शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

खेळपट्टी क्रिकेटप्रेमींना खेळाचा आनंद देणार

By admin | Updated: February 21, 2017 00:44 IST

पुण्यात होणाऱ्या पहिल्यावहिल्या कसोटीत धावांचा पाऊस पडेल की गोलंदाज वर्चस्व गाजवतील, या प्रश्नाचे थेट उत्तर न देता ही खेळपट्टी

पुणे : पुण्यात होणाऱ्या पहिल्यावहिल्या कसोटीत धावांचा पाऊस पडेल की गोलंदाज वर्चस्व गाजवतील, या प्रश्नाचे थेट उत्तर न देता ही खेळपट्टी क्रिकेटपे्रमींना खेळाचा आनंद देणारी असेल, असे मत महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील स्टेडियमचे क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांनी व्यक्त केले. या मैदानावर प्रथमच होणारी ५ दिवसांची लढत फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस होत आहे. या सामन्यात खेळपट्टीचा स्वभाव हवामान कसे असेल, यावर अवलंबून आहे. या मैदानावर प्रत्येक मोसमात नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ४ दिवसीय रणजी सामने झाले. मार्च-एप्रिलमध्ये आयपीएलचे सामने झाले. त्या वेळचे वातावरण आणि या कसोटीच्या काळातील वातावरण वेगळे असेल. ४ दिवसीय लढतींमध्ये चेंडू फारसा वळत नव्हता. वेगळ्या वातावरणात होणाऱ्या या ५ दिवसीय सामन्यासाठीच्या खेळपट्टीबाबत ठामपणे सांगता येणार नाही. पहिल्याच कसोटीत खेळपट्टी कशी वागते, हे पाहण्यास मीदेखील उत्सुक आहे, असे साळगावकर म्हणाले. खेळपट्टीच्या अंदाजाबाबत ठामपणे सांगितले नसले तरी, भारतीय संघाला मदत करणारी खेळपट्टी असावी, अशी सूचना करण्यात आल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात नमूद केले. मागील महिन्यात याच मैदानावर भारत-इंग्लंड एकदिवसीय लढत झाली. यात धावांचा पाऊस पडला होता. ‘‘इंग्लंडविरुद्धच्या लढतीनंतर गेला महिनाभर आम्ही या खेळपट्टीसाठी मेहनत घेतली. टी-२० आणि एकदिवसीय प्रकारांचे निकाल खेळपट्टीपेक्षा बऱ्याच प्रमाणात खेळाडूंच्या कामगिरीवर अवलंबून असतात. कसोटी प्रकाराचे मात्र तसे नसते. कसोटीसाठी खेळपट्टी तयार करताना क्युरेटरचा कस लागतो. ५ दिवसांत सुमारे ३० तासांच्या खेळासाठी खेळपट्टी तयार करणे आव्हानात्मक असते. ही कसोटी ५ दिवस चालावी व क्रिकेटप्रेमींना चांगला निकाल मिळावा, अशी माझी अपेक्षा आहे,’’ असेही त्यांनी नमूद केले. (क्रीडा प्रतिनिधी)