शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

मुंबई अर्ध मॅरेथॉनमध्ये राहुल, ज्योतीची छाप

By admin | Updated: August 22, 2016 04:32 IST

धावपटू राहुल कुमार पाल आणि ज्योती चौहान यांनी अनुक्रमे पुरुष व महिला गटात विजेतेपद पटकावत मुंबई अर्ध मॅरेथॉनमध्ये छाप पाडली.

मुंबई : धावपटू राहुल कुमार पाल आणि ज्योती चौहान यांनी अनुक्रमे पुरुष व महिला गटात विजेतेपद पटकावत मुंबई अर्ध मॅरेथॉनमध्ये छाप पाडली. १५ हजारांहून अधिक धावपटूंमधून १: ०४: २८ सेकंदात २१ किमीचे अंतर पूर्ण करत राहूलने अजिंक्यपदावर नाव कोरले. तर कालिदास हिरवेला १:०४.३१ सेकंदासह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. दामोर मोहनभाईने १: ०५: ०१ सेंकद ही वेळ नोंदवून तिसऱ्या स्थानी झेप घेतली.महिला गटातील अर्धमॅरेथॉनमध्ये ज्योती चौहानने ०१:२८.२५ सेकंद या वेळेसह विजेतेपद मिळवले. तर सीमाने ०१:२९.३२ सेकंद वेळेसह दुसरे स्थान मिळवले. पुरुषांच्या १० किमी स्पर्धेत परशुराम भोयने पहिले स्थान मिळवले. दिनेश गुरुनाथला दुसरे आणि अमित भगवान मालीला तिसरे स्थान मिळाले. महिलांमध्ये आरती सुरवसेने अव्वल क्रमांक मिळवला. तर दुसरे आणि तिसरे स्थान अनुक्रमे प्रियंका नवकूदकर, अर्पिता नागराज यांनी मिळवले. (क्रीडा प्रतिनिधी)>प्रत्येक धावपटू हाहिरोच आहे - सचिनभारतरत्न आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने अर्ध मॅरेथॉनचे फ्लॅगआॅफ केले. यावेळी सचिन म्हणाला की, निरोगी आयुष्यासाठी आरोग्यदायी जीवनशैली अनुभवणे गरजेचे आहे. धावपळीच्या आयुष्यात नागरिकांनी आपल्या तब्येतीची काळजी घेणे गरजेचे आहे. निरोगी देश घडवण्यासाठी निरोगी नागरिक असणे आवश्यक असून, अर्ध मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेला प्रत्येक धावपटू हा हिरोच आहे. २१ किमी हे अंतर पार करणे सोपे नाही. ते पार करण्यासाठी नियोजन, शिस्त आणि अंतर पूर्ण करण्याची जिद्द आवश्यक आहे. या सगळ््या गोष्टीं मॅरेथॉनमधील धावपटूंमध्ये आहे.