शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

राकेशकडे मुंबईची धुरा

By admin | Updated: February 9, 2016 01:48 IST

गतविजेत्या बलाढ्य यू मुंबा संघाची कामगिरी यंदाच्या प्रो कबड्डीच्या तिसऱ्या सत्रात लौकिकास साजेशी झाली नाही. चार सामन्यांतून दोन विजय आणि दोन पराभव अशी कामगिरी

- रोहित नाईक,  कोलकातागतविजेत्या बलाढ्य यू मुंबा संघाची कामगिरी यंदाच्या प्रो कबड्डीच्या तिसऱ्या सत्रात लौकिकास साजेशी झाली नाही. चार सामन्यांतून दोन विजय आणि दोन पराभव अशी कामगिरी झालेल्या मुंबईला आता कोलकाता येथे होणाऱ्या बंगळुरु बुल्स विरुध्द स्टार खेळाडूंच्या अनुपस्थित खेळावे लागेल. सध्या सुरु असलेल्या दक्षिण आशीयाई क्रीडा स्पर्धेत (सॅग) यू मुंबाचे सर्वाधिक ४ खेळाडू राष्ट्रीय संघात असून मुंबईचा कर्णधार अनुप कुमारकडे भारतीय संघाची धुरा सोपविण्यात आली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत भारताचा माजी कर्णधार आणि संघाचा नवा सदस्य राकेश कुमार यू मुंबाचे नेतृत्त्व करेल असे अनुपने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.पहिले दोन पर्व पटणा पायरेट्सचा कर्णधार असलेला राकेश यंदा मुंबईकर झाला. मात्र त्याला म्हणावी तशी छाप पाडता आली नाही. याविषयी अनुप म्हणाला, राकेश स्टार आहे. तो सुरुवातीला अपेक्षित खेळू शकला नसला तरी आमच्या अनुपस्थिमध्ये त्याच्यावर काहीप्रमाणात दडपण येईल आणि दडपणात त्याचा खेळ हमखास उंचावतो. त्यामुळे लवकरच राकेशचा दमदार खेळ सर्वांना दिसेल. शिवाय त्याच्याकडे भारताच्या कर्णधारपदाचा दीर्घ अनुभव असून त्याचा फायदा नक्कीच यू मुंबाला होईल. त्याच्या नेतृत्त्वाखाली संघाचा खेळ बहरेल.यंदाची सुरुवात निश्चित अपेक्षेप्रमाणे झाली नसली, तरी आम्ही सराव शिबीरामध्ये पहिल्या चार सामन्यात झालेल्या चुका सुधारण्यावर भर दिला. सर्वच खेळाडूंनी कसून सराव केला असल्याने कोलकाता येथील सामन्यापासून यू मुंबाचा हिसका दिसून येईल, असा विश्वासही अनुपने व्यक्त केला. ‘सॅग’ स्पर्धेत काशिलिंग आडके, रोहित कुमार, सुरेंद्र, संदीप नरवाल, राहूल चौधरी यांसारखे स्टार खेळाडूही भारतीय संघात असल्याने त्याचाही स्पर्धेवर परिणाम होईल असे सांगताना अनुप म्हणाला की, नक्कीच या खेळाडूंच्या अनुपस्थितीचा प्रत्येक संघावर परिणाम होईल. मात्र तरीही कोणताच संघ कमजोर नसेल. प्रत्येक खेळाडू सर्वोत्तम कमगिरीच्या प्रयत्नात असल्याने स्पर्धेतील चुरस कमी होणार नाही आणि मुंबईकरही यामध्ये चमकदार कामगिरी करतील.पाकिस्तानचे भारतासमोर आव्हान- सॅफ आणि प्रो कबड्डीची तयारी एकाचवेळी सुरु होती. सॅफ स्पर्धेत भारतीय संघ अत्यंत मजबूत असून विजेतेपदासाठी विशेष आव्हान नसेल. मात्र तरीही पाकिस्तान संघाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. त्यांचा संघ दमदार असून भारतासमोर त्यांचेच मुख्य आव्हान असेल.- भारताच्या कर्णधारपदाचे माझ्यावर कोणतेही दडपण नाही. मी नेहमीप्रमाणेच कोणत्याही दडपणाशिवाय खेळेन. संघातील प्रत्येक खेळाडू विजेतेपद उंचावण्यास सज्ज असल्याचे अनुप कुमारने सांगितले.