शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रहाणे कर्णधार; हरभजनचे वन-डे संघात पुनरागमन

By admin | Updated: June 30, 2015 02:17 IST

अनुभवी आॅफ स्पिनर हरभजन सिंगने चार वर्षांनंतर आज वन-डे संघात पुनरागमन केले, तर निवड समितीने पुढील महिन्यात आयोजित झिम्बाब्वे दौऱ्यासाठी अनेक सिनिअर खेळाडूंना

नवी दिल्ली : अनुभवी आॅफ स्पिनर हरभजन सिंगने चार वर्षांनंतर आज वन-डे संघात पुनरागमन केले, तर निवड समितीने पुढील महिन्यात आयोजित झिम्बाब्वे दौऱ्यासाठी अनेक सिनिअर खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेत दुय्यम दर्जाच्या संघाची निवड केली. यष्टिरक्षक फलंदाज रॉबिन उथप्पाने वन-डे संघात पुनरागमन केले असून, वेगवान गोलंदाज संदीप शर्मा व लेग स्पिनर कर्ण शर्मा यांचा अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील संघात समावेश करण्यात आला. सलामीवीर मुरली विजय, अंबाती रायडू व भुवनेश्वर कुमार या सिनिअर खेळाडूंची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवड करण्यात आली. निवड समितीच्या बैठकीनंतर बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी संघ जाहीर केला. गेल्या काही कालावधीपासून दुखापतीमुळे त्रस्त असलेल्या मनोज तिवारीचे पुनरागमन झाले आहे. त्याला सिनिअर खेळाडूंच्या अनुपस्थितीचा लाभ मिळाला. निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील पत्रकारांसोबत बोलताना म्हणाले, ‘‘बांगलादेश दौऱ्यात भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक झाली. त्यामुळे भविष्याबाबत विचार करणे आवश्यक आहे. २०१६ मध्ये होणाऱ्या टी-२० विश्वकप क्रिकेट स्पर्धेबाबत विचार करताना या संघाची निवड करण्यात आली. आम्ही विश्वकप स्पर्धेसाठीही सर्वोत्तम संघाची निवड केली होती. भविष्यातील मालिकांचा (श्रीलंका दौरा, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात खेळली जाणारी मालिका व टी-२० विश्वकप) विचार करता आम्ही विश्रांतीची गरज असलेल्या खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला.’’ भारतीय संघाने या महिन्याच्या सुरुवातीला बांगलादेशविरुद्धची मालिका १-२ ने गमावली. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघात हरभजन सिंग, अक्षर पटेल व कर्ण शर्मा हे तीन स्पेशालिस्ट फिरकीपटू आहेत. वेगवान गोलंदाजीची जबाबदारी भुवनेश्वर कुमार, मोहित शर्मा, संदीप शर्मा व स्टुअर्ट बिन्नी सांभाळतील. पाटील यांनी बांगलादेश दौऱ्यात कसोटी संघात पुनरागमन करणाऱ्या हरभजनबाबत बोलताना सांगितले, की ही प्रदीर्घ कालावधीसाठीची संघनिवड नाही, पण गेल्या मालिकेत हरभजनची कामगिरी बघता त्याला संधी मिळणे आवश्यक होते. निवड समितीचे काम सर्वोत्तम उपलब्ध संघाची निवड करणे आहे. उर्वरित सर्व काही संघव्यवस्थापनावर अवलंबून आहे. संघाची निवड झाल्यानंतर अंतिम ११ खेळाडूंची निवड करण्याची जबाबदारी कर्णधाराची असते.फलंदाजीची भिस्त रहाणे, विजय, रायडू, तिवारी, मनीष पांडे व केदार जाधव यांच्यावर अवलंबून राहील. बीसीसीआयचे सचिव ठाकूर म्हणाले,‘‘हा चांगला संघ आहे. युवा खेळाडूंची निवड करणे म्हणजे आगेकूच करणे आहे.’’ विश्रांती देण्यात आलेल्या सिनिअर खेळाडूंमध्ये वन-डे कर्णधार महेंद्रसिंह धोनी, कसोटी कर्णधार विराट कोहली, सलामीवीर शिखर धवन, रोहित शर्मा, आॅफ स्पिनर आर. आश्विन आदींचा समावेश आहे. (वृत्तसंस्था) रहाणेची कारकीर्द :एकदिवसीय क्रिकेटमध्ये पर्दापण : ३ सप्टेंबर २०११ विरुद्ध इंग्लंडसामने : ५५; डाव : ५४; नाबाद : ०२; धावा : १,५९३; फलंदाजी सरासरी : ३०.६३; शतके : ०२; अर्धशतके : ०९; चौकार : १५८; षटकार : १९; झेल : २७; टॉप स्कोर : १११.टी-२० पर्दापण : ३१ आॅगस्ट २०११ विरुद्ध इंग्लंड; शेवटची टी-२० : ७ सप्टेंबर २०१४ विरुद्ध इंग्लंड टी-२० : सामने : ११; डावा : ११; धावा : २३६; टॉप स्कोर ६१; सरासरी : २१.४५; अर्धशतके : ०१;चौकार : २१; षटकार : ०६; झेल : ११ भारतीय संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), मुरली विजय, अंबाती रायडू, मनोज तिवारी, केदार जाधव, रॉबिन उथप्पा, मनीष पांडे, अक्षर पटेल, हरभजन सिंग, कर्ण शर्मा, धवल कुलकर्णी, स्टुअर्ट बिन्नी, भुवनेश्वर कुमार, मोहित शर्मा, संदीप शर्मा.भारतीय संघात समावेश झाल्यामुळे खूप उत्साही आहे. ही एक चांगली संधी असून, या दौऱ्यात चांगली कामगिरी करून मिळालेल्या संधीचे नक्कीच सोने करेन. माझ्या या यशाचे श्रेय आई-बाबा व पत्नीला आहे. ते ठामपणे माझ्या मागे उभे राहिल्याने इथपर्यंत पोचू शकलो. - केदार जाधव, भारतीय संघातील फलंदाज