शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
2
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
3
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
4
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
5
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
6
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
7
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम
8
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
9
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
10
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
11
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
12
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
13
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
14
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
15
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
16
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
17
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
18
Nana Patekar : नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
19
'झिरो फिगर'च्या होण्यासाठी केलं खतरनाक डाएटिंग! तरुणी मरता मरता वाचली; भयानकच अनुभव..
20
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर

बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात पावसाचीच बॅटींग

By admin | Updated: June 15, 2014 20:24 IST

बांग्लादेशला प्रत्यूत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताच्या डावात पावसानेच जोरदार बॅटींग केल्याने सामना थांबवण्यात आला आहे. पावसामुळे खेळ थांबेपर्यंत भारताने एक विकेटच्या मोबदल्यात १०० धावा केल्या होत्या.

ऑनलाइन टीम

मीरपूर,दि. १५- भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात यजमान बांग्लादेशचा डाव २७२ धावांवर रोखण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. बांग्लादेशला प्रत्यूत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताच्या डावात पावसानेच जोरदार बॅटींग केल्याने सामना थांबवण्यात आला आहे. पावसामुळे खेळ थांबेपर्यंत भारताने एक विकेटच्या मोबदल्यात १०० धावा केल्या होत्या.  
मीरपूर येथे सहारा कपमधील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला रविवारी सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात बांग्लादेशने प्रथम फलंदाजी करत भारताला २७३ धावांचे लक्ष्य दिले होते. भारतातर्फे रॉबिन उथप्पा आणि अजिंक्य रहाणे ही जोडी सलामीला आली. या जोडीने बांग्लादेशच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत संघाला ९९ धावांपर्यंत पोहोचवले. मात्र उथप्पाला ५० धावांवर बाद करण्यात बांग्लादेशच्या गोलंदाजांना यश आले. यानंतर चेतेश्वर पुजारा मैदानात आला. मात्र तोपर्यंत पावसाने दमदार हजेरी लावल्याने खेळ थांबवण्यात आला. खेळ थांबवण्यात आला तेव्हा भारताने १६.४ षटकात एका विकेटच्या मोबदल्यात १०० धावा केल्या होत्या. अजिंक्य रहाणे ४६ तर चेतेश्वर पुजारा ० धावांवर खेळपट्टीवर होते.
दरम्यान, प्रथम फलंदाजी करणा-या बांग्लादेशची सुरुवात निराशाजनक होती. बांग्लादेशची सलामीची जोडी अवघ्या पाच धावांवर फोडण्यात भारताला यश आले. ३५ धावांवर बांग्लादेशला दुसरा धक्का बसला. मात्र त्यानंतर अनामूल हक (४४धावा) आणि कर्णधार मुश्फिकर हक (५९ धावा) या जोडीने बांग्लादेशचा डाव सावरला. अनामूल हक बाद झाल्यावर शाकीब हसनने (५२ धावा) कर्णधाराला मोलाची साथ दिली. बांग्लादेशच्या २३५ धावांवर आठ विकेटही गेल्या होत्या. मात्र मुशरफ मोर्ताझा आणि अब्दूर रझाक या तळाच्या फलंदाजांनी फटकेबाजी करत बांग्लादेशला सन्मानजनक धावसंख्येजवळ पोहोचवले. 
भारतातर्फे उमेश यादवने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. उमेशने नऊ षटकात ४८ धावा दिल्या. तर एकदिवसीय सामन्यात पदार्पण करणा-या जम्मू काश्मीरच्या परवेझ रसूलच्या फिरकीनेही बांग्लादेशच्या दोन विकेट घेतल्या. रसूलने १० षटकांत ६० धावा दिल्या. फिरकी गोलंदा अमित मिश्राने १० षटकात ५५ धावा देत दोन विकेट घेतल्या. अक्षर पटेल आणि सुरैश रैनाने प्रत्येकी एक विकेट घेतली.