शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

संघाच्या योजनांमध्ये पुजारा महत्त्वपूर्ण

By admin | Updated: September 29, 2016 04:28 IST

टेस्ट स्पेशालिस्ट फलंदाज चेतेश्वर पुजारावर वेस्ट इंडिज दौऱ्यातील संथ फलंदाजीमुळे टीका होत असताना भारतीय संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी मात्र पुजाराचे समर्थन केले

कोलकाता : टेस्ट स्पेशालिस्ट फलंदाज चेतेश्वर पुजारावर वेस्ट इंडिज दौऱ्यातील संथ फलंदाजीमुळे टीका होत असताना भारतीय संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी मात्र पुजाराचे समर्थन केले असून, संघाच्या योजनांमध्ये पुजारा महत्त्वपूर्ण खेळाडू असून, त्याच्यावर कोणीही दबाव टाकलेला नाही, असे सांगितले.विंडीज दौऱ्यानंतर पुजाराच्या स्ट्राइक रेटमध्ये चांगलीच सुधारणा झाली. विंडीज दौऱ्यावर त्याने दोन्ही डावांमध्ये ६२ धावा काढल्या. कानपूर कसोटीत न्यूझीलंडविरुद्ध पुजाराने अनुक्रमे ६२ व ७८ धावांची खेळी खेळली. त्याने मुरली विजयसह केलेल्या दोन शतकी भागीदारी भारताच्या विजयात निर्णायक ठरल्या.माजी निवड समिती प्रमुख संदीप पाटील यांनी वक्तव्य केले होते की, विंडीज दौऱ्यात पुजराचा फॉर्म चिंतेचा विषय होता आणि कुंबळे व कर्णधार कोहली यांनी पुजाराशी स्ट्राइक रेट उंचावण्याविषयी बातचीत केली होती. याबाबत कुंबळे म्हणाले की, ‘मी खूप आश्चर्यचकीत आणि निराश आहे की, याप्रकारच्या गोष्टी समोर येत आहेत. जेव्हा कोणी खेळाडू परिस्थितीनुसार चांगला खेळतो, तोपर्यंत सर्वकाही सुरळीत असते. ते आमच्या योजनांसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. मला माहितेय त्याचे यश कायम राहील.’गौतम गंभीरच्या पुनरागमनाविषयी कुंबळे म्हणाले की, ‘गौतमचे पुनरागमन खूप चांगले आहे. दुर्दैवाने लोकेश राहुल गतसामन्यात दुखापतग्रस्त झाला. मला वाटते की, सलामीवीर फलंदाजांसह काहीतरी घडत आहे. कोणत्या तरी कारणामुळे ते दुखापतग्रस्त होत आहे. विंडीज दौऱ्यात विजयला दुखापत झाली, तर आता राहुलला. राहुल चांगल्या फॉर्ममध्ये होता.’गंभीरने देशांतर्गत स्पर्धांमध्ये चांगले प्रदर्शन केले. तो १५ सदस्यीय संघाचा भाग आहे. सर्व १५ खेळाडू निवडीसाठी उपलब्ध आहेत, असेही कुंबळे यांनी या वेळी सांगितले. तसेच, या वेळी कुंबळे यांनी रोहित शर्माचेही समर्थन केले. (वृत्तसंस्था)लेगस्पिनर अमित मिश्राचा कसून सरावभारताने कानपूरमध्ये पहिल्या कसोटी सामन्यांत ४ गोलंदाजांसह विजय मिळविला असला, तरी दुसऱ्या कसोटी सामन्यात मात्र अमित मिश्राला अंतिम ११ खेळाडूंमध्ये संधी मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कारण हा लेग स्पिनर बुधवारी फलंदाजी व गोलंदाजीचा कसून सराव करीत असल्याचे दिसून आले. भारतीय प्रशिक्षक व महान लेग स्पिनर अनिल कुंबळे यांनी ५ गोलंदाजांसह खेळण्याच्या रणनीतीचे समर्थन केले आहे. कुंबळे यांनी आज माजी कर्णधार सौरव गांगुलीसोबत प्रदीर्घ काळ चर्चा केली. गांगुली बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत. दोघांनी खेळपट्टीचे निरीक्षण केले आणि क्युरेटर सुजान मुखर्जी यांच्यासोबत चर्चाही केली. दरम्यान, मिश्राने आजच्या ऐच्छिक सराव सत्रादरम्यान कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे यांना गोलंदाजी केली. मी थोडा जुन्या विचारांचा आहे. जोपर्यंत माझा प्रश्न आहे, तर जेव्हा मी खेळत होतो, तेव्हा ज्या टेस्ट क्रिकेट स्ट्राइक रेटची चर्चा व्हायची ती गोलंदाजांची असायची. संघामध्ये विविध लोकांची, विविध स्तराच्या खेळाडूंची, तसेच विविध कौशल्यांच्या खेळाडूंची गरज असते. कसोटी क्रिकेटचे प्रत्येक सत्र वेगळे असल्याने यासर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात. हीच कसोटी क्रिकेटची आकर्षक बाब आहे. माझ्या दृष्टिकोनातून कसोटी क्रिकेटमध्ये स्ट्राइक रेट केवळ गोलंदाजांसाठी महत्त्वाचा असतो, फलंदाजांसाठी नाही.- अनिल कुंबळे, भारतीय प्रशिक्षक