शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
4
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
7
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
8
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
9
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
10
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
11
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
12
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
13
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
14
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
15
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
16
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
17
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
18
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
19
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
20
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल

कसोटी क्रिकेट रोमहर्षक बनविण्याची जबाबदारी खेळाडूंची : विराट कोहली

By admin | Updated: October 20, 2016 06:29 IST

कसोटी क्रिकेट रोमहर्षक आणि प्रेक्षकांना अनुकूल बनविण्याची जबाबदारी खेळाडूंची आहे.

नवी दिल्ली : कसोटी क्रिकेट रोमहर्षक आणि प्रेक्षकांना अनुकूल बनविण्याची जबाबदारी खेळाडूंची आहे. मी स्वत: कसोटीपटू बनण्यासाठीच क्रिकेट खेळणे सुरू केले होते, असे स्टार फलंदाज विराट कोहलीचे मत आहे.टीम इंडियाचा कसोटी कर्णधार असलेल्या विराटने मंगळवारी रात्री एका समारंभात क्रीडा पत्रकार विजय लोकपल्ली यांच्या ‘ड्रिव्हन द विराट कोहली स्टार’ या पुस्तकाचे प्रकाशन केले.कार्यक्रमाला दिग्गज खेळाडू कपिल देव, सध्याचे कोच अनिल कुंबळे, माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग, रवी शास्त्री, आशिष नेहरा, अंजुम चोप्रा, कोहलीचे कोच राजकुमार शर्मा आणि अन्य खेळाडू उपस्थित होते. सेहवाग म्हणाला, ‘‘कोहलीबद्दल मी सर्वांत आधी प्रदीप सांगवान याच्याकडून ऐकले. प्रत्यक्षात विराटची फलंदाजी पाहून चकित झालो.’’ कुंबळे यांनी कोहली हा स्वत:ला नव्हे, तर संघाला सज्ज करण्याची भूमिका बजाविणारा खेळाडू असल्याचे सांगितले. रवी शास्त्री यांनी सांगितले, ‘‘टीम इंडियाचा संचालक या नात्याने ड्रेसिंग रूममध्ये कोहलीच्या सहज स्वभावाचा मला परिचय झाला. तो निष्ठा बाळगतो. प्रामाणिकपणे काम करतो; शिवाय कुठलाही बहाणा करीत नाही. तो एका युवा संघाचा कर्णधार आहे.’’कोहलीचे कोच राजकुमार शर्मा म्हणाले, ‘‘विराटला बालपणापासून आव्हान स्वीकारण्याची सवय आहे. आत्मविश्वास अधिक असल्याने आपल्याला आव्हान मिळावे, असे तो नेहमी म्हणत असतो.’’ (वृत्तसंस्था)>मीच नव्हे, तर क्रिकेट सुरू करणाऱ्या प्रत्येकाला आपण टेस्ट कसोटीपटू व्हावे, असे वाटते. कसोटी क्रिकेटला आजही प्राधान्य दिले जाते. आम्ही कसोटीत कसे खेळतो आणि प्रेक्षकांना किती खिळवून ठेवतो, हे आमच्यावर अवलंबून आहे. नात्यांमध्ये माझ्यासाठी प्रामाणिकपणा सर्वात महत्त्वाचा आहे. १९९८ सालापासून राजकुमार शर्मा हेच माझे एकमेव प्रशिक्षक असून हे कधीही बदलणार नाही. आयपीएलसाठीही मी एकाच संघाकडून खेळलो असून हे देखील कधीच बदलणार नाही. - विराट कोहलीआमच्या तुलनेत सध्याचे खेळाडू सांघिक संस्कृती अधिक जोपासतात. समर्पण, शिस्त आणि कठोर मेहनत या बाबतीतही सध्याचे खेळाडू पुढे आहेत. आमच्यावेळी क्षेत्ररक्षण चांगले नव्हते; पण सध्याच्या खेळाडूंनी क्षेत्ररक्षणाचा दर्जा उंचावला आहे.- कपिलदेव