शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

दुलिप ट्रॉफी स्थगित करण्याचा प्रस्ताव

By admin | Updated: May 20, 2015 01:33 IST

भारताच्या यजमानपदाखाली आयोजित आयसीसी टी-२० विश्वकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर निर्धारित दुलिप ट्रॉफी स्पर्धा स्थगित करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे.

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) तांत्रिक समितीने पुढील वर्षी मार्च-एप्रिलमध्ये भारताच्या यजमानपदाखाली आयोजित आयसीसी टी-२० विश्वकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर निर्धारित दुलिप ट्रॉफी स्पर्धा स्थगित करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे.बीसीसीआय तांत्रिक समितीची मंगळवारी येथे बैठक झाली असून त्यात स्थानिक क्रिकेटमध्ये काही बदल करण्याच्या शिफारशी केल्या आहेत. समितीने केलेल्या शिफारशी बोर्डाच्या कार्यकारिणीपुढे ठेवण्यात येतील. पुढील वर्षी मार्च-एप्रिलमध्ये आयोजित टी-२० विश्वकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर या कालावधीत होणारी दुलिप ट्रॉफी स्पर्धा स्थगित करण्यात यावी, असा प्रस्ताव या समितीने दिला आहे. बैठकीमध्ये रणजी ट्रॉफी स्पर्धेत सध्या असलेल्या गुणप्रणालीवर चर्चा झाली. सहभागी संघांना थेट विजय मिळविण्यासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे, यावर या बैठकीत भर देण्यात आला. पहिल्या डावातील आघाडीच्या आधारावर संघाला ३ गुण व प्रतिस्पर्धी संघाला एक गुण अशी असलेली सध्याची प्रणाली संपविणे आवश्यक आहे. त्याऐवजी फलंदाजी व गोलंदाजीसाठी बोनस गुण मिळायला हवा आणि त्यासाठी केवळ पहिल्या डावातील कामगिरी विचारात घ्यायला हवी, अशी शिफारस करण्यात आली. नव्या प्रस्तावानुसार जो संघ ८५ षटकांत ३०० धावा करतो किंवा जो संघ ८५ षटकांत ७ बळी घेतो त्या संघांना एक-एक बोनस गुण मिळावा. निर्णायक विजयासाठी सहा गुण व एक बोनस गुणाची सुरुवातीची पद्धत कायम असावी. तांत्रिक समितीचे अध्यक्ष व भारताचे माजी कर्णधार अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत देवधर ट्रॉफी स्पर्धेत सध्या अस्तित्वात असलेल्या स्वरूपामध्ये बदल करण्याचा प्रस्ताव देण्यात आला. त्यानुसार आता या स्पर्धेत तीन संघ सहभागी होतील. त्यात विजय हजारे करंडक विजेता संघ व राष्ट्रीय निवड समितीतर्फे निवडण्यात आलेले दोन संघ यांचा समावेश राहील. वन-डे आंतरराज्य सीनिअर स्पर्धा व सैयद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेच्या स्वरुपामध्ये बदल करण्याचा प्रस्ताव देण्यात आला. सध्या अस्तित्वात असलेल्या विभागीय पद्धतीपेक्षा देशपातळीवर ४ गट तयार करण्यात यावे, अशी शिफारस करण्यात आली.साशंक गोलंदाजी शैली रोखण्यासाठी बीसीसीआयतर्फे होत असलेल्या प्रयत्नांची समितीने प्रशंसा केली. समितीने यासाठी आयसीसीचे नियम लागू करण्याची शिफारस केली. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या प्रक्रियेला अधिक बळकटी मिळण्यास मदत होईल. दरम्यान, समितीने काही स्थळांवरील खेळपट्टीच्या दर्जाबाबत चिंता व्यक्त केली आणि यामध्ये सुधारणा करण्यासाठी उपाय सुचविले. बैठकीनंतर बोलताना कुंबळे म्हणाले, ‘या बैठकीमध्ये स्थानिक क्रिकेट अधिक मजबूत करण्यावर जोर देण्यात आला. गेल्या तीन बैठकीनंतर या शिफारशी देण्यात आल्या. त्यात कर्णधार व प्रशिक्षकांची आणि तांत्रिक समितीच्या बैठकींचा समावेश आहे. या शिफारशींमुळे स्थानिक क्रिकेटमध्ये चुरस व संघर्षपूर्ण खेळ अनुभवाला मिळेल, अशी आशा आहे.’ बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर म्हणाले, ‘सर्व संलग्न असोसिएशनकडून सूचना मिळाल्यानंतर यावर बैठकीमध्ये चर्चा झाली. यातील काही शिफारसींचा दीर्घकालीन प्रभाव दिसेल आणि आगामी सत्रामध्ये आवश्यक गरजा पूर्ण करण्यास मदत मिळेल. (वृत्तसंस्था)