शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
3
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
4
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
5
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
6
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
7
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
8
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
9
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
10
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
11
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
12
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
13
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
14
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
15
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
16
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
17
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
18
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
19
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट
20
दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांत उद्या बँका बंद राहणार का, पाहा काय म्हटलंय RBI नं?

दुलिप ट्रॉफी स्थगित करण्याचा प्रस्ताव

By admin | Updated: May 20, 2015 01:33 IST

भारताच्या यजमानपदाखाली आयोजित आयसीसी टी-२० विश्वकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर निर्धारित दुलिप ट्रॉफी स्पर्धा स्थगित करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे.

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) तांत्रिक समितीने पुढील वर्षी मार्च-एप्रिलमध्ये भारताच्या यजमानपदाखाली आयोजित आयसीसी टी-२० विश्वकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर निर्धारित दुलिप ट्रॉफी स्पर्धा स्थगित करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे.बीसीसीआय तांत्रिक समितीची मंगळवारी येथे बैठक झाली असून त्यात स्थानिक क्रिकेटमध्ये काही बदल करण्याच्या शिफारशी केल्या आहेत. समितीने केलेल्या शिफारशी बोर्डाच्या कार्यकारिणीपुढे ठेवण्यात येतील. पुढील वर्षी मार्च-एप्रिलमध्ये आयोजित टी-२० विश्वकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर या कालावधीत होणारी दुलिप ट्रॉफी स्पर्धा स्थगित करण्यात यावी, असा प्रस्ताव या समितीने दिला आहे. बैठकीमध्ये रणजी ट्रॉफी स्पर्धेत सध्या असलेल्या गुणप्रणालीवर चर्चा झाली. सहभागी संघांना थेट विजय मिळविण्यासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे, यावर या बैठकीत भर देण्यात आला. पहिल्या डावातील आघाडीच्या आधारावर संघाला ३ गुण व प्रतिस्पर्धी संघाला एक गुण अशी असलेली सध्याची प्रणाली संपविणे आवश्यक आहे. त्याऐवजी फलंदाजी व गोलंदाजीसाठी बोनस गुण मिळायला हवा आणि त्यासाठी केवळ पहिल्या डावातील कामगिरी विचारात घ्यायला हवी, अशी शिफारस करण्यात आली. नव्या प्रस्तावानुसार जो संघ ८५ षटकांत ३०० धावा करतो किंवा जो संघ ८५ षटकांत ७ बळी घेतो त्या संघांना एक-एक बोनस गुण मिळावा. निर्णायक विजयासाठी सहा गुण व एक बोनस गुणाची सुरुवातीची पद्धत कायम असावी. तांत्रिक समितीचे अध्यक्ष व भारताचे माजी कर्णधार अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत देवधर ट्रॉफी स्पर्धेत सध्या अस्तित्वात असलेल्या स्वरूपामध्ये बदल करण्याचा प्रस्ताव देण्यात आला. त्यानुसार आता या स्पर्धेत तीन संघ सहभागी होतील. त्यात विजय हजारे करंडक विजेता संघ व राष्ट्रीय निवड समितीतर्फे निवडण्यात आलेले दोन संघ यांचा समावेश राहील. वन-डे आंतरराज्य सीनिअर स्पर्धा व सैयद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेच्या स्वरुपामध्ये बदल करण्याचा प्रस्ताव देण्यात आला. सध्या अस्तित्वात असलेल्या विभागीय पद्धतीपेक्षा देशपातळीवर ४ गट तयार करण्यात यावे, अशी शिफारस करण्यात आली.साशंक गोलंदाजी शैली रोखण्यासाठी बीसीसीआयतर्फे होत असलेल्या प्रयत्नांची समितीने प्रशंसा केली. समितीने यासाठी आयसीसीचे नियम लागू करण्याची शिफारस केली. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या प्रक्रियेला अधिक बळकटी मिळण्यास मदत होईल. दरम्यान, समितीने काही स्थळांवरील खेळपट्टीच्या दर्जाबाबत चिंता व्यक्त केली आणि यामध्ये सुधारणा करण्यासाठी उपाय सुचविले. बैठकीनंतर बोलताना कुंबळे म्हणाले, ‘या बैठकीमध्ये स्थानिक क्रिकेट अधिक मजबूत करण्यावर जोर देण्यात आला. गेल्या तीन बैठकीनंतर या शिफारशी देण्यात आल्या. त्यात कर्णधार व प्रशिक्षकांची आणि तांत्रिक समितीच्या बैठकींचा समावेश आहे. या शिफारशींमुळे स्थानिक क्रिकेटमध्ये चुरस व संघर्षपूर्ण खेळ अनुभवाला मिळेल, अशी आशा आहे.’ बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर म्हणाले, ‘सर्व संलग्न असोसिएशनकडून सूचना मिळाल्यानंतर यावर बैठकीमध्ये चर्चा झाली. यातील काही शिफारसींचा दीर्घकालीन प्रभाव दिसेल आणि आगामी सत्रामध्ये आवश्यक गरजा पूर्ण करण्यास मदत मिळेल. (वृत्तसंस्था)