शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

ईडन गार्डनवर पावसाची सरशी

By admin | Updated: April 27, 2015 01:50 IST

आयपीएलच्या आठव्या पर्वात कोलकाता नाईट रायडर्स व राजस्थान रॉयल्स यांच्यादरम्यान रविवारी ईडन गार्डनवर खेळला जाणारा २५ वा

कोलकाता : आयपीएलच्या आठव्या पर्वात कोलकाता नाईट रायडर्स व राजस्थान रॉयल्स यांच्यादरम्यान रविवारी ईडन गार्डनवर खेळला जाणारा २५ वा सामना मुसळधार पावसामुळे रद्द करावा लागला. पावसाच्या व्यत्ययामुळे या लढतीत एकही चेंडू टाकला गेला नाही. ही लढत सायंकाळी ४ वाजता प्रारंभ होणार होती, पण त्यापूर्वीच कोलकातामध्ये मुसळधार पावसाला प्रारंभ झाला. त्यामुळे बाह्ण मैदान निसरडे झाले. सायंकाळी ७.२० वाजताच्या सुमारास पुन्हा एकदा मैदानाची पाहणी करण्यात आली. त्यानंतर पंचांनी सामना रद्द करण्याची घोषणा केली. ही लढत रद्द झाल्यामुळे उभय संघांना प्रत्येकी एक गुण बहाल करण्यात आला. राजस्थानच्या खात्यावर एकूण ११ गुणांची नोंद असून हा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे तर सात गुणांसह कोलकाता नाईट रायडर्स संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी कायम आहे. पावसाला प्रारंभ झाल्यानंतर मैदानावरील कर्मचाऱ्यांनी पूर्ण मैदानावर कव्हर टाकले, पण मुसळधार पावसामुळे मैदानावर पाणी साचले व बाह्य मैदान निसरडे झाले. येथे शनिवारी रात्रीपासून पावसाने हजेरी लावली होती, पण सामना प्रारंभ होण्यापूर्वी येथे पावसाचा जोर वाढला. त्यानंतर मैदान खेळण्यायोग्य करण्यासाठी दोन सुपर सोपर्सचा वापर करण्यात आला आणि अतिरिक्त पाणी काढण्याचा प्रयत्न केला गेला, पण त्यात यश आले नाही. कोलकाताचा कर्णधार गौतम गंभीर डग आऊटमध्ये बसून परिस्थिती जाणून घेत होता. मैदानावरील कर्मचाऱ्यांची धावपळ बघितल्यानंतर काही षटकांचा सामना आयोजित होण्याची शक्यता वर्तवली जात होतीपावसानंतर एकवेळ सामना प्रत्येकी पाच षटकांचा खेळवल्या जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. डेव्हिड लॉयड यांनी सांगितले की, ‘५.३० नंतर काही षटके कमी केल्या जारू शकतात.’ ५ वाजताच्या सुमारास पाऊस थांबल्यानंतर मैदानावरील कव्हर काढण्यास सुरुवात झाली, पण पुन्हा पावसाला सुरुवात झाली. पंचांनी खेळपट्टी व मैदानाची पाहणी केली. पंचांनी राजस्थानचे प्रशिक्षक पॅडी उप्टन यांच्यासोबत सामन्याच्या शक्यतेबाबत चर्चा केली. या व्यतिरिक्त गंभीरने केकेआरचे प्रशिक्षक ट्रॅव्हर बेलिस यांच्यासोबत चर्चा केली. प्रदीर्घ चर्चेनंतर व मैदानाची पाहणी केल्यानंतर पंचांनी सामना रद्द करण्याची घोषणा केली. केकेआरचा कर्णधार गौतम गंभीर व राजस्थान रॉयल्सचा कर्णधार शेन वॉटसन यांनी एकमेकांसोबत हस्तांदोलन केले. एकही चेंडू न टाकताच सामना रद्द करण्यात आला. रद्द सामन्यानंतर उभय संघांना प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागले. आयपीएलमध्ये पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झालेला हा पहिलाच सामना आहे. (वृत्तसंस्था)