शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
3
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
4
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
5
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
6
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
7
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
8
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
9
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
10
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
11
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
12
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
13
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
14
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
15
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
16
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
17
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
18
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
19
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
20
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य

टी-२० साठी डीआरएसचा प्रस्ताव

By admin | Updated: May 26, 2017 03:27 IST

सर्व प्रकारच्या टी-२० सामन्यांसाठी डीआरएसचा वापर तसेच अभद्र व्यवहार करणाऱ्या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखविण्याचा अधिकार मैदानी पंचांना बहाल करण्याची शिफारस

लंडन : सर्व प्रकारच्या टी-२० सामन्यांसाठी डीआरएसचा वापर तसेच अभद्र व्यवहार करणाऱ्या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखविण्याचा अधिकार मैदानी पंचांना बहाल करण्याची शिफारस टीम इंडियाचे मुख्य कोच अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखालील आयसीसी क्रिकेट समितीने केली आहे. वार्षिक आमसभेत ज्या अनेक शिफारशी करण्यात आल्या. त्यात या दोन शिफारशी प्रमुख आहेत.पायचीतच्या निर्णयाची पंच समीक्षा करतील तेव्हा संघाच्या वाट्याला आलेले रिव्ह्यू कमी होऊ नये, अशी आणखी एक शिफारस करण्यात आली आहे. ही शिफारस अमलात आल्यास कसोटी क्रिकेटमधील ८० षटकांनंतरचा ‘टॉप अप रिव्ह्यू’ काढून घेण्यात येणार आहे. भारताने कसोटी क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनाची मागणी केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या भविष्यासाठी ही कृती आवश्यक असल्याने समितीने सर्वसंमतीने मागणीला पाठिंबा दिला. आॅलिम्पिकमध्येही क्रिकेटच्या समावेशाला पाठिंबा मिळाला आहे. समितीने क्रिकेटच्या २०१७ च्या नव्या नियमांवरदेखील विचार केला. यात काही सुधारणादेखील सुचविल्या असून, एखाद्या खेळाडूची मैदानातील वागणूक खेळाच्या हिताला बाधक असल्यास त्याला मैदानाबाहेर घालविण्याचा अधिकार मैदानी पंचांना बहाल करण्यात यावा, ही प्रमुख सुधारणा आहे.