शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेटपटूंच्या एजंटांवर बंदी घालण्याची रणतुंगा यांची मागणी

By admin | Updated: July 15, 2017 00:41 IST

श्रीलंकेच्या बऱ्याचशा क्रिकेटपटूंचे एजंट आहेत. एक ब्रिटिश एजंट अनेक खेळाडूंचे व्यवहार सांभाळतो

कोलंबो : ‘श्रीलंकेच्या बऱ्याचशा क्रिकेटपटूंचे एजंट आहेत. एक ब्रिटिश एजंट अनेक खेळाडूंचे व्यवहार सांभाळतो,’ याकडे लक्ष वेधताना विश्वचषक विजेत्या संघाचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा याने या एजंटांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. मला अधिकार दिल्यास या एजंटांना वठणीवर आणतोच, असेही रणतुंगा म्हणाला.या एजंटांवर कायदेशीर बंदी आणण्यासाठी न्यायालयात धाव घेण्याचाही विचार रणतुंगाने बोलून दाखविला. एजंटांमुळेच देशतील क्रिकेटचे वाटोळे झाल्याचा आरोप करीत झिम्बाब्वेकडून झालेला दारुण पराभव हा याचाच परिणाम असल्याचा निष्कर्ष त्याने काढला. खेळाडू कर भरतात की केवळ पैसा देशाबाहेर घेऊन जातात, याचीही कठोर चौकशी करण्याची मागणी त्याने केली आहे.२0१५ मध्ये वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्याच्यावेळी रणतुंगा स्वत: समालोचनाची जबाबदारी पार पाडत होते. लंकेच्या गोलंदाजीवर त्यांनी सामन्यादरम्यान नाराजी व्यक्त केली होती. रणतुंगा यांच्या आरोपांना भारतीय खेळाडूंनी फेटाळून लावले असून क्रिकेटपटू गौतम गंभीर याने रणतुंगाचे वक्तव्य अपमानजनक असल्याचे म्हंंटले आहे. अंतिम सामन्यात ९७ धावा करुन विजयात सिंहाचा वाटा उचललेल्या गंभीरने रणतुंगा यांना पुराव्यानिशी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. विश्वविजेत्या संघाचा गोलंदाज आशिष नेहरा यानेही यावर नाराजी व्यकत करताना १९९६ च्या वर्ल्ड कपमधील त्यांच्या विश्वविजयावर मी प्रश्न उपस्थित करु शकतो, असे म्हंटले आहे. (वृत्तसंस्था)>२0११ च्या विश्वचषकातील पराभवाचीही चौकशी करा...२०११ सालच्या विश्वचषकातील अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या पराभवाची तात्काळ चौकशी करण्याची मागणी देखील रणतुंगाने केली. माजी खेळाडू कुमार संगकारा याने रणतुंगावर केलेल्या आरोपांना उत्तर देताना रणतुंगाने ही मागणी केली. २००९ मध्ये पाकिस्तानचा दौऱ्यात श्रीलंकेच्या संघावर अतिरेकी हल्ला झाला होता. यानंतर संगकाराने हा दौरा कोणाच्या सहमतीने आखला गेला याची चौकशी करण्याची मागणी केली होती. संगकाराच्या आरोपांना रणतुंगाने जोरदार प्रत्युत्तर दिले. तो म्हणाला,‘ ‘जर संगकाराला पाकिस्तान दौऱ्याची चौकशी हवी असेल, तर ती नक्की झाली पाहीजे. सोबतच २०११ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात नेमके काय घडले याचीही चौकशी व्हायला पाहिजे.