शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

दुलिप ट्रॉफी स्थगित करण्याचा प्रस्ताव

By admin | Updated: May 20, 2015 01:33 IST

भारताच्या यजमानपदाखाली आयोजित आयसीसी टी-२० विश्वकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर निर्धारित दुलिप ट्रॉफी स्पर्धा स्थगित करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे.

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) तांत्रिक समितीने पुढील वर्षी मार्च-एप्रिलमध्ये भारताच्या यजमानपदाखाली आयोजित आयसीसी टी-२० विश्वकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर निर्धारित दुलिप ट्रॉफी स्पर्धा स्थगित करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे.बीसीसीआय तांत्रिक समितीची मंगळवारी येथे बैठक झाली असून त्यात स्थानिक क्रिकेटमध्ये काही बदल करण्याच्या शिफारशी केल्या आहेत. समितीने केलेल्या शिफारशी बोर्डाच्या कार्यकारिणीपुढे ठेवण्यात येतील. पुढील वर्षी मार्च-एप्रिलमध्ये आयोजित टी-२० विश्वकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर या कालावधीत होणारी दुलिप ट्रॉफी स्पर्धा स्थगित करण्यात यावी, असा प्रस्ताव या समितीने दिला आहे. बैठकीमध्ये रणजी ट्रॉफी स्पर्धेत सध्या असलेल्या गुणप्रणालीवर चर्चा झाली. सहभागी संघांना थेट विजय मिळविण्यासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे, यावर या बैठकीत भर देण्यात आला. पहिल्या डावातील आघाडीच्या आधारावर संघाला ३ गुण व प्रतिस्पर्धी संघाला एक गुण अशी असलेली सध्याची प्रणाली संपविणे आवश्यक आहे. त्याऐवजी फलंदाजी व गोलंदाजीसाठी बोनस गुण मिळायला हवा आणि त्यासाठी केवळ पहिल्या डावातील कामगिरी विचारात घ्यायला हवी, अशी शिफारस करण्यात आली. नव्या प्रस्तावानुसार जो संघ ८५ षटकांत ३०० धावा करतो किंवा जो संघ ८५ षटकांत ७ बळी घेतो त्या संघांना एक-एक बोनस गुण मिळावा. निर्णायक विजयासाठी सहा गुण व एक बोनस गुणाची सुरुवातीची पद्धत कायम असावी. तांत्रिक समितीचे अध्यक्ष व भारताचे माजी कर्णधार अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत देवधर ट्रॉफी स्पर्धेत सध्या अस्तित्वात असलेल्या स्वरूपामध्ये बदल करण्याचा प्रस्ताव देण्यात आला. त्यानुसार आता या स्पर्धेत तीन संघ सहभागी होतील. त्यात विजय हजारे करंडक विजेता संघ व राष्ट्रीय निवड समितीतर्फे निवडण्यात आलेले दोन संघ यांचा समावेश राहील. वन-डे आंतरराज्य सीनिअर स्पर्धा व सैयद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेच्या स्वरुपामध्ये बदल करण्याचा प्रस्ताव देण्यात आला. सध्या अस्तित्वात असलेल्या विभागीय पद्धतीपेक्षा देशपातळीवर ४ गट तयार करण्यात यावे, अशी शिफारस करण्यात आली.साशंक गोलंदाजी शैली रोखण्यासाठी बीसीसीआयतर्फे होत असलेल्या प्रयत्नांची समितीने प्रशंसा केली. समितीने यासाठी आयसीसीचे नियम लागू करण्याची शिफारस केली. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या प्रक्रियेला अधिक बळकटी मिळण्यास मदत होईल. दरम्यान, समितीने काही स्थळांवरील खेळपट्टीच्या दर्जाबाबत चिंता व्यक्त केली आणि यामध्ये सुधारणा करण्यासाठी उपाय सुचविले. बैठकीनंतर बोलताना कुंबळे म्हणाले, ‘या बैठकीमध्ये स्थानिक क्रिकेट अधिक मजबूत करण्यावर जोर देण्यात आला. गेल्या तीन बैठकीनंतर या शिफारशी देण्यात आल्या. त्यात कर्णधार व प्रशिक्षकांची आणि तांत्रिक समितीच्या बैठकींचा समावेश आहे. या शिफारशींमुळे स्थानिक क्रिकेटमध्ये चुरस व संघर्षपूर्ण खेळ अनुभवाला मिळेल, अशी आशा आहे.’ बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर म्हणाले, ‘सर्व संलग्न असोसिएशनकडून सूचना मिळाल्यानंतर यावर बैठकीमध्ये चर्चा झाली. यातील काही शिफारसींचा दीर्घकालीन प्रभाव दिसेल आणि आगामी सत्रामध्ये आवश्यक गरजा पूर्ण करण्यास मदत मिळेल. (वृत्तसंस्था)