शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

रहीम, शाकिबने सावरले

By admin | Updated: February 12, 2017 05:30 IST

बांगलादेशचा मधल्या फळीतील फलंदाज कर्णधार मुशफिकर रहीमने भारतीय गोलंदाजांना समर्थपणे सामोरे जाताना नाबाद ८१ धावांची खेळी करीत एकमेव कसोटी सामन्यात तिसऱ्या

हैदराबाद : बांगलादेशचा मधल्या फळीतील फलंदाज कर्णधार मुशफिकर रहीमने भारतीय गोलंदाजांना समर्थपणे सामोरे जाताना नाबाद ८१ धावांची खेळी करीत एकमेव कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी आपल्या संघाला ६ बाद ३२२ धावांची मजल मारून दिली. अष्टपैलू शाकिब-अल-हसनने ८२ धावांची खेळी केली. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी रहीमला दुसऱ्या टोकाकडून मेहदी हसन मिराज (५१) साथ देत होता. बांगलादेशला भारताची पहिल्या डावातील ६ बाद ६८७ (डाव घोषित) धावसंख्या गाठण्यासाठी अद्याप ३६५ धावांची गरज असून त्यांचे चार गडी शिल्लक आहेत. भारतातर्फे उमेश यादवने १८ षटकांत ७२ धावांत २ बळी घेतले, तर फिरकी जोडी आश्विन व जडेजा यांना विशेष छाप सोडता आली नाही. आश्विनच्या गोलंदाजीवर १२ चौकार लगावले गेले. ईशांत शर्माने जुन्या चेंडूने प्रभावी मारा केला, मुशफिकरने त्याला वर्चस्व गाजवण्याची संधी दिली नाही. या लढतीत भारताचे पारडे अद्याप वरचढ असले तरी अखेरच्या दोन सत्रांत बांगलादेश संघाचे मनोधैर्य त्यांच्या फलंदाजांच्या कामगिरीमुळे उंचावण्यास नक्कीच मदत झाली. युवा मिराजने पहिले कसोटी अर्धशतक झळकावताना संघर्षपूर्ण खेळी केली. मुशफिकरने २०६ चेंडूंना सामोरे जाताना १२ चौकार लगावले, तर मिराजने १०३ चेंडूंमध्ये १० चौकार ठोकले. बांगलादेशने अखेरच्या सत्रात ३० षटकांत ७६ धावा वसूल केल्या. बांगलादेशला फॉलोआॅन टाळण्यासाठी अद्याप १६६ धावांची गरज आहे. त्याआधी, बांगलादेशने उपाहारानंतर दोन फलंदाज गमावित १२१ धावा फटकावल्या. भारताने शाकिब व शब्बीर रहमान यांना झटपट माघारी परतवत स्थितीवर नियंत्रण मिळवले. पहिल्या सत्रात वर्चस्व गाजवणाऱ्या शाकिबने १०३ चेंडूंमध्ये ८२ धावांची खेळी केली. शाकिब बाद झाल्यानंतर शब्बीरला (१६) मोठी खेळी करता आली नाही. (वृत्तसंस्था)त्याला जडेजाने तंबूचा मार्ग दाखवला. शाकिबने आश्विनच्या गोलंदाजीवर मिडॉनला उमेशच्या हाती झेल दिला. शाकिबने मुशफिकर रहीमसोबत १०७ धावांची भागीदारी केली. यादवचा तो भेदक मारापहिल्या सत्रात उमेश यादवने बांगलादेशच्या ड्रेसिंग रूममध्ये खळबळ माजवली. उपाहारापूर्वी बांगालदेशने तीन गडी गमावले. उमेशने सातत्याने वेगवान मारा केला. उमेशच्या माऱ्यापुढे सलामीवीर तमीम इक्बाल (२५) सहज भासत होता, पण तो धावबाद झाला. उमेशने सकाळच्या सत्रात पॅव्हेलियन एंडकडून तीन षटके गोलंदाजी केली, पण त्याला यश मिळाले नाही. त्यानंतर कर्णधाराने त्याचे एंड बदलविले. त्यानंतर त्याने सहा षटके अचूक मारा केला. उमेशचा आऊटस्विंग मारा खेळताना मोमिनुल व महमुदुल्लाह यांना सातत्याने अडचण जाणवली. त्याचा एक इनस्विंग चेंडू महमुदुल्लाहच्या पॅडवर आदळला, पण पंचांनी त्याला नाबाद ठरविले. भारताने डीआरएसचा आधार घेतला, पण चेंडू डाव्या यष्टीवर आदळत असल्यामुळे मैदानावरील पंचांचा निर्णय कायम राहिला. महमुदुल्लाह व शाकिब यांनी चौथ्या विकेटसाठी ४५ धावांची भर घातली असली तरी त्यांच्या खेळण्यामध्ये मात्र सहजता नव्हती. त्यानंतर कर्णधाराने ईशांतकडे चेंडू सोपविला. ईशांतने महमुदुल्लाहला पायचित करीत कर्णधाराचा निर्णय साथ ठरविला. फलंदाजाने त्या वेळी डीआरएसचा आधार घेतला, पण निर्णय गोलंदाजाच्या बाजूने गेला. धावफलक भारत : पहिला डाव : ६ बाद ६८७ (डाव घोषित).बांगलादेश पहिला डाव : तमिम इक्बाल धावबाद २५, सौम्या सरकार झे. साहा गो. यादव १५, मोमिनुल हक पायचित गो. यादव १२, महमुदुल्लाह पायचित गो. शर्मा २८, शाकिब अल-हसन झे. यादव गो. आश्विन ८२, मुशफिकर रहीम खेळत आहे ८१, शब्बीर रहमान पायचित गो. जडेजा १६, मेहदी हसन मिराज खेळत आहे ५१. अवांतर (१३). एकूण : १०४ षटकांत ६ बाद ३२२. गडी बाद क्रम : १-३८, २-४४, ३-६४, ४-१०९, ५-२१६, ६-२३५. गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार १७-६-४६-०, ईशांत शर्मा १६-५-५४-१, आश्विन २४-६-७७-१, उमेश यादव १८-३-७२-२, रवींद्र जडेजा २९-८-६०-१.