शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

रणतुंगांचे वक्तव्य अपमानकारक! भारतीय खेळाडूंची संतप्त प्रतिक्रिया

By admin | Updated: July 14, 2017 21:33 IST

अर्जुन रणतुंगा यांनी २०११ च्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम लढतीच्या चौकशीच्या केलेल्या मागणीबाबत भारतीय खेळाडूंनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १४ - श्रीलंकेचे माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांनी  २०११ च्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम लढतीच्या    चौकशीच्या केलेल्या मागणीबाबत २०११ च्या विश्वविजेत्या भारतीय संघातील खेळाडूंनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रणतुंगांनी अंतिम लढतीच्या चौकशीची केलेली मागणी ही अपमानकारक असल्याचे भारतीय खेळाडूंनी म्हटले आहे. २ एप्रिल २०११ रोजी भारत आणि श्रीलंकेमध्ये झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम लढतीत भारताने श्रीलंकेवर सहा गडी राखून मात केली होती. 
रणतुंगा यांनी केलेल्या मागणीचा विश्वविजेत्या भारतीय संघातील खेळाडूंनी खरपूस समाचार घेतला आहे. अंतिम लढतीत ९७ धावांची खेळी करत भारताच्या विश्ववियाची पायाभरणी करणाऱ्या गौतम गंभीरने रणतुंगांच्या वक्तव्यामुळे आपल्याला धक्का बसल्याचे म्हटले आहे. "रणतुंगांनी केलेल्या आरोपांमुळे मला धक्का बसला आहे. हा आरोप अशा खेळाडूने केला आहे. ज्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप मान दिला जातो. रणतुंगा यांनी आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावे दिले पाहिजेत."अधिक वाचा ( 2011 वर्ल्डकपची फायनल फिक्स होती - अर्जुन रणतुंगा )
(बंदी उठल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्जला संघात हवाय धोनी )( झहीरसोबत वर्षाकाठी १५० दिवसांचा करार - गांगुली )
डावखुरा वेगवान गोलंदाज आशिष नेहरानेही हे आरोप फेटाळले आहेत. मी या आरोपांवर काही बोलून प्रकरण वाढवू इच्छित नाही. अशा चर्चांना अंत नसतो. आता मी जर १९९६ च्या श्रीलंकेच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तर ते चांगले वाटेल का, असा सवाल त्याने केला. पण रणतुंगांसारखा मोठा खेळाडू अशी वक्तव्ये करतो तेव्हा वाईट वाटते, असेही त्याने सांगितले. तर हरभजन सिंगने या प्रकरणी काहीही टिप्पणी करण्यास नकार दिला.  
  रणतुंगा यांनी भारत-श्रीलंकेमधला 2011 वर्ल्डकपचा अंतिम सामना फिक्स असल्याचा आरोप केला आहे. या सामन्याच्यावेळी मी समालोचकांच्या पॅनलमध्ये होतो. श्रीलंकेच्या कामगिरीने मला खूपच निराश केले होते. त्यामुळे क्रीडा मंत्र्यांनी या फायनल मॅचच्या प्रकरणामध्ये लक्ष घालून चौकशी केली पाहिजे असे रणतुंगा म्हणाले.