शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेटपटूंच्या एजंटांवर बंदी घालण्याची रणतुंगा यांची मागणी

By admin | Updated: July 15, 2017 00:41 IST

श्रीलंकेच्या बऱ्याचशा क्रिकेटपटूंचे एजंट आहेत. एक ब्रिटिश एजंट अनेक खेळाडूंचे व्यवहार सांभाळतो

कोलंबो : ‘श्रीलंकेच्या बऱ्याचशा क्रिकेटपटूंचे एजंट आहेत. एक ब्रिटिश एजंट अनेक खेळाडूंचे व्यवहार सांभाळतो,’ याकडे लक्ष वेधताना विश्वचषक विजेत्या संघाचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा याने या एजंटांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. मला अधिकार दिल्यास या एजंटांना वठणीवर आणतोच, असेही रणतुंगा म्हणाला.या एजंटांवर कायदेशीर बंदी आणण्यासाठी न्यायालयात धाव घेण्याचाही विचार रणतुंगाने बोलून दाखविला. एजंटांमुळेच देशतील क्रिकेटचे वाटोळे झाल्याचा आरोप करीत झिम्बाब्वेकडून झालेला दारुण पराभव हा याचाच परिणाम असल्याचा निष्कर्ष त्याने काढला. खेळाडू कर भरतात की केवळ पैसा देशाबाहेर घेऊन जातात, याचीही कठोर चौकशी करण्याची मागणी त्याने केली आहे.२0१५ मध्ये वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्याच्यावेळी रणतुंगा स्वत: समालोचनाची जबाबदारी पार पाडत होते. लंकेच्या गोलंदाजीवर त्यांनी सामन्यादरम्यान नाराजी व्यक्त केली होती. रणतुंगा यांच्या आरोपांना भारतीय खेळाडूंनी फेटाळून लावले असून क्रिकेटपटू गौतम गंभीर याने रणतुंगाचे वक्तव्य अपमानजनक असल्याचे म्हंंटले आहे. अंतिम सामन्यात ९७ धावा करुन विजयात सिंहाचा वाटा उचललेल्या गंभीरने रणतुंगा यांना पुराव्यानिशी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. विश्वविजेत्या संघाचा गोलंदाज आशिष नेहरा यानेही यावर नाराजी व्यकत करताना १९९६ च्या वर्ल्ड कपमधील त्यांच्या विश्वविजयावर मी प्रश्न उपस्थित करु शकतो, असे म्हंटले आहे. (वृत्तसंस्था)>२0११ च्या विश्वचषकातील पराभवाचीही चौकशी करा...२०११ सालच्या विश्वचषकातील अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या पराभवाची तात्काळ चौकशी करण्याची मागणी देखील रणतुंगाने केली. माजी खेळाडू कुमार संगकारा याने रणतुंगावर केलेल्या आरोपांना उत्तर देताना रणतुंगाने ही मागणी केली. २००९ मध्ये पाकिस्तानचा दौऱ्यात श्रीलंकेच्या संघावर अतिरेकी हल्ला झाला होता. यानंतर संगकाराने हा दौरा कोणाच्या सहमतीने आखला गेला याची चौकशी करण्याची मागणी केली होती. संगकाराच्या आरोपांना रणतुंगाने जोरदार प्रत्युत्तर दिले. तो म्हणाला,‘ ‘जर संगकाराला पाकिस्तान दौऱ्याची चौकशी हवी असेल, तर ती नक्की झाली पाहीजे. सोबतच २०११ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात नेमके काय घडले याचीही चौकशी व्हायला पाहिजे.