शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
3
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
4
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
5
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
6
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
7
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
8
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
9
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
10
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
11
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
12
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
13
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
14
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
15
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
16
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
17
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
18
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
19
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
20
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

पावसामुळे आमची एकाग्रता वाढली : रोहित

By admin | Updated: May 7, 2015 03:40 IST

दिल्ली डेअरडेव्हील्स विरुध्दच्या महत्त्वाच्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना झालेल्या पावसामुळे संघाला पुन्हा एकदा एकाग्रता मिळवण्यासाठी मदत झाली.

मुंबई : दिल्ली डेअरडेव्हील्स विरुध्दच्या महत्त्वाच्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना झालेल्या पावसामुळे संघाला पुन्हा एकदा एकाग्रता मिळवण्यासाठी मदत झाली. कारण, सुरुवातीला डकवर्थ लुईस नियम लक्षात घेऊन फलंदाजी केल्यानंतर आम्ही आमच्या योजनेत बदल केला, असे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने सांगितले.रोहितने या शानदार विजयाबद्दल सांगितले की, डकवर्थ लुईस नियम लक्षात घेता सुरुवातीच्या पहिल्या पाच षटकांत आम्हाला निर्धारीत लक्ष्याच्या पुढे राहणे आवश्यक होते. आम्ही सामन्यात पुढे राहण्याच्या प्रयत्नात होतो. मी मुंबईकर असल्याने पाऊस जास्तवेळ पडणार नसल्याची जाणीव होती. मात्र, हा देखील एकप्रकारचा जुगार होता, असे सांगतानाच पुन्हा खेळण्यास सुरुवात केल्यानंतर आम्ही नेहमीचा खेळ खेळण्यास सुरुवात केली आणि नशिबाने पावसाने यावेळी अडचण आणली नाही, असेही रोहित म्हणाला.या विजयासह गुणतालिकेत चौथ्या स्थानी झेप घेतल्याने आनंदित असलेल्या रोहितने या सामन्यात प्रभावी गोलंदाजी करणाऱ्या हरभजनचे कौतुक करताना सांगितले की, भज्जीची कामगिरी अद्भूत होती. सामनावीर ठरलेल्या भज्जीने चार षटकांत केवळ ११ धावा देऊन २ बळी घेतले होते. भज्जीला चांगला टर्न मिळत होता. त्याची गोलंदाजी निर्णायक ठरली. या कामगिरीत सातत्य राखण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे रोहित म्हणाला.(वृत्तसंस्था)