शहरं
Join us  
Trending Stories
1
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
2
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
3
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
4
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
5
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
6
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
7
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
8
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
9
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
10
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
11
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
12
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
13
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
14
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
15
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
16
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
17
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
18
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
19
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
20
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य

रहाणे-धोनीचा खेळ संघासाठी की जागा टिकवण्यासाठी

By admin | Updated: July 3, 2017 14:01 IST

धोनी आणि रहाणे दोघांकडे पुरेसा अनुभव असून कुठल्या टप्प्याला खेळाचा गेअर बदलायचा हे दोघांना चांगले कळते. तरी, त्यांनी इतकी सावध, संभाळून फलंदाजी का केली ?

 ऑनलाइन लोकमत 

अँटिग्वा, दि. 3 - चौथ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजकडून झालेल्या पराभवामुळे पुन्हा एकदा भारतीय संघाच्या क्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या कामगिरीमुळे रथी-महारथी खेळाडूंनी भरलेला भारतीय संघ कागदी वाघ असल्याचे दिसून आले. वेस्ट इंडिजच्या नवख्या, अननुभवी संघासमोर भारताला 190 धावांचे  सोपे लक्ष्य पार करता आले नाही. भारतीय संघ मालिकेत 2-1 ने आघाडीवर असला तरी, भारतीय संघाची कामगिरी उत्तम म्हणता येणार नाही. कारण भारत ज्या वेस्ट इंडिजच्या संघावर विजय मिळवतोय त्या संघात ख्रिस गेल, ब्राव्हो, मार्लन सॅम्युल्स, लेंडल सिमॉन्स आणि रसेल या बडया खेळाडूंचा समावेश नाहीय. 
 
चौथ्या वनडेमध्ये सांघिक कामगिरी चांगली झाली नाही असे म्हणता येणार नाही. कारण गोलंदाजांनी आपली भूमिका चोख बजावली होती. अजिंक्य रहाणे आणि महेंद्रसिंह धोनीचा अपवाद वगळता अन्य फलंदाज अपयशी ठरले असले तरी, रहाणे-धोनीने संघाची नौका किना-याला लावायला हवी होती. धोनीच्या 114 चेंडूत 54 धावा आणि रहाणेच्या 91 चेंडूत 60 धावांमुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. धोनी आणि रहाणे दोघांकडे पुरेसा अनुभव असून कुठल्या टप्प्याला खेळाचा गेअर बदलायचा हे दोघांना चांगले कळते. तरी, त्यांनी इतकी सावध, संभाळून फलंदाजी का केली ?
 
रहाणेने संधी मिळाल्यानंतर चारही सामन्यात अर्धशतक फटकावली असली तरी, संघाच्या गरजेपेक्षा स्थान टिकवून धडपड त्यात जास्त दिसते. कारण संघात सध्या सलामीवीराच्या जागेसाठी चुरस आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहित शर्मा संघात परतल्यानंतर रहाणेला संपूर्ण स्पर्धेमध्ये बेंचवर बसून रहावे लागले होते. रहाणेकडे फलंदाजीचे उत्तम तंत्र आहे पण अनेक सामन्यांमध्ये रहाणेच्या फलंदाजीची गती मंदावत जाते हे दिसून आलेय. 
 
तिस-या वनडेमध्ये रहाणेने 72 धावा करण्यासाठी 112 चेंडू घेतले. सध्याचे वनडे क्रिकेट भरपूर फास्ट झाले आहे. तिथे कमी चेंडूमध्ये जास्त धावा करणा-या फलंदाजाला पहिली पसंती मिळते. जर तुम्ही खेळपट्टीवर स्थिरस्थावर होण्यासाठी जास्त चेंडू घेतले तर, तुम्ही शेवटपर्यंत मैदानावर टिकून विजय मिळवून द्याल अशी अपेक्षा तुमच्याकडून असणार. पण रहाणेच्या बाबतीत असे होत नाहीय. धोनी सुध्दा याच परिस्थितीतून जातोय. 
 
आणखी वाचा 
होल्डरचा पंच! अटीतटीच्या लढतीत भारत पराभूत
पराभवानंतर स्मिथची अजिंक्य रहाणेला "बिअर" ऑफर
 
धोनीला जागतिक क्रिकेटमध्ये बेस्ट फिनिशर समजले जाते. धावांचा पाठलाग करताना मोक्याच्या क्षणी धोनीने अनेक सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवून दिला आहे. पण रविवारी वेस्ट इंडिज विरुद्ध 190 धावांच्या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना धोनी सपशेल अपयशी ठरला. धोनी 48 व्या षटकापर्यंत मैदानावर होता. पण धोनीला संघाला विजय मिळवून देता आला नाही. धोनीने 114 चेंडूत 54 धावांची कासवछाप खेळी केली. भारतीय संघ आज जागतिक क्रिकेटमध्ये बलवान समजला जातो. पण विजयात सातत्य टिकवणे या संघाला जमत नाहीय. जर अशीच परिस्थिती राहिली तर, आपण 2019 वर्ल्डकप जिंकू शकतो का ? याचा विचार निवड समितीने करायला हवा.