शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

राकेशकडे मुंबईची धुरा

By admin | Updated: February 9, 2016 01:48 IST

गतविजेत्या बलाढ्य यू मुंबा संघाची कामगिरी यंदाच्या प्रो कबड्डीच्या तिसऱ्या सत्रात लौकिकास साजेशी झाली नाही. चार सामन्यांतून दोन विजय आणि दोन पराभव अशी कामगिरी

- रोहित नाईक,  कोलकातागतविजेत्या बलाढ्य यू मुंबा संघाची कामगिरी यंदाच्या प्रो कबड्डीच्या तिसऱ्या सत्रात लौकिकास साजेशी झाली नाही. चार सामन्यांतून दोन विजय आणि दोन पराभव अशी कामगिरी झालेल्या मुंबईला आता कोलकाता येथे होणाऱ्या बंगळुरु बुल्स विरुध्द स्टार खेळाडूंच्या अनुपस्थित खेळावे लागेल. सध्या सुरु असलेल्या दक्षिण आशीयाई क्रीडा स्पर्धेत (सॅग) यू मुंबाचे सर्वाधिक ४ खेळाडू राष्ट्रीय संघात असून मुंबईचा कर्णधार अनुप कुमारकडे भारतीय संघाची धुरा सोपविण्यात आली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत भारताचा माजी कर्णधार आणि संघाचा नवा सदस्य राकेश कुमार यू मुंबाचे नेतृत्त्व करेल असे अनुपने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.पहिले दोन पर्व पटणा पायरेट्सचा कर्णधार असलेला राकेश यंदा मुंबईकर झाला. मात्र त्याला म्हणावी तशी छाप पाडता आली नाही. याविषयी अनुप म्हणाला, राकेश स्टार आहे. तो सुरुवातीला अपेक्षित खेळू शकला नसला तरी आमच्या अनुपस्थिमध्ये त्याच्यावर काहीप्रमाणात दडपण येईल आणि दडपणात त्याचा खेळ हमखास उंचावतो. त्यामुळे लवकरच राकेशचा दमदार खेळ सर्वांना दिसेल. शिवाय त्याच्याकडे भारताच्या कर्णधारपदाचा दीर्घ अनुभव असून त्याचा फायदा नक्कीच यू मुंबाला होईल. त्याच्या नेतृत्त्वाखाली संघाचा खेळ बहरेल.यंदाची सुरुवात निश्चित अपेक्षेप्रमाणे झाली नसली, तरी आम्ही सराव शिबीरामध्ये पहिल्या चार सामन्यात झालेल्या चुका सुधारण्यावर भर दिला. सर्वच खेळाडूंनी कसून सराव केला असल्याने कोलकाता येथील सामन्यापासून यू मुंबाचा हिसका दिसून येईल, असा विश्वासही अनुपने व्यक्त केला. ‘सॅग’ स्पर्धेत काशिलिंग आडके, रोहित कुमार, सुरेंद्र, संदीप नरवाल, राहूल चौधरी यांसारखे स्टार खेळाडूही भारतीय संघात असल्याने त्याचाही स्पर्धेवर परिणाम होईल असे सांगताना अनुप म्हणाला की, नक्कीच या खेळाडूंच्या अनुपस्थितीचा प्रत्येक संघावर परिणाम होईल. मात्र तरीही कोणताच संघ कमजोर नसेल. प्रत्येक खेळाडू सर्वोत्तम कमगिरीच्या प्रयत्नात असल्याने स्पर्धेतील चुरस कमी होणार नाही आणि मुंबईकरही यामध्ये चमकदार कामगिरी करतील.पाकिस्तानचे भारतासमोर आव्हान- सॅफ आणि प्रो कबड्डीची तयारी एकाचवेळी सुरु होती. सॅफ स्पर्धेत भारतीय संघ अत्यंत मजबूत असून विजेतेपदासाठी विशेष आव्हान नसेल. मात्र तरीही पाकिस्तान संघाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. त्यांचा संघ दमदार असून भारतासमोर त्यांचेच मुख्य आव्हान असेल.- भारताच्या कर्णधारपदाचे माझ्यावर कोणतेही दडपण नाही. मी नेहमीप्रमाणेच कोणत्याही दडपणाशिवाय खेळेन. संघातील प्रत्येक खेळाडू विजेतेपद उंचावण्यास सज्ज असल्याचे अनुप कुमारने सांगितले.