शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

रणतुंगांचे वक्तव्य अपमानकारक! भारतीय खेळाडूंची संतप्त प्रतिक्रिया

By admin | Updated: July 14, 2017 21:33 IST

अर्जुन रणतुंगा यांनी २०११ च्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम लढतीच्या चौकशीच्या केलेल्या मागणीबाबत भारतीय खेळाडूंनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १४ - श्रीलंकेचे माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांनी  २०११ च्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम लढतीच्या    चौकशीच्या केलेल्या मागणीबाबत २०११ च्या विश्वविजेत्या भारतीय संघातील खेळाडूंनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रणतुंगांनी अंतिम लढतीच्या चौकशीची केलेली मागणी ही अपमानकारक असल्याचे भारतीय खेळाडूंनी म्हटले आहे. २ एप्रिल २०११ रोजी भारत आणि श्रीलंकेमध्ये झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम लढतीत भारताने श्रीलंकेवर सहा गडी राखून मात केली होती. 
रणतुंगा यांनी केलेल्या मागणीचा विश्वविजेत्या भारतीय संघातील खेळाडूंनी खरपूस समाचार घेतला आहे. अंतिम लढतीत ९७ धावांची खेळी करत भारताच्या विश्ववियाची पायाभरणी करणाऱ्या गौतम गंभीरने रणतुंगांच्या वक्तव्यामुळे आपल्याला धक्का बसल्याचे म्हटले आहे. "रणतुंगांनी केलेल्या आरोपांमुळे मला धक्का बसला आहे. हा आरोप अशा खेळाडूने केला आहे. ज्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप मान दिला जातो. रणतुंगा यांनी आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावे दिले पाहिजेत."अधिक वाचा ( 2011 वर्ल्डकपची फायनल फिक्स होती - अर्जुन रणतुंगा )
(बंदी उठल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्जला संघात हवाय धोनी )( झहीरसोबत वर्षाकाठी १५० दिवसांचा करार - गांगुली )
डावखुरा वेगवान गोलंदाज आशिष नेहरानेही हे आरोप फेटाळले आहेत. मी या आरोपांवर काही बोलून प्रकरण वाढवू इच्छित नाही. अशा चर्चांना अंत नसतो. आता मी जर १९९६ च्या श्रीलंकेच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तर ते चांगले वाटेल का, असा सवाल त्याने केला. पण रणतुंगांसारखा मोठा खेळाडू अशी वक्तव्ये करतो तेव्हा वाईट वाटते, असेही त्याने सांगितले. तर हरभजन सिंगने या प्रकरणी काहीही टिप्पणी करण्यास नकार दिला.  
  रणतुंगा यांनी भारत-श्रीलंकेमधला 2011 वर्ल्डकपचा अंतिम सामना फिक्स असल्याचा आरोप केला आहे. या सामन्याच्यावेळी मी समालोचकांच्या पॅनलमध्ये होतो. श्रीलंकेच्या कामगिरीने मला खूपच निराश केले होते. त्यामुळे क्रीडा मंत्र्यांनी या फायनल मॅचच्या प्रकरणामध्ये लक्ष घालून चौकशी केली पाहिजे असे रणतुंगा म्हणाले.