक असल्याचे भारतीय खेळाडूंनी म्हटले आहे. २ एप्रिल २०११ रोजी भारत आणि श्रीलंकेमध्ये झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम लढतीत भारताने श्रीलंकेवर सहा गडी राखून मात केली होती. 
रणतुंगा यांनी केलेल्या मागणीचा विश्वविजेत्या भारतीय संघातील खेळाडूंनी खरपूस समाचार घेतला आहे. अंतिम लढतीत ९७ धावांची खेळी करत भारताच्या विश्ववियाची पायाभरणी करणाऱ्या गौतम गंभीरने रणतुंगांच्या वक्तव्यामुळे आपल्याला धक्का बसल्याचे म्हटले आहे. "रणतुंगांनी केलेल्या आरोपांमुळे मला धक्का बसला आहे. हा आरोप अशा खेळाडूने केला आहे. ज्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप मान दिला जातो. रणतुंगा यांनी आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावे दिले पाहिजेत."अधिक वाचा ( 2011 वर्ल्डकपची फायनल फिक्स होती - अर्जुन रणतुंगा )
(बंदी उठल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्जला संघात हवाय धोनी )( झहीरसोबत वर्षाकाठी १५० दिवसांचा करार - गांगुली )
डावखुरा वेगवान गोलंदाज आशिष नेहरानेही हे आरोप फेटाळले आहेत. मी या आरोपांवर काही बोलून प्रकरण वाढवू इच्छित नाही. अशा चर्चांना अंत नसतो. आता मी जर १९९६ च्या श्रीलंकेच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तर ते चांगले वाटेल का, असा सवाल त्याने केला. पण रणतुंगांसारखा मोठा खेळाडू अशी वक्तव्ये करतो तेव्हा वाईट वाटते, असेही त्याने सांगितले. तर हरभजन सिंगने या प्रकरणी काहीही टिप्पणी करण्यास नकार दिला.  
  रणतुंगा यांनी भारत-श्रीलंकेमधला 2011 वर्ल्डकपचा अंतिम सामना फिक्स असल्याचा आरोप केला आहे. या सामन्याच्यावेळी मी समालोचकांच्या पॅनलमध्ये होतो. श्रीलंकेच्या कामगिरीने मला खूपच निराश केले होते. त्यामुळे क्रीडा मंत्र्यांनी या फायनल मॅचच्या प्रकरणामध्ये लक्ष घालून चौकशी केली पाहिजे असे रणतुंगा म्हणाले.