शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

ईडन गार्डनवर पावसाची सरशी

By admin | Updated: April 27, 2015 01:50 IST

आयपीएलच्या आठव्या पर्वात कोलकाता नाईट रायडर्स व राजस्थान रॉयल्स यांच्यादरम्यान रविवारी ईडन गार्डनवर खेळला जाणारा २५ वा

कोलकाता : आयपीएलच्या आठव्या पर्वात कोलकाता नाईट रायडर्स व राजस्थान रॉयल्स यांच्यादरम्यान रविवारी ईडन गार्डनवर खेळला जाणारा २५ वा सामना मुसळधार पावसामुळे रद्द करावा लागला. पावसाच्या व्यत्ययामुळे या लढतीत एकही चेंडू टाकला गेला नाही. ही लढत सायंकाळी ४ वाजता प्रारंभ होणार होती, पण त्यापूर्वीच कोलकातामध्ये मुसळधार पावसाला प्रारंभ झाला. त्यामुळे बाह्ण मैदान निसरडे झाले. सायंकाळी ७.२० वाजताच्या सुमारास पुन्हा एकदा मैदानाची पाहणी करण्यात आली. त्यानंतर पंचांनी सामना रद्द करण्याची घोषणा केली. ही लढत रद्द झाल्यामुळे उभय संघांना प्रत्येकी एक गुण बहाल करण्यात आला. राजस्थानच्या खात्यावर एकूण ११ गुणांची नोंद असून हा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे तर सात गुणांसह कोलकाता नाईट रायडर्स संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी कायम आहे. पावसाला प्रारंभ झाल्यानंतर मैदानावरील कर्मचाऱ्यांनी पूर्ण मैदानावर कव्हर टाकले, पण मुसळधार पावसामुळे मैदानावर पाणी साचले व बाह्य मैदान निसरडे झाले. येथे शनिवारी रात्रीपासून पावसाने हजेरी लावली होती, पण सामना प्रारंभ होण्यापूर्वी येथे पावसाचा जोर वाढला. त्यानंतर मैदान खेळण्यायोग्य करण्यासाठी दोन सुपर सोपर्सचा वापर करण्यात आला आणि अतिरिक्त पाणी काढण्याचा प्रयत्न केला गेला, पण त्यात यश आले नाही. कोलकाताचा कर्णधार गौतम गंभीर डग आऊटमध्ये बसून परिस्थिती जाणून घेत होता. मैदानावरील कर्मचाऱ्यांची धावपळ बघितल्यानंतर काही षटकांचा सामना आयोजित होण्याची शक्यता वर्तवली जात होतीपावसानंतर एकवेळ सामना प्रत्येकी पाच षटकांचा खेळवल्या जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. डेव्हिड लॉयड यांनी सांगितले की, ‘५.३० नंतर काही षटके कमी केल्या जारू शकतात.’ ५ वाजताच्या सुमारास पाऊस थांबल्यानंतर मैदानावरील कव्हर काढण्यास सुरुवात झाली, पण पुन्हा पावसाला सुरुवात झाली. पंचांनी खेळपट्टी व मैदानाची पाहणी केली. पंचांनी राजस्थानचे प्रशिक्षक पॅडी उप्टन यांच्यासोबत सामन्याच्या शक्यतेबाबत चर्चा केली. या व्यतिरिक्त गंभीरने केकेआरचे प्रशिक्षक ट्रॅव्हर बेलिस यांच्यासोबत चर्चा केली. प्रदीर्घ चर्चेनंतर व मैदानाची पाहणी केल्यानंतर पंचांनी सामना रद्द करण्याची घोषणा केली. केकेआरचा कर्णधार गौतम गंभीर व राजस्थान रॉयल्सचा कर्णधार शेन वॉटसन यांनी एकमेकांसोबत हस्तांदोलन केले. एकही चेंडू न टाकताच सामना रद्द करण्यात आला. रद्द सामन्यानंतर उभय संघांना प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागले. आयपीएलमध्ये पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झालेला हा पहिलाच सामना आहे. (वृत्तसंस्था)