शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

भारताला पुजाराचा सहारा, अजूनही 91 धावांची पिछाडी

By admin | Updated: March 18, 2017 17:51 IST

चेतेश्वर पुजाराने लगावलेल्या नाबाद शतकाच्या आधारे ऑस्ट्रेलियाविरोधातील तिस-या कसोटी सामन्यात भारत भक्कम स्थितीत पोहोचला आहे

ऑनलाइन लोकमत
रांची, दि. 18 - चेतेश्वर पुजाराने लगावलेल्या नाबाद शतकाच्या आधारे ऑस्ट्रेलियाविरोधातील तिस-या कसोटी सामन्यात भारत भक्कम स्थितीत पोहोचला आहे. तिस-या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने सहा विकेट्स गमावत 360 धावा केल्या आहेत. पुजाराव्यतिरिक्त लोकेश राहुल (67) आणि मुरली विजय (82) यांनी अर्धशतक केलं. ऑस्ट्रेलिया संघात स्थान मिळालेला युवा गोलंदाज कमिंस कंगारु सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. विराट कोहलीसोबत चार विकेट्स त्याने आपल्या नावावर केल्या. 
 
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डाव्यातील 451 धावांच्या तुलनेत भारत अजूनही 91 धावांनी पिछाडीवर आहे. पुजारासोबत विकेटकीपर रिद्धिमान साहा 18 धावांसह मैदानावर आहे.  तिस-या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा भारताने सर्वात अगोदर मुरली विजयची विकेट गमावली. त्यानंतर अजिंक्य रहाणे (14) आणि विराट कोहलीच्या (6) रुपाने दोन महत्वाचे गडी बाद झाल्याने मजबूत स्थितीत असलेल्या भारतीय संघाचा झटका बसला. ऑस्ट्रेलियाने दिवसाच्या शेवट्या सत्रात नायर (23) आणि अश्विन (3) यांची विकेट घेत भारताला अजून दोन झटके दिले. भारताने जेव्हा आपला सहावा गडी गमावला तेव्हा भारत 123 धावांनी पिछाडीवर होता. दिवसाच्या शेवटच्या सत्रात भारताचा खेळ मंदावला. अंतिम सत्रात भारताने फक्त 57 धावा केल्या. पुजारा मैदानावर अजून खेळत असल्याने भारताच्या आशा कायम आहेत. 
 
याअगोदर भारताने लंचपर्यंत दोन विकेट गमावत 193 धावा केल्या होत्या. दुस-या सत्रात 110 धावा केल्या होत्या. लंचनंतर मैदानावर उतरलेल्या विराट कोहलीकडून खूप सा-या अपेक्षा होत्या. क्षेत्ररक्षण करताना खांद्याला दुखापत झाल्याने विराटने मैदान सोडलं होतं. मात्र विराट कोहली अपेक्षांवर खरा उतरु शकला नाही आणि स्वस्तात बाद झाला. 
 
अजिंक्य रहाणेने सुरुवात केली तेव्हा लय सापडल्याचं दिसत होतं. मात्र बाऊन्स न समजल्याने मॅथ्यू वेडच्या हाती त्याची विकेट गेली. पुजाराने केलेलं शकत या मालिकेतील भारतीय फलंदाजाचं पहिलं शतक ठरलं आहे.