शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडाप्रेमी पालकांमुळेच देशाची शान उंचावली

By admin | Updated: May 8, 2016 03:13 IST

एकेकाळी आपल्या देशात मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहन देणारे पालक निर्माण होतील असे कदापी वाटले नव्हते, पण आज हा बदल घडला आहे. अशा पालकांमुळेच क्रीडा क्षेत्रात

पुणे : एकेकाळी आपल्या देशात मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहन देणारे पालक निर्माण होतील असे कदापी वाटले नव्हते, पण आज हा बदल घडला आहे. अशा पालकांमुळेच क्रीडा क्षेत्रात भारताची शान उंचावली आहे, अशी उत्स्फूर्त भावना पहिले विश्वकरंडकविजेते भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार कपिलदेव यांनी व्यक्त केली.पुणे आंतरराष्ट्रीय स्पोर्टस् एक्स्पोतर्फे (पीआयएसई) आॅलिंपियन तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख संयोजक डॉ. विश्वजित कदम व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाची आई नसीमा, आंतरराष्ट्रीय टेनिसपटू प्रार्थना ठोंबरेची आई वर्षा, क्रिकेटपटू झहीरचे आई-वडील झाकिया-बख्तियार, फुटबॉलपटू सुनील छेत्रीचे वडील केबी छेत्री, हॉकीपटू धनराज पिल्लेची आई अंदालम्मा, स्पेशल आॅलिंपिकचा खेळाडू भरत चव्हाणचे वडील जय यांना कपिलदेव यांच्या हस्ते गौरवचिन्ह आणि पदक देऊन सन्मानित करण्यात आले.कपिल देव पुढे म्हणाले, आपल्याकडे आता खेळाडूंना प्रोत्साहनसुद्धा दिले जात आहे. आजचा दिवस अशा पालकांचा आहे. खेळाडूच्या वाट्याला अनेक सत्कार येतात, पण पालकांच्या वाट्याला असा गौरवाचा क्षण दुर्मिळ असतो. हा योग जुळवून आणल्याबद्दल मी पुणे स्पोर्टस् एक्स्पोचे अभिनंदन करतो. सचिन आणि कांबळी यांनी सोबतच करिअरला सुरुवात केली होती. दोघांमध्ये समान प्रतिभा होती. कांबळी कदाचित जास्त प्रतिभावान होता. मात्र, त्याचे सहायक, मित्र, घरचे वातावरण सचिनपेक्षा वेगळे असू शकेल. मात्र, त्यानंतर काय झाले हे सगळ्यांनाच माहीत आहे. सचिन देशासाठी २४ वर्षे खेळला. तर कांबळी खेळापासून दूर झाला. प्रतिभा ही महत्त्वाचीच आहे. मात्र, खेळाडूसाठी अधिक गरजेचे आहे ते मित्र, आईवडील, भाऊ, बहीण आणि प्रशिक्षण संस्थेचे समर्थन.डॉ. विश्वजित कदम यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले. त्यांनी पालकांचा सन्मान करणे हा पीआयएसईचा बहुमान असल्याची भावना व्यक्त केली. ते म्हणाले, की बार्शीसारख्या दुष्काळग्रस्त भागातून प्रार्थना ठोंबरेचा तिच्या पालकांच्या पाठिंब्यामुळे उदय झाला. आता हीच प्रार्थना आॅलिंपिकमध्ये सानियासह भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची अपेक्षा आहे. तिने महाराष्ट्राची आणि देशाची शान उंचावली आहे. केबी छेत्री यांच्या पाठिंब्यामुळेच सुनील तरुण वयात देशाचे नेतृत्व करू शकला. धनराजला घरात अनेक हॉकीपटू असण्याचा फायदा झाला आणि अंदालम्मा यांनी त्याला प्रोत्साहन दिले. स्पेशल आॅलिंपियन घडविलेल्या जय चव्हाण यांना तर सलाम करावा लागेल.(क्रीडा प्रतिनिधी)आपला मुलगा इंजिनिअर, डॉक्टर झाला नाही तरी खेळाडू बनूनही मोठा होऊ शकतो, हे आता पालकांना कळले आहे. त्यामुळेच आपल्या मुलाने सचिन, विराट बनावे, असे स्वप्न पाहणारे पालक आज दिसत आहेत. मुलांच्या हातातून पेन-पेन्सिल काढून घेऊ नका, पण तसेच त्यांच्या हातातून बॅट-बॉलसुद्धा काढून घेऊ नका. आपल्या देशात क्रीडा संस्कृती वाढत आहे, ही चांगली बाब आहे. - कपिल देव