शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

...तर धोनीचा निर्णय योग्यच : राहुल द्रविड

By admin | Updated: January 7, 2017 04:37 IST

२०१९च्या क्रिकेट विश्वचषकात महेंद्रसिंग धोनी खेळणार नसेल, तर त्याचा कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय योग्य आहे

नवी दिल्ली : दोन वर्षांनी होणाऱ्या २०१९च्या क्रिकेट विश्वचषकात महेंद्रसिंग धोनी खेळणार नसेल, तर त्याचा कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय योग्य आहे, असे मत भारताचा माजी कर्णधार आणि भारतीय ‘अ’ संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड याने व्यक्त केले आहे. कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा धोनीचा निर्णय आश्चर्यकारक नव्हता, असे सांगून राहुल द्रविड पुढे म्हणाला, ‘पुढच्या विश्वचषकात धोनी कर्णधार म्हणून स्वत:ला पाहात नसेल तर त्याचा निर्णय योग्य आहे. विराट कोहलीकडे संघाची सूत्रे देण्यासाठी ही चांगली वेळ असून, त्यालाही वर्ल्डकपसाठी मनासारखी संघबांधणी करता येईल.’धोनीचा अनुभव आणि क्षमतेला अजिबात तोड नाही. दडपणात खेळण्याची धोनीची क्षमता आहे, हे सर्वश्रुत आहे. असे खेळाडू आणि कर्णधार सहजासहजी मिळत नाहीत. धोनी भारतीय वन-डे संघासाठी अमूल्य खेळाडू आहे; पण कामगिरीच्या बळावरच तुम्हाला संघात तुमचे स्थान निश्चित करता येते, असे द्रविडने नमूद केले.मोठ्या स्पर्धांपूर्वी धोनीचा फॉर्म हा चर्चेचा मुद्दा बनू शकतो. धोनीचे खेळणे त्याची कामगिरी आणि क्षमतेवर विसंबून असेल. संघात त्याचे स्थान यष्टिरक्षण तसेच फलंदाजी यासाठीच असेल. अनुभव आणि खेळाचे ज्ञान असल्याने धोनी चांगल्या कामगिरीद्वारे संघात कायम राहावा, असे कोहलीलासुद्धा वाटत असावे. क्रिकेट इतिहासात धोनी हा भारताचा सर्वांत यशस्वी कर्णधार म्हणून सदैव स्मरणात राहील. या खेळाला आणि भारतीय संघाला सातत्याने पुढे नेण्याची जबाबदारी स्वीकारणारा अफलातून कर्णधार या नात्याने धोनीची तुलना करणे कठीण असल्याचे मत द्रविडने शेवटी व्यक्त केले. (वृत्तसंस्था)