शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात पावसाचीच बॅटींग

By admin | Updated: June 15, 2014 20:24 IST

बांग्लादेशला प्रत्यूत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताच्या डावात पावसानेच जोरदार बॅटींग केल्याने सामना थांबवण्यात आला आहे. पावसामुळे खेळ थांबेपर्यंत भारताने एक विकेटच्या मोबदल्यात १०० धावा केल्या होत्या.

ऑनलाइन टीम

मीरपूर,दि. १५- भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात यजमान बांग्लादेशचा डाव २७२ धावांवर रोखण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. बांग्लादेशला प्रत्यूत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताच्या डावात पावसानेच जोरदार बॅटींग केल्याने सामना थांबवण्यात आला आहे. पावसामुळे खेळ थांबेपर्यंत भारताने एक विकेटच्या मोबदल्यात १०० धावा केल्या होत्या.  
मीरपूर येथे सहारा कपमधील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला रविवारी सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात बांग्लादेशने प्रथम फलंदाजी करत भारताला २७३ धावांचे लक्ष्य दिले होते. भारतातर्फे रॉबिन उथप्पा आणि अजिंक्य रहाणे ही जोडी सलामीला आली. या जोडीने बांग्लादेशच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत संघाला ९९ धावांपर्यंत पोहोचवले. मात्र उथप्पाला ५० धावांवर बाद करण्यात बांग्लादेशच्या गोलंदाजांना यश आले. यानंतर चेतेश्वर पुजारा मैदानात आला. मात्र तोपर्यंत पावसाने दमदार हजेरी लावल्याने खेळ थांबवण्यात आला. खेळ थांबवण्यात आला तेव्हा भारताने १६.४ षटकात एका विकेटच्या मोबदल्यात १०० धावा केल्या होत्या. अजिंक्य रहाणे ४६ तर चेतेश्वर पुजारा ० धावांवर खेळपट्टीवर होते.
दरम्यान, प्रथम फलंदाजी करणा-या बांग्लादेशची सुरुवात निराशाजनक होती. बांग्लादेशची सलामीची जोडी अवघ्या पाच धावांवर फोडण्यात भारताला यश आले. ३५ धावांवर बांग्लादेशला दुसरा धक्का बसला. मात्र त्यानंतर अनामूल हक (४४धावा) आणि कर्णधार मुश्फिकर हक (५९ धावा) या जोडीने बांग्लादेशचा डाव सावरला. अनामूल हक बाद झाल्यावर शाकीब हसनने (५२ धावा) कर्णधाराला मोलाची साथ दिली. बांग्लादेशच्या २३५ धावांवर आठ विकेटही गेल्या होत्या. मात्र मुशरफ मोर्ताझा आणि अब्दूर रझाक या तळाच्या फलंदाजांनी फटकेबाजी करत बांग्लादेशला सन्मानजनक धावसंख्येजवळ पोहोचवले. 
भारतातर्फे उमेश यादवने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. उमेशने नऊ षटकात ४८ धावा दिल्या. तर एकदिवसीय सामन्यात पदार्पण करणा-या जम्मू काश्मीरच्या परवेझ रसूलच्या फिरकीनेही बांग्लादेशच्या दोन विकेट घेतल्या. रसूलने १० षटकांत ६० धावा दिल्या. फिरकी गोलंदा अमित मिश्राने १० षटकात ५५ धावा देत दोन विकेट घेतल्या. अक्षर पटेल आणि सुरैश रैनाने प्रत्येकी एक विकेट घेतली.