शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

कसोटी क्रिकेट रोमहर्षक बनविण्याची जबाबदारी खेळाडूंची : विराट कोहली

By admin | Updated: October 20, 2016 06:29 IST

कसोटी क्रिकेट रोमहर्षक आणि प्रेक्षकांना अनुकूल बनविण्याची जबाबदारी खेळाडूंची आहे.

नवी दिल्ली : कसोटी क्रिकेट रोमहर्षक आणि प्रेक्षकांना अनुकूल बनविण्याची जबाबदारी खेळाडूंची आहे. मी स्वत: कसोटीपटू बनण्यासाठीच क्रिकेट खेळणे सुरू केले होते, असे स्टार फलंदाज विराट कोहलीचे मत आहे.टीम इंडियाचा कसोटी कर्णधार असलेल्या विराटने मंगळवारी रात्री एका समारंभात क्रीडा पत्रकार विजय लोकपल्ली यांच्या ‘ड्रिव्हन द विराट कोहली स्टार’ या पुस्तकाचे प्रकाशन केले.कार्यक्रमाला दिग्गज खेळाडू कपिल देव, सध्याचे कोच अनिल कुंबळे, माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग, रवी शास्त्री, आशिष नेहरा, अंजुम चोप्रा, कोहलीचे कोच राजकुमार शर्मा आणि अन्य खेळाडू उपस्थित होते. सेहवाग म्हणाला, ‘‘कोहलीबद्दल मी सर्वांत आधी प्रदीप सांगवान याच्याकडून ऐकले. प्रत्यक्षात विराटची फलंदाजी पाहून चकित झालो.’’ कुंबळे यांनी कोहली हा स्वत:ला नव्हे, तर संघाला सज्ज करण्याची भूमिका बजाविणारा खेळाडू असल्याचे सांगितले. रवी शास्त्री यांनी सांगितले, ‘‘टीम इंडियाचा संचालक या नात्याने ड्रेसिंग रूममध्ये कोहलीच्या सहज स्वभावाचा मला परिचय झाला. तो निष्ठा बाळगतो. प्रामाणिकपणे काम करतो; शिवाय कुठलाही बहाणा करीत नाही. तो एका युवा संघाचा कर्णधार आहे.’’कोहलीचे कोच राजकुमार शर्मा म्हणाले, ‘‘विराटला बालपणापासून आव्हान स्वीकारण्याची सवय आहे. आत्मविश्वास अधिक असल्याने आपल्याला आव्हान मिळावे, असे तो नेहमी म्हणत असतो.’’ (वृत्तसंस्था)>मीच नव्हे, तर क्रिकेट सुरू करणाऱ्या प्रत्येकाला आपण टेस्ट कसोटीपटू व्हावे, असे वाटते. कसोटी क्रिकेटला आजही प्राधान्य दिले जाते. आम्ही कसोटीत कसे खेळतो आणि प्रेक्षकांना किती खिळवून ठेवतो, हे आमच्यावर अवलंबून आहे. नात्यांमध्ये माझ्यासाठी प्रामाणिकपणा सर्वात महत्त्वाचा आहे. १९९८ सालापासून राजकुमार शर्मा हेच माझे एकमेव प्रशिक्षक असून हे कधीही बदलणार नाही. आयपीएलसाठीही मी एकाच संघाकडून खेळलो असून हे देखील कधीच बदलणार नाही. - विराट कोहलीआमच्या तुलनेत सध्याचे खेळाडू सांघिक संस्कृती अधिक जोपासतात. समर्पण, शिस्त आणि कठोर मेहनत या बाबतीतही सध्याचे खेळाडू पुढे आहेत. आमच्यावेळी क्षेत्ररक्षण चांगले नव्हते; पण सध्याच्या खेळाडूंनी क्षेत्ररक्षणाचा दर्जा उंचावला आहे.- कपिलदेव